शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

लहरी पावसावर तोडगा; वापरा आधुनिक पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 23:29 IST

लहरी पावसामुळे पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने भात लागवड करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे आणि लावणी या प्रकारांना छेद देत सरासरी उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते.

बोर्डी - लहरी पावसामुळे पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने भात लागवड करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे आणि लावणी या प्रकारांना छेद देत सरासरी उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात याबद्दलचे प्रयोग मागील पाच-सहा वर्षांपासून सुरू असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.मागील दशकापासून मान्सूनच्या लहारीपणामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात लागवडीवर विपरीत परिणाम होत आहे. घटत्या उत्पादनामुळे शेतकरी भात पिकापासून फारकत घेत असून हे क्षेत्र घटत आहे. भात हे अधिक पावसावर घेतले जाते. मात्र पावसाचा कालावधी बदलल्याने पारंपरिक ऐवजी आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यास अपेक्षित पीक घेण्याचे तंत्र कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे शिकविले जात असून त्याचा परिणाम उत्पादन वाढीत होत आहे. या पद्धतीमुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे, भाताची खणणी आणि लावणी करण्याची आवश्यकता नसल्याने मजुरी व चिखलणीकरिता केला जाणारा खर्च कमी होत आहे. शिवाय कमी कालावधीत पीक तयार होऊन अपेक्षित उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करता येते.कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे चार प्रकारच्या आधुनिक पद्धती अवलंबिण्याचे सुचविले जात आहे. त्यानुसार ट्रे वापरुन रोपवाटिका केल्यास एकरी केवळ ३ ते ४ किलो बियाणे लागते. तर पारंपरिक पद्धतीने एकरी १५ ते १८ किलो बियाण्याची आवश्यकता भासते. या आधुनिक पद्धतीने कमी बियाणे लागत असून मजुरीचा खर्चही वाचविता येतो. ड्रम पद्धतीने भात लागवड करण्याकरिता पावसाळ्या पूर्वी जमिनीची मशागत करण्याची आवश्यकता असून ड्रमच्या सहाय्याने भात लागवड केली जाते. याद्वारे प्रति एकरी ८ ते १० किलो बियाण्याची गरज लागते. एका दिवसात दोन मजूर दोन एकरापर्यंत लागवड करू शकतात. त्यामुळे मजुरीचे तीस दिवस वाचत असून एकरी सुमारे पाचहजार रु पये उत्पादन खर्च वाचविता येतो. महत्त्वाचे म्हणजे पीक ८ ते १० दिवस आधी तयार होते.तर टोकन पद्धतीने भात लागवड करण्याकरिता जमिनीची मशागत करून २० बाय २० सेमी अंतरावर ४ ते ५ दाणे याप्रमाणे घेऊन कंपोस्ट खताने खड्डे झाकून घ्यावे लागतात. मिरची किंवा अन्य पिकाप्रमाणेच भात सुद्धा माल्चिंग पद्धतीने घेतले जाते. पावसापूर्वी जमिनीची मशागत आवश्यक असून ४.५ फुट अंतरावर सरी पाडून १०० सेमीचा गादीवाफा तयार केला जातो. त्यावर माल्चिग पेपर अंथरून १ फूट अंतरावर छिद्र पाडून त्यामध्ये ४ ते ५ दाणे टाकून कंपोस्ट खताने झाकून घेतले जाते. या पद्धतीने मजुरीची बचत तर होतेच शिवाय ८ ते १० दिवस अगोदर पीक तयार होते. त्यानंतर रब्बी हंगामात याच बेडवर हरभरा लावता येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच बेडवर दोन वर्षात भात आणि हरभरा पीक घेता येते हे विशेष. सगुणा भात तंत्रज्ञान ही सुद्धा आधुनिक भात लागवडीची आणखी पद्धती असून या भात लावडीच्या पद्धतीविषयी अधिक माहितीसाठी केंद्राशी ९८५०२६०३५५ संपर्क साधावा, अशी माहिती प्राध्यापक भरत कुशारे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती