शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पालघरमधील वाढलेले मतदार कुणापाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:12 IST

दीड लाखाची वाढ ठरणार निकाल फिरवणारी

- हितेन नाईकपालघर : पालघर लोकसभेच्या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात असून २०१८ साली झालेल्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत ८.९ टक्क्यानी मतांच्या टक्क्यात म्हणजेच १ लाख ५४ हजार २२० मतांची वाढ झालेली असून या वाढलेल्या मतदार टक्क्यांचा फायदा नेमका कोण उठवणार यावर उमेदवारांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.पालघर लोकसभेचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार असून एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. ह्यात ७ उमेदवार राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असून ५ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. पालघर लोकसभेची २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एकूण १७ लाख ३१ हजार ७७ मतदार होते. तर आता झालेल्या नवीन मतदारांच्या नोंदणी नंतर १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांची नोंद झाल्याची माहिती निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे १ लाख ५४ हजार २२० नवीन मतदारांची नोंद करण्यात आलेली आहे.२०१८ च्या पोट निवडणुकीत भाजप कडून राजेंद्र गावित (२ लाख ७२ हजार ७८२ मते), शिवसेनेचे श्रीनिवास वणगा यांना (२ लाख ४३ हजार २१० मते) तर बहुजन विकास आघाडी चे उमेदवार बळीराम जाधव यांना (२ लाख २२ हजार ८३८ मते) मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि सेना एकत्र लढत असून त्यांची मतांची बेरीज ५ लाख १५ हजार ९९२ इतकी भरत असून बविआ च्या उमेदवारा दरम्यान ची तफावत पाहता ती २ लाख ९३ हजार १५४ इतकी भरते. भाजप-शिवसेना महायुतीची पालघर,अर्धे बोईसर,डहाणू,विक्र मगड विधानसभेमध्ये मोठी ताकद असून २०१८ च्या पोट निवडणुकीत सेना-भाजप च्या दोन्ही उमेदवाराला एकूण ३ लाख ९७ हजार ९३२ मते मिळाली होती तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव ह्यांना अवघी ७९ हजार २२३ मते मिळाली होती.त्यामुळे ३ लाख १८ हजार ७४९ मतांचा मोठा फरक दोन्ही उमेदवारांच्या दरम्यान होता. बविआ चा बालेकिल्ला असणाऱ्या वसई व नालासोपारा या विधानसभा क्षेत्रात युतीच्या दोन्ही उमेदवारांना १ लाख १८ हजार ०५४ मते तर बविआ उमेदवाराला १ लाख ४३ हजार ६१२ मते पडली होती. यात फक्त २५ हजार ५५८ हजाराच्या मतांचा फरक असल्याचे दिसून येत आहे.८२ हजारांचा फरक युती-आघाडीची चुरसवर्ष २०१९ मध्ये नव्याने मतदान नोंदणी मध्ये वाढलेल्या १ लाख ५४ हजार २२० मतदारा पैकी १ लाख १९ हजार ४१७ एवढे मतदार हे बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असलेल्या बोईसर, नालासोपारा व वसई या विधानसभा मतदार संघात वाढले असून पालघर, डहाणू आणि विक्र मगड या महायुतीचे आमदार असलेल्या विधानसभा मतदार संघात फक्त ४८ हजार ८७४ नवीन मतदारांची वाढ झालेली आहे.त्यामुळे साधारण पणे ८२ हजार मतांचा फरक दोन्ही उमेदवारांमध्ये दिसून येत असल्याने हा फरक भरून काढण्यासाठी बविआ कामाला लागली आहे.तर जास्तीत जास्त मतदारांना महायुती कडे वळविण्या साठी महायुतीच्या मातब्बरांच्या प्रचार सभा सुरु आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरVotingमतदान