शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तारापूरला समुद्र काळवंडला! प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बिंग कोस्ट गार्डच्या छायाचित्रांनी फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 06:07 IST

तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कारखानदारांचे बटीक असल्याप्रमाणे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर : तारापूर एमआयडीसीमधील कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेले प्रदूषित रसायनयुक्त सांडपाणी छुप्या पद्धतीने समुद्रात सोडले जात असल्याचे कोस्ट गार्डने हेलिकॉप्टरमधून काढलेल्या छायाचित्रांमधून उघड झाले. यामुळे तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कारखानदारांचे बटीक असल्याप्रमाणे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जुन्या पाइपलाइनमधून किनाऱ्यालगत हे प्रदूषित पाणी सोडण्याची बाब शनिवारी समोर आली. मागील अनेक वर्षांपासून तारापूर एमआयडीसीच्या कारखान्यांमधून ३५ ते ४० एमएलडी इतके प्रदूषित सांडपाणी समुद्रात सोडले जाते. यामुळे सातपाटी, नवापूर, दांडी, उच्छेळी, मुरबे आदी परिसरातील खाड्यांमधील जैवविविधता नष्ट होत असून शेतीही नापीक झाली आहे.

देशातले सर्वांत जास्त प्रदूषण करणारी एमआयडीसी म्हणून तारापूरची ओळख आहे. प्रदूषणकारी कारखानदार आणि त्याला छुपा पाठिंबा देणाऱ्यांमुळे समुद्रात प्रदूषण वाढत आहे. सतत जल आणि वायू प्रदूषणाच्या घटना, तसेच किनारपट्टीवर सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित रासायनिक पाण्याविरोधात अनेक मोर्चे, आंदोलने तारापूरच्या एमपीसीबी, एमआयडीसी, सीईटीपीच्या कार्यालयावर नेण्यात आले होते. मात्र, क्लोजर नोटीस आणि काही हजारांचा दंड भरून या कंपन्या पुन्हा प्रदूषण करण्यास मोकळ्या होत आहेत. 

सांडपाणी प्रक्रियेची पाइपलाइन थेट समुद्रात 

या प्रकरणात तारापूर औद्योगिक वसाहतीच्या (टिमा) माजी अध्यक्षांनाच प्रदूषणाबाबत नोटीस बजावण्यात आल्याच्या घटनेने प्रदूषण रोखणाऱ्यांचाच प्रदूषणात सहभाग दिसून आला होता. एमआयडीसीमधील औद्योगिक वसाहतीमधून उत्पादन वाढल्याने प्रक्रिया केंद्र उभारण्याला मंजुरी मिळाल्यानंतर ३५  एमएलडी क्षमतेऐवजी ५० एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रियेची पाइपलाइन थेट समुद्रात ७.१ किमी इतक्या खोल टाकली जात आहे. त्यामुळे शनिवारी नवापूरच्या किनाऱ्यावर असलेल्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषित पाणी समुद्रात सोडले जात असल्याची बाब कोस्ट गार्डने आपल्या हेलिकॉप्टरमधून घेतलेल्या छायाचित्रांमुळे जगासमोर आली आहे. 

हरित लवादात अनेकदा सुनावणी 

अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवाद, पुणे येथे याचिका दाखल केली आहे. हरित लवादात अनेक वेळा सुनावण्या झाल्यानंतरही तारापूर औद्योगिक वसाहतींमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात असल्याचे वास्तव याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान पटवून दिल्यावर लवादाने आयआयएम आणि आयआयटी -अहमदाबाद, निरी, एमपीसीबी, सीपीसीबीच्या तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली.

१६० कोटींचा ठोठावला होता दंड 

समितीने प्रदूषणाबाबत सादर केलेल्या अहवालातील गंभीर बाबींवर टिमा आणि टीईपीएसच्या वकिलांनी १७ सप्टेंबर २०२० रोजी ऑनलाइन झालेल्या सुनावणीदरम्यान नोंदविलेले आक्षेप हरित लवादाने फेटाळून लावले होते. दरम्यान, हरित लवादाने एमआयडीसीमधील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना १६० कोटींचा दंड ठोठावला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :palgharपालघर