शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

लहरी पावसावर तोडगा; वापरा आधुनिक पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 23:29 IST

लहरी पावसामुळे पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने भात लागवड करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे आणि लावणी या प्रकारांना छेद देत सरासरी उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते.

बोर्डी - लहरी पावसामुळे पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने भात लागवड करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे आणि लावणी या प्रकारांना छेद देत सरासरी उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात याबद्दलचे प्रयोग मागील पाच-सहा वर्षांपासून सुरू असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.मागील दशकापासून मान्सूनच्या लहारीपणामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात लागवडीवर विपरीत परिणाम होत आहे. घटत्या उत्पादनामुळे शेतकरी भात पिकापासून फारकत घेत असून हे क्षेत्र घटत आहे. भात हे अधिक पावसावर घेतले जाते. मात्र पावसाचा कालावधी बदलल्याने पारंपरिक ऐवजी आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यास अपेक्षित पीक घेण्याचे तंत्र कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे शिकविले जात असून त्याचा परिणाम उत्पादन वाढीत होत आहे. या पद्धतीमुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे, भाताची खणणी आणि लावणी करण्याची आवश्यकता नसल्याने मजुरी व चिखलणीकरिता केला जाणारा खर्च कमी होत आहे. शिवाय कमी कालावधीत पीक तयार होऊन अपेक्षित उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करता येते.कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे चार प्रकारच्या आधुनिक पद्धती अवलंबिण्याचे सुचविले जात आहे. त्यानुसार ट्रे वापरुन रोपवाटिका केल्यास एकरी केवळ ३ ते ४ किलो बियाणे लागते. तर पारंपरिक पद्धतीने एकरी १५ ते १८ किलो बियाण्याची आवश्यकता भासते. या आधुनिक पद्धतीने कमी बियाणे लागत असून मजुरीचा खर्चही वाचविता येतो. ड्रम पद्धतीने भात लागवड करण्याकरिता पावसाळ्या पूर्वी जमिनीची मशागत करण्याची आवश्यकता असून ड्रमच्या सहाय्याने भात लागवड केली जाते. याद्वारे प्रति एकरी ८ ते १० किलो बियाण्याची गरज लागते. एका दिवसात दोन मजूर दोन एकरापर्यंत लागवड करू शकतात. त्यामुळे मजुरीचे तीस दिवस वाचत असून एकरी सुमारे पाचहजार रु पये उत्पादन खर्च वाचविता येतो. महत्त्वाचे म्हणजे पीक ८ ते १० दिवस आधी तयार होते.तर टोकन पद्धतीने भात लागवड करण्याकरिता जमिनीची मशागत करून २० बाय २० सेमी अंतरावर ४ ते ५ दाणे याप्रमाणे घेऊन कंपोस्ट खताने खड्डे झाकून घ्यावे लागतात. मिरची किंवा अन्य पिकाप्रमाणेच भात सुद्धा माल्चिंग पद्धतीने घेतले जाते. पावसापूर्वी जमिनीची मशागत आवश्यक असून ४.५ फुट अंतरावर सरी पाडून १०० सेमीचा गादीवाफा तयार केला जातो. त्यावर माल्चिग पेपर अंथरून १ फूट अंतरावर छिद्र पाडून त्यामध्ये ४ ते ५ दाणे टाकून कंपोस्ट खताने झाकून घेतले जाते. या पद्धतीने मजुरीची बचत तर होतेच शिवाय ८ ते १० दिवस अगोदर पीक तयार होते. त्यानंतर रब्बी हंगामात याच बेडवर हरभरा लावता येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच बेडवर दोन वर्षात भात आणि हरभरा पीक घेता येते हे विशेष. सगुणा भात तंत्रज्ञान ही सुद्धा आधुनिक भात लागवडीची आणखी पद्धती असून या भात लावडीच्या पद्धतीविषयी अधिक माहितीसाठी केंद्राशी ९८५०२६०३५५ संपर्क साधावा, अशी माहिती प्राध्यापक भरत कुशारे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती