शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

पावसामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम, मुंबईतील तबेल्यांनाही बसणार झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:02 IST

भाताची पावळी भिजल्याने गवत व्यापारी संकटात : मुंबईतील तबेल्यांनाही बसणार झळ

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : परतीच्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले असून शेती आणि शेतीपूरक व्यवसायावरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. दरम्यान, भाताची पावळी भिजल्याने डहाणूच्या चिकू वाडीतील दुग्ध व्यवसाय आणि मुंबईतील तबेल्यांनाही त्याचा फटका बसणार आहे.

डहाणू तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपातील भात पीक घेतले जाते. गेल्या आठवड्यात परतीचा पाऊस झाल्यानंतर हळवे, गरवे आणि निमगरवे या तिन्ही प्रकारच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. ज्याप्रमाणे भाताच्या दाण्यांचे नुकसान झाले तसाच फटका पावळीलाही बसला आहे. भिजलेल्या पावळीला बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ते काळपट पडून दीर्घकाळ साठवण्यास अयोग्य ठरतात. त्यामुळे पावळी शेतकरी आणि गवत व्यापाऱ्यांना योग्य दर मिळणार नाही. शिवाय त्याचा थेट प्रभाव दुग्ध व्यवसायावरही होणार आहे. ही ओली पावळी खाण्यास गाई -म्हशी नापसंती दाखवत असल्याने दुधाचे प्रमाण घटते. त्यांच्यात पचनक्रि येसंदर्भातील पोटाचे विकार बळावतात. काही दिवसांपासून ओली पावळी खाल्ल्याने शेण पातळ झाले असून दुधातही घट जाणवत असल्याची माहिती स्थानिक दुग्ध व्यावसायिकांनी दिली.डहाणू तालुक्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर चिकू फळ बागांचे क्षेत्र आहे. मुबलक पाणी, पावळीच्या माध्यमातून मिळणारा सुका चारा तसेच बागायतीसह भाजीपाला लागवडीमुळे दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक ओला चारा उपलब्ध होतो. त्यामुळे गुजरात राज्यातील दुग्ध व्यावसायिक चिकू वाडीत येऊन हा व्यवसाय करतात. त्या बदल्यात बागायतदारांना शेण दिले जाते. जनावरांसाठी गोठा, पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध केल्याच्या बदल्यात शेणविक्रीद्वारे त्यांना चांगला फायदा मिळतो. शिवाय बागायतीला खताचा मुबलक पुरवठा होतो. त्यामुळे काही दशकांपासून चिकू वाडीतील दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला आहे.दरम्यान, डहाणू आणि तलासरी तालुक्यात भात शेती कसण्याला सामाजिक प्रतिष्ठेतून पाहिले जाते. त्यामुळे अल्प, अत्यल्प भूधारक, बागायतदार किंवा नोकरी, व्यवसाय करणारे सर्वच समाजघटक भात शेती करतात. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पावळी आणि गवताचा व्यवसाय केला जातो. या पेंढ्यांना मशीनद्वारे प्रेस करून त्यांचे बंडल बांधून निर्यात केले जाते. वसई, ठाणे, मुंबई येथील तबेल्यांची सुक्या चाºयाची भिस्त डहाणूसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गवत व्यापारावर अवलंबून आहे. अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाल्याने यंदा मात्र दुग्ध व्यवसायावरही त्याचा परिणाम होईल.स्थानिकांना रोजगारच्दुभत्या जनावरांना ओला आणि सुका चारा आवश्यक असतो. फक्त ओला चारा खाल्यास त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊन दुधात घट होते. एक म्हैस प्रतिदिन ५ किलो सुका चारा म्हणून पावळी खाते. क्षमतेनुसार १२ ते १८ ली. दूध देते. चिकू वाडीत ओला आणि सुका चारा वर्षभर मुबलक मिळतो. याकरिता गुजरातराज्यातील दुग्ध व्यावसायिक याला प्राधान्य देतात.च्गुजरात, ठाणे, मुंबई येथे गवत निर्यातीद्वारे शेतकऱ्यांना पावळीला प्रती किलो किमान ३ रु. भाव मिळतो. एप्रिल ते मे या काळात गतवर्षी तो १५ रुपये झाला होता. भात पिकाचा एकूण उत्पादन खर्च कमी करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे तर शेतीसह गवत व्यवसाय केल्याने ती परवडणारी ठरते. तसेच स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध होतो.परतीच्या पावसाने ओली झालेली पावळी दुभती जनावरे कमी प्रमाणात खातात. त्यामुळे दुधात घट झाली. त्यांच्या पचनप्रक्रि येत बिघाड होऊन शेण पातळ झाले. माझ्याकडे १४ म्हशी आणि ३ गाई आहेत. त्यांच्यापासून प्रतिदिन सरासरी १२० लीटर दूध मिळते. ओली पावळी खाल्याने रोज चार लिटर दूध कमी झाले असून त्याची आर्थिक झळ व्यवसायाला बसत आहे.- अमृत रबारी, गुजरातहून येऊन, बोर्डीतील चिकू वाडीत दुग्ध व्यवसाय करणारा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार