शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

रब्बी हंगाम धोक्यात; पिकांवर अळ्या,किडे पडण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:46 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने व तो कापणीच्या व त्यानंतरही लांबल्याने अनेक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागले आहे़ खरीप हंगाम नाहीपेक्षा बरा गेला असे वाटत होते़ परंतु बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामाही धोक्यात आला आहे़

- राहुल वाडेकरविक्रमगड : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने व तो कापणीच्या व त्यानंतरही लांबल्याने अनेक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागले आहे़ खरीप हंगाम नाहीपेक्षा बरा गेला असे वाटत होते़ परंतु बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामाही धोक्यात आला आहे़गेल्या पंधरा दिवसांपासून मध्येच थंडीचे प्रमाण अधिक तर अचानक दोन दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामही अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळया किंवा किडे पडण्याची शक्यता असल्याने केलेली लागवडच वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे़ तर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़विक्रमगड तालुक्यात व परिसरात रब्बी पिकांचे मोठे क्षेत्र आहे़ या हंगामात शेतकरी मूग, हरभरा, वाल, उडीद, तूर या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, टॉमेटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक आदी पिके घेतात़ बहुतेकदा खरीप हंगामातील आर्थिक तूट रब्बी हंगामात भरुन काढली जाते़ यावर्षी पावसाला उशिराने सुरुवात झाल्याने खरीप रेंगाळला होता, त्यामुळे तालुक्यातील काही शेतक-यांनी भातशेतीची लवकर कापणी उरकून भाजीपाल्याची लागवड सुरु केली होती त्यामध्ये त्यांना सुरुवातीला व मध्यकाळात चांगले अर्थाजन देखील झाले मात्र आता हंगामाचा शेवटचा काळ निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आल्याचे शेतकºयांकडून बोलले जाते आहे़यंदा भातशेतीला पुरेसा ओलावा असतांनाच शेतक-यांनी भाजीपाल्याची लागवड केली, मूग, हरभरा यांची याची लागवड पूर्ण होऊन अंतिम टप्पा गाठला आहे़मात्र आता काही दिवस जास्त थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरणामुळे फळे व पिकांवर अळया, शेंडे, पोखरण्या-या अळया, किंवा पानांवर रसशोषक किडे पडण्याची भीती आहे़ या निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत़मी ही माझ्या शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे़ व या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा,फळे , शेंडे पोखरणाºया अळयांचा प्रादूर्भाव होऊ शकतो त्यामुळे शेतकºयांनी सकाळी १० वाजण्याच्या आत आणि सायंकाळी ४ नंतर अंतर फवारणी करणें गरजचे आहे़- बबन ओंदे, जाणकार शेतकरी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार