शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

वाड्यात ‘श्रमजीवी’चा सत्याग्रह; गारगाई धरण प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:39 IST

पिढ्यान्पिढ्या वहिवाट असलेले आदिवासी होणार बेदखल

वाडा : गारगाई या बहुचर्चित धरणाच्या उभारणीत सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात असून या धरणामध्ये सुमारे ८३० हेक्टर जमीन जाणार आहे. मात्र यातील बहुतांश जमीन ही सरकारी असल्याने व यावर वास्तव्य तसेच वनपट्ट्याद्वारे शेती करून आपली उपजीविका करणाऱ्या बाधितांना शासनाने गृहीत धरलेले नाही. ज्याचा परिणाम येथे पिढ्यान्पिढ्या वहिवाट असलेले आदिवासी बेदखल होणार आहेत. याबाबत न्याय मागण्यासाठी वाडा तालुक्यातील बाधित आदिवासींनी वाडा प्रांत कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन पुकारले.

गारगाई धरण हे मुंबईला पाणी पुरविण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडणार असल्याने सध्या या धरणाच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ४४० दशलक्ष पाणी मुंबईला पुरविणाºया गारगाई धरणांतर्गत वाडा तालुक्यातील ओगदे, खोडदे, तिळमाळ, पाचघर, फणसपाडा, आमले अशा गावातील ८३० हेक्टर जमीन बाधित असून ६११ हेक्टर जमीन सरकारी तर २१८ हेक्टर क्षेत्र खाजगी आहे. सरकारी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात येथील स्थानिक आदिवासी वनपट्ट्याद्वारे शेती करीत असल्याने धरण उभारणीनंतर सरकारी क्षेत्रावरील आदिवासींची उपासमार होईल.

पुनर्वसन प्रक्रियेत एकाच घरात राहणाºया स्वतंत्र कुटुंबांची वेगवेगळी नोंद करून घ्यावी, मात्र पुनर्वसन कुटुंबांची होत असलेल्या नोंदणी प्रक्रियेबाबत व मिळणाºया लाभाबाबत लोकांना संशय आहे. शिवाय बधितांचे पुनर्वसन वाडा येथील देवळी गावाजवळ असलेल्या वन जमिनीवर होणार असून यातील बहुतांश जागा वनपट्ट्याद्वारे येथील आदिवासींच्या ताब्यात आहे. मग या जागी बाधितांचे पुनर्वसन करणार कसे? असा सवाल केला जात आहे.

अन्याय होण्याची आदिवासींना भीती

गागारगाई धरणाच्या बाधित आदिवासींवर अन्याय होणार असल्याची भीती असल्याने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सोमवारी वाडा प्रांत कार्यालयासमोर शेकडो बाधितांनी आपल्या कुटुंबासह सत्याग्रह आंदोलन पुकारले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र