शहरं
Join us  
Trending Stories
1
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
2
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
3
विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
4
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
5
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
6
Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
7
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
8
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
9
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
10
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
11
Stock Market Today: कमकुवत सुरुवातीनंतर शेअर बाजारात वाढ, निफ्टीत ३० अंकांची तेजी; FMCG इंडेक्स आजही घसरला
12
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
13
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
14
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
15
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
16
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
17
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
18
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
19
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
20
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम, मुंबईतील तबेल्यांनाही बसणार झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:02 IST

भाताची पावळी भिजल्याने गवत व्यापारी संकटात : मुंबईतील तबेल्यांनाही बसणार झळ

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : परतीच्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले असून शेती आणि शेतीपूरक व्यवसायावरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. दरम्यान, भाताची पावळी भिजल्याने डहाणूच्या चिकू वाडीतील दुग्ध व्यवसाय आणि मुंबईतील तबेल्यांनाही त्याचा फटका बसणार आहे.

डहाणू तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपातील भात पीक घेतले जाते. गेल्या आठवड्यात परतीचा पाऊस झाल्यानंतर हळवे, गरवे आणि निमगरवे या तिन्ही प्रकारच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. ज्याप्रमाणे भाताच्या दाण्यांचे नुकसान झाले तसाच फटका पावळीलाही बसला आहे. भिजलेल्या पावळीला बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ते काळपट पडून दीर्घकाळ साठवण्यास अयोग्य ठरतात. त्यामुळे पावळी शेतकरी आणि गवत व्यापाऱ्यांना योग्य दर मिळणार नाही. शिवाय त्याचा थेट प्रभाव दुग्ध व्यवसायावरही होणार आहे. ही ओली पावळी खाण्यास गाई -म्हशी नापसंती दाखवत असल्याने दुधाचे प्रमाण घटते. त्यांच्यात पचनक्रि येसंदर्भातील पोटाचे विकार बळावतात. काही दिवसांपासून ओली पावळी खाल्ल्याने शेण पातळ झाले असून दुधातही घट जाणवत असल्याची माहिती स्थानिक दुग्ध व्यावसायिकांनी दिली.डहाणू तालुक्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर चिकू फळ बागांचे क्षेत्र आहे. मुबलक पाणी, पावळीच्या माध्यमातून मिळणारा सुका चारा तसेच बागायतीसह भाजीपाला लागवडीमुळे दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक ओला चारा उपलब्ध होतो. त्यामुळे गुजरात राज्यातील दुग्ध व्यावसायिक चिकू वाडीत येऊन हा व्यवसाय करतात. त्या बदल्यात बागायतदारांना शेण दिले जाते. जनावरांसाठी गोठा, पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध केल्याच्या बदल्यात शेणविक्रीद्वारे त्यांना चांगला फायदा मिळतो. शिवाय बागायतीला खताचा मुबलक पुरवठा होतो. त्यामुळे काही दशकांपासून चिकू वाडीतील दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला आहे.दरम्यान, डहाणू आणि तलासरी तालुक्यात भात शेती कसण्याला सामाजिक प्रतिष्ठेतून पाहिले जाते. त्यामुळे अल्प, अत्यल्प भूधारक, बागायतदार किंवा नोकरी, व्यवसाय करणारे सर्वच समाजघटक भात शेती करतात. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पावळी आणि गवताचा व्यवसाय केला जातो. या पेंढ्यांना मशीनद्वारे प्रेस करून त्यांचे बंडल बांधून निर्यात केले जाते. वसई, ठाणे, मुंबई येथील तबेल्यांची सुक्या चाºयाची भिस्त डहाणूसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गवत व्यापारावर अवलंबून आहे. अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाल्याने यंदा मात्र दुग्ध व्यवसायावरही त्याचा परिणाम होईल.स्थानिकांना रोजगारच्दुभत्या जनावरांना ओला आणि सुका चारा आवश्यक असतो. फक्त ओला चारा खाल्यास त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊन दुधात घट होते. एक म्हैस प्रतिदिन ५ किलो सुका चारा म्हणून पावळी खाते. क्षमतेनुसार १२ ते १८ ली. दूध देते. चिकू वाडीत ओला आणि सुका चारा वर्षभर मुबलक मिळतो. याकरिता गुजरातराज्यातील दुग्ध व्यावसायिक याला प्राधान्य देतात.च्गुजरात, ठाणे, मुंबई येथे गवत निर्यातीद्वारे शेतकऱ्यांना पावळीला प्रती किलो किमान ३ रु. भाव मिळतो. एप्रिल ते मे या काळात गतवर्षी तो १५ रुपये झाला होता. भात पिकाचा एकूण उत्पादन खर्च कमी करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे तर शेतीसह गवत व्यवसाय केल्याने ती परवडणारी ठरते. तसेच स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध होतो.परतीच्या पावसाने ओली झालेली पावळी दुभती जनावरे कमी प्रमाणात खातात. त्यामुळे दुधात घट झाली. त्यांच्या पचनप्रक्रि येत बिघाड होऊन शेण पातळ झाले. माझ्याकडे १४ म्हशी आणि ३ गाई आहेत. त्यांच्यापासून प्रतिदिन सरासरी १२० लीटर दूध मिळते. ओली पावळी खाल्याने रोज चार लिटर दूध कमी झाले असून त्याची आर्थिक झळ व्यवसायाला बसत आहे.- अमृत रबारी, गुजरातहून येऊन, बोर्डीतील चिकू वाडीत दुग्ध व्यवसाय करणारा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार