शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

रावण दहन कराल तर अ‍ॅट्रोसिटी, श्रमिक संघर्ष संघटनेचा गुन्हे दाखल करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 03:26 IST

रावण, महिषासूर ह्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने दाखावल्याने त्यांच्या प्रतिमांचे दस-याच्या दिवशी दहन करण्याची प्रथा या वर्षीपासून थांबविण्याची विनंती आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

- हितेंन नाईकपालघर : रावण, महिषासूर ह्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने दाखावल्याने त्यांच्या प्रतिमांचे दस-याच्या दिवशी दहन करण्याची प्रथा या वर्षीपासून थांबविण्याची विनंती आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. तसा प्रयत्न कोणी केल्यास त्याच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा या संघटनेने दिल्याने दसºयाला जिल्ह्यात होणारे रावण दहनाचे कार्यक्रम अडचणीत सापडले असून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही या कडे प्रशासनाला लक्ष पुरवावे लागणार आहे.देशभर दसºयाला रावण आणि महिषासुर या दैत्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्याची प्रथा वर्षानुवर्षा पासून सुरू आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान, मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित असतात. तत्कालीन उपपंतप्रधान अडवाणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पेटता बाण सोडून रावणाच्या प्रतिमेचे दहनही केलेले आहे. मात्र श्रमिक संघटनेने केलेल्या मागणीने एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले असून प्रशासनाला यातून मार्ग काढण्याची कसरत करावी लागणार आहे.रावण, महिषासुर ह्या दोघांचे वैश्विक ज्ञान, राजकारण, समाजकारण, संस्कृती, कला आणि विद्येवरचे प्रभुत्व हे समाजा करीत अभिमानास्पद आहे. म्हणून आदिवासी समाजाचे ते वंदनीय राजे असल्याचा अभिमान आम्हाला असताना काही असामाजिक तत्त्वांनी काही कारणास्तव त्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने रंगविल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्हा आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्या असून रावण दहनाच्या प्रथेचे आम्ही कदापि समर्थन करणार नाही. त्यामुळे ह्या बाबत जिल्हाधिकाºयांनी न्यायालयाने केलेल्या सूचनांची पडताळणी करावी अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी पत्राद्वारे केली आहे. याउपरही जर कोणी दहनाचा प्रयत्न केल्यास संघटना त्याचा तीव्र निषेध करेल आणि जे आमच्या भावना दुखावतील त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत आणि १९६०च्या भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केले जातील असा इशारा देण्यात आला आहे.दोन्ही लोकांना एकत्र बोलावून सण आनंदात साजरा करण्याचा दृष्टीने ह्यातून शांततामय मार्ग काढू.- महेश सागर, तहसीलदारकायदा व सुव्यवस्था कोणी बिघडवणार नाही ह्याकडे आपली जातीने लक्ष देऊ.- किरण कबाडी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालघर

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७