शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पावसाने भातपीक गेले वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 06:05 IST

मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला समस्यांचा डोंगर

बदलापूर : मुरबाड तालुक्यातील भातपिकांच्या नुकसानीची पाहणी आमदार किसन कथोरे यांनी केली. गेल्या दोन दिवसांपासून पडणाºया पावसामुळे मुरबाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापून ठेवलेले भातपीक वाया गेले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी कथोरे यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी विधानसभेसाठी मतदान झाल्यावर सर्वच उमेदवार हे आराम करण्यासाठी अज्ञातस्थळी गेले आहेत. दोन दिवस आराम करून पुन्हा मतमोजणीला हजर राहण्याची तयारी सर्वच उमेदवार करत आहेत. मात्र, मुरबाड मतदारसंघातील आमदार यांनी गेल्या दोन दिवसांपासून मुरबाडमधील शेतकºयांच्या नुकसानीचा पाहणी दौरा सुरू केला आहे.

मुरबाडमधील अनेक शेतकºयांनी दिवाळीपूर्वी भातपिकाची कापणी करून धान्य सुकविण्यासाठी शेतात ठेवले होते. मात्र, दोन दिवस झालेल्या पावसामुळे हे सर्व धान्य पाण्यात भिजले आहे. त्यामुळे सुकलेल्या भागाला कोंब आले आहे. कोंब आलेले धान्य वाया गेले असून त्यामुळे शेतकºयांचे नुकसान झालेआहे.

ज्याज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे, त्यात्या शेतकºयांच्या नुकसानीची पाहणी कथोरे यांनी अधिकाऱ्यांसह केली. यासंदर्भात जिल्हा कृषी विभागाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. बुधवारी संपूर्ण दिवस कथोरे हे अधिकाºयांसह शेतकऱ्यांची भेट घेत होते. अधिकाºयांनीही मुरबाडमधील शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहे.

शेतकºयांची चिंता वाढली

अनगाव : परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भिंवडी तालुक्यात हळवे व गरवे अशी एकूण १८ हजार हेक्टर भात शेती आहे. त्यापैकी तीन हजार हेक्टर भातशेतीमध्ये हळवे पिक घेण्यात आले असून ते पिक तयार झाल्याने शेतकºयांनी दिवाळीपूर्वीच भातिपकाची कापणी करून ते घरात आणण्याची लगबग सुरू केली. मात्र परतीच्या पावसामुळे पिके पाण्यात तरंगू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. लाप, अस्नोली, साईगांव, खानिवली, कवाड, सोनटक्के, दिघाशी, वाघिवली, अनगाव, पिळझे, देपोली, निवली, चिंचवली येथे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

आसनगाव : अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले असल्याने ती देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल भेरे यांनी तहसीलदार निलीमा सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खरीप हंगामातील तयार झालेल्या भातपिकांच्या कापणीचे काम सुरू करून भात कापणी करून भातपिक शेतात सुकण्यासाठी पसरवून टाकले असताना सध्या पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे नुुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मतमोजणीत कर्मचारी गुंतलेले असल्याने शुक्र वारपासून पंचनामे करायला सुरूवात करावी अशी मागणी भेरे यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस