शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगाम धोक्यात; पिकांवर अळ्या,किडे पडण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:46 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने व तो कापणीच्या व त्यानंतरही लांबल्याने अनेक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागले आहे़ खरीप हंगाम नाहीपेक्षा बरा गेला असे वाटत होते़ परंतु बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामाही धोक्यात आला आहे़

- राहुल वाडेकरविक्रमगड : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने व तो कापणीच्या व त्यानंतरही लांबल्याने अनेक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागले आहे़ खरीप हंगाम नाहीपेक्षा बरा गेला असे वाटत होते़ परंतु बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामाही धोक्यात आला आहे़गेल्या पंधरा दिवसांपासून मध्येच थंडीचे प्रमाण अधिक तर अचानक दोन दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामही अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळया किंवा किडे पडण्याची शक्यता असल्याने केलेली लागवडच वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे़ तर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़विक्रमगड तालुक्यात व परिसरात रब्बी पिकांचे मोठे क्षेत्र आहे़ या हंगामात शेतकरी मूग, हरभरा, वाल, उडीद, तूर या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, टॉमेटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक आदी पिके घेतात़ बहुतेकदा खरीप हंगामातील आर्थिक तूट रब्बी हंगामात भरुन काढली जाते़ यावर्षी पावसाला उशिराने सुरुवात झाल्याने खरीप रेंगाळला होता, त्यामुळे तालुक्यातील काही शेतक-यांनी भातशेतीची लवकर कापणी उरकून भाजीपाल्याची लागवड सुरु केली होती त्यामध्ये त्यांना सुरुवातीला व मध्यकाळात चांगले अर्थाजन देखील झाले मात्र आता हंगामाचा शेवटचा काळ निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आल्याचे शेतकºयांकडून बोलले जाते आहे़यंदा भातशेतीला पुरेसा ओलावा असतांनाच शेतक-यांनी भाजीपाल्याची लागवड केली, मूग, हरभरा यांची याची लागवड पूर्ण होऊन अंतिम टप्पा गाठला आहे़मात्र आता काही दिवस जास्त थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरणामुळे फळे व पिकांवर अळया, शेंडे, पोखरण्या-या अळया, किंवा पानांवर रसशोषक किडे पडण्याची भीती आहे़ या निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत़मी ही माझ्या शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे़ व या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा,फळे , शेंडे पोखरणाºया अळयांचा प्रादूर्भाव होऊ शकतो त्यामुळे शेतकºयांनी सकाळी १० वाजण्याच्या आत आणि सायंकाळी ४ नंतर अंतर फवारणी करणें गरजचे आहे़- बबन ओंदे, जाणकार शेतकरी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार