शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू समुद्रकिनारी सिगल निरीक्षणाची पर्वणी, पर्यटनाचे नवे दालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:27 IST

डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरून प्रवास करताना हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुद्दामहून रस्त्यालगत वाहने थांबवली जातात. त्यांची चाललेली हितगुज ऐकण्यासाठी पक्षीवेडे तासन्तास घालवतात.

- अनिरु द्ध पाटीलडहाणू/बोर्डी : पावसाळा लांबल्याने हिवाळ्याच्या प्रारंभी दाखल होणाऱ्या सिगल पक्ष्यांचे थवे मार्च महिन्यात दृष्टीस पडत आहेत. त्याची दखल स्थानिक आणि पर्यटक घेत आहेत. पक्षी निरीक्षणाद्वारे पर्यटनाच्या या नव्या दालनाच्या विकासाची आवश्यकता व्यक्त होत आहे.तालुक्याला ३५ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, पारनाका या स्थळांनी पर्यटकांप्रमाणेच विविध जातींच्या पक्षांनाही भुरळ घातली आहे. घोलवड, बोर्डी आणि नरपड-चिखले खाडी पुलानजीक दरवर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी सिगल पक्ष्यांचे आगमन होते. मोठ्या संख्येने थव्यातून फिरत असल्याने त्यांचा वावर दखल घ्यायला लावणारा आहे. पावसाळा लांबल्याने या वेळी त्यांची संख्या कमी होती. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही संख्या वाढू लागली आहे. त्यांच्या जवळ गेल्यावर ते लगेच उडत नसल्याने त्यांच्या निरीक्षणाची पर्वणी मिळते आहे.डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरून प्रवास करताना हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुद्दामहून रस्त्यालगत वाहने थांबवली जातात. त्यांची चाललेली हितगुज ऐकण्यासाठी पक्षीवेडे तासन्तास घालवतात. किनाºयावर थव्यांमधून दाटीवाटीने बसलेले, घिरट्या घालणारे आणि लाटांवर पोहणारे अशा सिगलांच्या क्रीडा कॅमेºयात टिपण्यास येणारेही अनेकजण आहेत. नरपड-चिखले खाडी पूल, घोलवड खाडी-नजीक कांदळवन तसेच महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील काही पाणथळ जागांवर जाऊन नेमाने पक्षी निरीक्षण करीत असल्याची माहिती काही पक्षी अभ्यासकांनी दिली. या वेळी लहान-मोठे विविध जातींचे स्थलांतरीत पक्षी विनासायास दृष्टीस पडतात. खंड्या, समुद्र सताने, घुबड या पक्षांच्या दुर्मिळ जाती या भागात दृष्टीस पडल्याचे ते म्हणाले. दरम्यान, येथे खाडी किनारा, रेतीचे पठार आणि कांदळवन असल्याने स्थलांतरित पक्षांच्या निरीक्षणाची संधी उपलब्ध आहे.नियोजित विकासाची गरजपर्यटन स्थळ असलेल्या या तालुक्याला हे नवे दालन खुणावत असून त्याच्या विकासाकरिता नियोजित पद्धतीने काम झाले पाहिजे.पाणथळ जागांवर होणारी बांधकामे जैवविविधतेला धोका पोहोचवत असल्याने त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवVasai Virarवसई विरार