शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

उरलीसुरली भातशेतीही गेली, विक्रमगडमध्ये मुसळधार पाऊस, पिके कुजून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:20 AM

अवकाळी पावसापाठोपाठ पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यात झाला.

विक्रमगड : अवकाळी पावसापाठोपाठ पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यात झाला. वातावरणात झालेल्या बदलामुळे शनिवार पहाटेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे थोडीफार उरलेली भातशेतीही वाया गेली असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.आधीच अवकाळी पावसाने विक्रमगड तालुक्यासह जिल्ह्यातील भातपिकाचे पूर्णपणे नुकसान केले होते. त्यातच शेतात भिजलेले, कोंब आलेले भातपिक शेतकऱ्यांनाही गोळा करून खळ्यात किंवा घरात आणून ठेवले होते. मात्र पुन्हा पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही पाण्यात गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.दिवाळीआधी पूर्ण पिकलेली भातशेती पावसामुळे कापता आली नव्हती. मात्र सतत पडत असलेल्या पावसाने ही पीके जमिनीवर लोळली. तसेच सतत पडणाºया पावसानेही भातशेती भिजल्याने त्याला कोंब फुटले तर काही दाणे कुजून गेले. त्यातच भाताचा पेंढा पूर्ण वाया गेला आहे. काही दिवस पडलेल्या उन्हामुळे शेतकºयांनी शेतातील जसे होते तसे पीक खळ्यात किंवा घरात आणून ठेवले. मात्र खळ्यात आणलेले भातपिक पुन्हा एकदा भिजले तर काही शेतकºयांनी ताडपत्री, प्लास्टिकच्या मदतीने ते झाकले होते. सतत कोसळणाºया पावसामुळे भातशेती पाण्यात गेली आहे. शेतकºयांचा सगळा खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पिके कापली तर रोजच पाऊस. त्यामुळे ही पीके सुकवायची कशी असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. जव्हार, मोखाड्यात नागली, वरई या पिकांवर कुटुंबे सर्वाधिक अवलंबून असतात. त्यातच ही पीके हंगामी घेतली जातात. या वर्षी शेती गेली, रोजगार मिळत नाही, त्यामुळे करायचे काय? असा शेतकºयांना प्रश्न पडला आहे.