शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने भातपीक गेले वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 06:05 IST

मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला समस्यांचा डोंगर

बदलापूर : मुरबाड तालुक्यातील भातपिकांच्या नुकसानीची पाहणी आमदार किसन कथोरे यांनी केली. गेल्या दोन दिवसांपासून पडणाºया पावसामुळे मुरबाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापून ठेवलेले भातपीक वाया गेले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी कथोरे यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी विधानसभेसाठी मतदान झाल्यावर सर्वच उमेदवार हे आराम करण्यासाठी अज्ञातस्थळी गेले आहेत. दोन दिवस आराम करून पुन्हा मतमोजणीला हजर राहण्याची तयारी सर्वच उमेदवार करत आहेत. मात्र, मुरबाड मतदारसंघातील आमदार यांनी गेल्या दोन दिवसांपासून मुरबाडमधील शेतकºयांच्या नुकसानीचा पाहणी दौरा सुरू केला आहे.

मुरबाडमधील अनेक शेतकºयांनी दिवाळीपूर्वी भातपिकाची कापणी करून धान्य सुकविण्यासाठी शेतात ठेवले होते. मात्र, दोन दिवस झालेल्या पावसामुळे हे सर्व धान्य पाण्यात भिजले आहे. त्यामुळे सुकलेल्या भागाला कोंब आले आहे. कोंब आलेले धान्य वाया गेले असून त्यामुळे शेतकºयांचे नुकसान झालेआहे.

ज्याज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे, त्यात्या शेतकºयांच्या नुकसानीची पाहणी कथोरे यांनी अधिकाऱ्यांसह केली. यासंदर्भात जिल्हा कृषी विभागाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. बुधवारी संपूर्ण दिवस कथोरे हे अधिकाºयांसह शेतकऱ्यांची भेट घेत होते. अधिकाºयांनीही मुरबाडमधील शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहे.

शेतकºयांची चिंता वाढली

अनगाव : परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भिंवडी तालुक्यात हळवे व गरवे अशी एकूण १८ हजार हेक्टर भात शेती आहे. त्यापैकी तीन हजार हेक्टर भातशेतीमध्ये हळवे पिक घेण्यात आले असून ते पिक तयार झाल्याने शेतकºयांनी दिवाळीपूर्वीच भातिपकाची कापणी करून ते घरात आणण्याची लगबग सुरू केली. मात्र परतीच्या पावसामुळे पिके पाण्यात तरंगू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. लाप, अस्नोली, साईगांव, खानिवली, कवाड, सोनटक्के, दिघाशी, वाघिवली, अनगाव, पिळझे, देपोली, निवली, चिंचवली येथे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

आसनगाव : अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले असल्याने ती देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल भेरे यांनी तहसीलदार निलीमा सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खरीप हंगामातील तयार झालेल्या भातपिकांच्या कापणीचे काम सुरू करून भात कापणी करून भातपिक शेतात सुकण्यासाठी पसरवून टाकले असताना सध्या पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे नुुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मतमोजणीत कर्मचारी गुंतलेले असल्याने शुक्र वारपासून पंचनामे करायला सुरूवात करावी अशी मागणी भेरे यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस