शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगाम धोक्यात; पिकांवर अळ्या,किडे पडण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:46 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने व तो कापणीच्या व त्यानंतरही लांबल्याने अनेक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागले आहे़ खरीप हंगाम नाहीपेक्षा बरा गेला असे वाटत होते़ परंतु बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामाही धोक्यात आला आहे़

- राहुल वाडेकरविक्रमगड : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने व तो कापणीच्या व त्यानंतरही लांबल्याने अनेक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागले आहे़ खरीप हंगाम नाहीपेक्षा बरा गेला असे वाटत होते़ परंतु बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामाही धोक्यात आला आहे़गेल्या पंधरा दिवसांपासून मध्येच थंडीचे प्रमाण अधिक तर अचानक दोन दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामही अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळया किंवा किडे पडण्याची शक्यता असल्याने केलेली लागवडच वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे़ तर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़विक्रमगड तालुक्यात व परिसरात रब्बी पिकांचे मोठे क्षेत्र आहे़ या हंगामात शेतकरी मूग, हरभरा, वाल, उडीद, तूर या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, टॉमेटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक आदी पिके घेतात़ बहुतेकदा खरीप हंगामातील आर्थिक तूट रब्बी हंगामात भरुन काढली जाते़ यावर्षी पावसाला उशिराने सुरुवात झाल्याने खरीप रेंगाळला होता, त्यामुळे तालुक्यातील काही शेतक-यांनी भातशेतीची लवकर कापणी उरकून भाजीपाल्याची लागवड सुरु केली होती त्यामध्ये त्यांना सुरुवातीला व मध्यकाळात चांगले अर्थाजन देखील झाले मात्र आता हंगामाचा शेवटचा काळ निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आल्याचे शेतकºयांकडून बोलले जाते आहे़यंदा भातशेतीला पुरेसा ओलावा असतांनाच शेतक-यांनी भाजीपाल्याची लागवड केली, मूग, हरभरा यांची याची लागवड पूर्ण होऊन अंतिम टप्पा गाठला आहे़मात्र आता काही दिवस जास्त थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरणामुळे फळे व पिकांवर अळया, शेंडे, पोखरण्या-या अळया, किंवा पानांवर रसशोषक किडे पडण्याची भीती आहे़ या निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत़मी ही माझ्या शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे़ व या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा,फळे , शेंडे पोखरणाºया अळयांचा प्रादूर्भाव होऊ शकतो त्यामुळे शेतकºयांनी सकाळी १० वाजण्याच्या आत आणि सायंकाळी ४ नंतर अंतर फवारणी करणें गरजचे आहे़- बबन ओंदे, जाणकार शेतकरी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार