शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

दर सोमवारी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:31 IST

पालघर जिल्हाधिकारी : पत्रकारांशी साधला संवाद

पालघर : जिल्ह्यातील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी वर्ग भेटत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने आता प्रत्येक सोमवारी मुख्य अधिकाºयाने जिल्हा मुख्यालय सोडू नये, असे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील काही समस्या आणि महत्त्वपूर्ण बाबी पत्रकारांकडून समजून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मनोर - विक्रमगड रस्त्याची झालेली दुरवस्था, कुपोषण तसेच रोजगाराची समस्या, त्यातून होणाºया आत्महत्या, रेशन बायोमेट्रिकचा प्रश्न असे अनेक प्रश्न समोर आले.पायाभूत सुविधा प्रकल्प, आरोग्य पोषण आहार, कुपोषण निर्मूलन यासोबतच शेती आणि शेतीशी निगडित रोजगार निर्मितीवर माझा प्राधान्यक्र म असेल असे यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले. भात कापणी झाल्यावर रोजगाराच्या शोधार्थ होणारे स्थलांतर आणि मग कुपोषण ही प्रशासनासाठी चिंतेची ठरलेली बाब रोखण्यासाठी २५ हजार शेतकºयांसाठी फळझाडे लागवड, हरभरा, चवळी आदी उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे सांगितले. तसेच मनरेगा व इतर योजनांच्या साहय्याने रोजगार निर्मितीवर आपण भर देणार असून जिल्हा परिषद शाळातील गुणवत्ता वाढीसाठी सातारा येथे राबविलेला गुणवत्ता सुधार कार्यक्रम इथे राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय व आरोग्य तपासणी नियमितपणे होण्यावर आपले लक्ष राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.घेतली समस्यांची माहितीच्जिल्ह्यात ९ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रूग्णालये, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३०६ उपकेंद्रे एवढी मोठी सशक्त आरोग्य यंत्रणा असताना इथल्या रुग्णांचा विश्वास मात्र वापी आणि सिल्वासा येथील सरकारी रुग्णालयावर जास्त असतो.च्जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे असलेले आव्हान, तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषण, पालघर नगरपरिषदेतील भ्रष्टाचार, शहरातील वाहतूक कोंडी, जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न, आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची आदी जिल्ह्यात भेडसावणाºया अनेक समस्यांची माहिती जिल्हाधिकाºयांनी करून घेतली.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार