शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा, पालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण 0.01 टक्के! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 09:06 IST

राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरणाला परवानगी मिळाली होती. एकीकडे लसींचा साठा अपुरा आणि लसीकरणासाठी होणारी ज्येष्ठांसह तरुणांची गर्दी चिंतेचा विषय ठरत होती.

जगदीश भोवड/हितेन नाईक - पालघर : लसीकरणासाठी एकीकडे ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा दिसत असताना, १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाही लसीकरणासाठी परवानगी मिळाल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होताना दिसत होती. ही केंद्रेच कोरोनाची ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती व्यक्त होत होती. अखेर सरकारने आता ज्येष्ठ आणि दिव्यांगांना ‘लसदिलासा’ दिला आहे. यामुळे यापुढे तरी ज्येष्ठ नागरिकांना रांगा लावाव्या लागणार नाहीत, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण फक्त ०.०१ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरणाला परवानगी मिळाली होती. एकीकडे लसींचा साठा अपुरा आणि लसीकरणासाठी होणारी ज्येष्ठांसह तरुणांची गर्दी चिंतेचा विषय ठरत होती. लसींचा साठा शिल्लक नसल्याने जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचीही वेळ प्रशासनावर आली होती. यामुळे खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रे बंदच ठेवली गेली होती. दुसरीकडे वसई-विरारसह अनेक शहरी भागांतील नागरिकांना पालघरच्या ग्रामीण भागांतील लसीकरण केंद्रांवरचा स्लॉट मिळताना दिसत होता. मात्र त्यामुळे त्या त्या लसीकरण केंद्रांवर संघर्ष होतानाही दिसत होते. दरम्यान, सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता ज्येष्ठांचे लसीकरण आधी होणार असून, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्पपालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प असून, आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार ०.०१ टक्के डोस वाया गेले आहेत. आरोग्य खात्याने योग्य नियोजन करून डोस दिल्यामुळेच जिल्ह्यात डोस जास्त वाया गेले नाहीत, ही समाधानाची बाब आहे.

सकाळी सातपासूनच रांगा- पालघर जिल्ह्याच्या एकूण आठ तालुक्यांतील शहरी, ग्रामीण तसेच डोंगराळ भागांतील नागरिकांमध्ये लसीकरणासाठी सुरुवातीला फारसा उत्साह दिसून येत नव्हता. - मात्र कोरोनाची दुसरी लाट अनेकांना बाधित करीत असल्याचे आणि त्यात अनेक कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांमध्ये भीती पसरली. - यानंतर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होऊ लागली. यामुळे सकाळी सहा-सात वाजल्यापासूनच लोक रांगा लावत असल्याचे दिसून येऊ लागले.

जिल्ह्यात आजवर झालेले लसीकरण    ३,१२,२७०१८ ते ४४ साठी किती?    १५,३३३४५ पेक्षा जास्त वयोगटासाठी किती?    १८४६७९

काही पहिल्या तर काही दुसऱ्या डोससाठी रांगेत१ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणास परवानगी मिळाल्यानंतर तर लसीकरण केंद्रांवर मोठी रांग लागताना दिसून येऊ लागली. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठी गर्दी उसळत असे. यामध्ये १८ ते ४४ वर्षांदरम्यानचे लोक पहिल्या डोससाठी, तर ४५ वर्षांवरील लोक दुसऱ्या डोससाठी रांगेत असलेले पाहायला मिळाले. तर अनेकवेळा लसींचा साठा संपल्याने लोकांना निराश होऊन परतावे लागत असल्याचेही दिसून आले.

जिल्ह्यात लसी वाया जाण्याचे प्रमाण ०.०१ टक्के इतके अत्यल्प आहे. नियोजनात्मक लसीकरण मोहीम अवलंब केला जात असताना, १० लाभार्थी आल्याशिवाय लस वायल उघडली जात नाही. परिणामी लस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.- डॉ. मिलिंद चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., पालघर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजन