शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

अनवाणी मुलांना पादत्राणे देणारा खाकी वर्दीतला ‘सांताक्लॉज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:07 IST

कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारा कणखर पोलीस अधिकारी जर कनवाळुपणाने वागत असेल, तर खरेच आश्चर्य वाटते. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी तळमळ केवळ बोलायला व ऐकायला बरी वाटते, पण प्रत्यक्ष ती आचरणात आणणे आणि ते ही रोजच्या ड्युटीमध्ये हे अशक्यच.

- अजय महाडीकमुंबई - कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारा कणखर पोलीस अधिकारी जर कनवाळुपणाने वागत असेल, तर खरेच आश्चर्य वाटते. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी तळमळ केवळ बोलायला व ऐकायला बरी वाटते, पण प्रत्यक्ष ती आचरणात आणणे आणि ते ही रोजच्या ड्युटीमध्ये हे अशक्यच. मात्र, विक्रमगडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी आपल्या कृतीतून तसा आदर्शच घडवून दिला आहे.गत १७ वर्षांपासून ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी भागांत नोकरी करतांना शाळकरी मुलांच्या पायांत चप्पल नसते, ही बाब त्यांच्या मनाला स्पर्श करून गेली. खास करून, सफाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक असतांना पालघरच्या आदिवासी भागांतील विदारकता हेरून त्यांनीआपल्या सरकारी जीपमध्ये मागच्या बाजूला साधारण पाच ते १२ वर्षांच्या मुलामुलींना होतील, असे चप्पल-बुटांचे १०-१५ जोड ठेवणे आणि पेट्रोलिंग करतांना गावपाड्यांवर कुणी विद्यार्थी अनवाणी दिसल्यास गाडी थांबवून त्याच्या पायांत ती घालणे हे नित्याचेच बनले आहे. त्यावेळी चांगला अभ्यास करेन हे प्रॉमिस घेण्यास मात्र ते विसरत नाहीत.विक्रमगड पोलीस स्टेशनच्या पाठीमागे एका खोलीतील कोपऱ्यात नव्याकोºया चप्पल-बुटांच्या खोक्यांची उतरंड पाहायला मिळते. येथल्या पोलीस ठाण्यात रोज काही फार गंभीर तक्रारी नसतात. नवराबायकोची भांडणे, शेतीच्या बांधावरून होणारे वाद, याचेच प्रमाण तुलनेने अधिक असते. त्यामुळे कामही कमी असते. यावेळी आईवडिलांसह जी मुलेमुली पोलीस स्टेशनमध्ये येत असतात. तेव्हा त्यांच्या तक्रारी ऐकतांना त्यांच्या नजरेतून या मुलांच्या पायांचे अनवाणीपण सुटत नाही आणि लगेचच सरकारी जीप किंवा मागच्या रूममधील चप्पल-बुटांचे जोड आणले जातात.पाटील यांच्या या उपक्रमाची माहिती त्यांच्या संपर्कात येणाºया ज्यांनाज्यांना कळाली, तेव्हा तेही सहभागी झाले पोलीस स्टेशनमधील त्यांच्या सहकाºयांनाही त्यांच्या बांधीलकीचे कौतुक वाटते आहे. आतापर्यंत पनवेल येथील रसायनी , राजगड गुन्हे अन्वेषण शाखा, राजापूर, रत्नागिरी एलसीबी, शहापूर, सफाळा, बोईसर, सातपाटी आणि आता विक्रमगड पोलीस स्टेशन असा त्यांच्या समाजसेवेचा अनोखा प्रवास आहे.त्यांचे बोलके डोळे खूप काही सांगतात...आदिवासी समाजातील ही मुले अनोळखी व्यक्तींशी कमी बोलणारी व लाजाळू असतात त्यांच्या पायांत चप्पल व बूट घातल्यावर त्यांच्या चेहºयावर उमटणारा आनंद खूपच बोलका असतो. चमकत्या डोळ्यांतून व्यक्त होणारी आपुलकी खूप काही सांगून जाते. पूर्वी पोलीस जीप दिसल्यावर पळणारी ही पाड्यावरची मुले आता रस्त्यावर उभे राहून हात उंचावून आपला आनंद प्रकट करतात. काही जण जवळ येऊन थँक यू, असे इंग्रजीत म्हणू लागल्याचे ते भरभरून सांगतात.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार