शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रावण दहन कराल तर अ‍ॅट्रोसिटी, श्रमिक संघर्ष संघटनेचा गुन्हे दाखल करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 03:26 IST

रावण, महिषासूर ह्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने दाखावल्याने त्यांच्या प्रतिमांचे दस-याच्या दिवशी दहन करण्याची प्रथा या वर्षीपासून थांबविण्याची विनंती आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

- हितेंन नाईकपालघर : रावण, महिषासूर ह्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने दाखावल्याने त्यांच्या प्रतिमांचे दस-याच्या दिवशी दहन करण्याची प्रथा या वर्षीपासून थांबविण्याची विनंती आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. तसा प्रयत्न कोणी केल्यास त्याच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा या संघटनेने दिल्याने दसºयाला जिल्ह्यात होणारे रावण दहनाचे कार्यक्रम अडचणीत सापडले असून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही या कडे प्रशासनाला लक्ष पुरवावे लागणार आहे.देशभर दसºयाला रावण आणि महिषासुर या दैत्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्याची प्रथा वर्षानुवर्षा पासून सुरू आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान, मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित असतात. तत्कालीन उपपंतप्रधान अडवाणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पेटता बाण सोडून रावणाच्या प्रतिमेचे दहनही केलेले आहे. मात्र श्रमिक संघटनेने केलेल्या मागणीने एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले असून प्रशासनाला यातून मार्ग काढण्याची कसरत करावी लागणार आहे.रावण, महिषासुर ह्या दोघांचे वैश्विक ज्ञान, राजकारण, समाजकारण, संस्कृती, कला आणि विद्येवरचे प्रभुत्व हे समाजा करीत अभिमानास्पद आहे. म्हणून आदिवासी समाजाचे ते वंदनीय राजे असल्याचा अभिमान आम्हाला असताना काही असामाजिक तत्त्वांनी काही कारणास्तव त्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने रंगविल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्हा आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्या असून रावण दहनाच्या प्रथेचे आम्ही कदापि समर्थन करणार नाही. त्यामुळे ह्या बाबत जिल्हाधिकाºयांनी न्यायालयाने केलेल्या सूचनांची पडताळणी करावी अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी पत्राद्वारे केली आहे. याउपरही जर कोणी दहनाचा प्रयत्न केल्यास संघटना त्याचा तीव्र निषेध करेल आणि जे आमच्या भावना दुखावतील त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत आणि १९६०च्या भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केले जातील असा इशारा देण्यात आला आहे.दोन्ही लोकांना एकत्र बोलावून सण आनंदात साजरा करण्याचा दृष्टीने ह्यातून शांततामय मार्ग काढू.- महेश सागर, तहसीलदारकायदा व सुव्यवस्था कोणी बिघडवणार नाही ह्याकडे आपली जातीने लक्ष देऊ.- किरण कबाडी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालघर

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७