शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

तलासरी तालुक्यात शाळा झाल्या सुरू, मात्र शिक्षकांची कोविड तपासणी बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:48 IST

तलासरी तालुक्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून सुरु करण्यात आले आहेत. परंतु, वर्ग सुरू झाले असले तरी शिक्षकांची कोरोना चाचणी होणे बाकी आहे.

- सुरेश काटेतलासरी -  तलासरी तालुक्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून सुरु करण्यात आले आहेत. परंतु, वर्ग सुरू झाले असले तरी शिक्षकांची कोरोना चाचणी होणे बाकी आहे. तलासरीसह ग्रामीण भागातील अनेक शिक्षकांची ही चाचणी झाली नसल्याची बाब समोर आली असून, या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.तलासरीतील जिल्हा परिषद आणि इतर अशा २०६ शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. परंतु, या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वी होणे अपेक्षित होते. शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे शिक्षकांनी दिनांक २५ ते ३० जानेवारीपर्यंत कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश काढले आहेत. तलासरी येथील नवनिर्मित आदिवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीमध्ये तालुक्यातील शिक्षकांचे आरोग्य विभागामार्फत आरटीपीसीआर तपासणीसाठी नमुने घेण्यात येत आहेत. यासाठी शिक्षकांना आदल्या दिवशी नावाची नोंदणी करून दुसऱ्या दिवशी तपासणीसाठी बोलविण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी फक्त ९० जणांचे स्वॅब घेतले जात असल्याने चाचणीसाठी स्वॅब दिलेल्या शिक्षकांना अहवाल प्राप्त होईपर्यंत शाळेत हजर होता येणार का, याविषयी संभ्रम आहे.  चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत करायचे काय, याबाबत काहीही सांगण्यात आले नसल्याने शिक्षण विभागाच्या नियोजन अभावाचा त्रास शिक्षकांना भोगावा लागत आहे. याबाबत शिक्षक संघटनेचे दत्तात्रय कोम यांनी नाराजी व्यक्त करत शाळा सुरू होण्याअगोदरच कोविड चाचणी घेणे अपेक्षित होते, परंतु शिक्षण विभागाचे कसलेही नियोजन नसल्याने शिक्षकांना अहवाल प्राप्त झाल्यावरच शाळेत हजर होता येणार असल्याचे सांगितले. दररोज ९० जणांचे स्वॅब शिक्षकांना आदल्या दिवशी नावाची नोंदणी करून दुसऱ्या दिवशी तपासणीसाठी बोलविण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी फक्त ९० जणांचे स्वॅब घेतले जात आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSchoolशाळा