शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

तारापूरला समुद्र काळवंडला! प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बिंग कोस्ट गार्डच्या छायाचित्रांनी फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 06:07 IST

तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कारखानदारांचे बटीक असल्याप्रमाणे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर : तारापूर एमआयडीसीमधील कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेले प्रदूषित रसायनयुक्त सांडपाणी छुप्या पद्धतीने समुद्रात सोडले जात असल्याचे कोस्ट गार्डने हेलिकॉप्टरमधून काढलेल्या छायाचित्रांमधून उघड झाले. यामुळे तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कारखानदारांचे बटीक असल्याप्रमाणे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जुन्या पाइपलाइनमधून किनाऱ्यालगत हे प्रदूषित पाणी सोडण्याची बाब शनिवारी समोर आली. मागील अनेक वर्षांपासून तारापूर एमआयडीसीच्या कारखान्यांमधून ३५ ते ४० एमएलडी इतके प्रदूषित सांडपाणी समुद्रात सोडले जाते. यामुळे सातपाटी, नवापूर, दांडी, उच्छेळी, मुरबे आदी परिसरातील खाड्यांमधील जैवविविधता नष्ट होत असून शेतीही नापीक झाली आहे.

देशातले सर्वांत जास्त प्रदूषण करणारी एमआयडीसी म्हणून तारापूरची ओळख आहे. प्रदूषणकारी कारखानदार आणि त्याला छुपा पाठिंबा देणाऱ्यांमुळे समुद्रात प्रदूषण वाढत आहे. सतत जल आणि वायू प्रदूषणाच्या घटना, तसेच किनारपट्टीवर सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित रासायनिक पाण्याविरोधात अनेक मोर्चे, आंदोलने तारापूरच्या एमपीसीबी, एमआयडीसी, सीईटीपीच्या कार्यालयावर नेण्यात आले होते. मात्र, क्लोजर नोटीस आणि काही हजारांचा दंड भरून या कंपन्या पुन्हा प्रदूषण करण्यास मोकळ्या होत आहेत. 

सांडपाणी प्रक्रियेची पाइपलाइन थेट समुद्रात 

या प्रकरणात तारापूर औद्योगिक वसाहतीच्या (टिमा) माजी अध्यक्षांनाच प्रदूषणाबाबत नोटीस बजावण्यात आल्याच्या घटनेने प्रदूषण रोखणाऱ्यांचाच प्रदूषणात सहभाग दिसून आला होता. एमआयडीसीमधील औद्योगिक वसाहतीमधून उत्पादन वाढल्याने प्रक्रिया केंद्र उभारण्याला मंजुरी मिळाल्यानंतर ३५  एमएलडी क्षमतेऐवजी ५० एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रियेची पाइपलाइन थेट समुद्रात ७.१ किमी इतक्या खोल टाकली जात आहे. त्यामुळे शनिवारी नवापूरच्या किनाऱ्यावर असलेल्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषित पाणी समुद्रात सोडले जात असल्याची बाब कोस्ट गार्डने आपल्या हेलिकॉप्टरमधून घेतलेल्या छायाचित्रांमुळे जगासमोर आली आहे. 

हरित लवादात अनेकदा सुनावणी 

अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवाद, पुणे येथे याचिका दाखल केली आहे. हरित लवादात अनेक वेळा सुनावण्या झाल्यानंतरही तारापूर औद्योगिक वसाहतींमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात असल्याचे वास्तव याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान पटवून दिल्यावर लवादाने आयआयएम आणि आयआयटी -अहमदाबाद, निरी, एमपीसीबी, सीपीसीबीच्या तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली.

१६० कोटींचा ठोठावला होता दंड 

समितीने प्रदूषणाबाबत सादर केलेल्या अहवालातील गंभीर बाबींवर टिमा आणि टीईपीएसच्या वकिलांनी १७ सप्टेंबर २०२० रोजी ऑनलाइन झालेल्या सुनावणीदरम्यान नोंदविलेले आक्षेप हरित लवादाने फेटाळून लावले होते. दरम्यान, हरित लवादाने एमआयडीसीमधील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना १६० कोटींचा दंड ठोठावला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :palgharपालघर