शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उंबरठे झिजवूनही प्रश्न सुटेनात; जाचक अटींमुळे ताडी व्यावसायिक त्रस्त, मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:58 AM

राज्यात बिअर बार, बिअर शॉप, परमिट रूम यांना शासन रिन्यूअल पद्धतीने कायमस्वरूपी परवाने देते. त्याच पद्धतीने ताडी व्यावसायिकांनाही परवाने देण्यात यावे किंवा पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात कायमस्वरूपी ताडी दुकानाचे परवाने दिले आहेत

पालघर : आपल्या पारंपरिक ताडी व्यवसायावर जाचक अटी लादल्याने ताडी व्यावसायिकांची संख्या घटत चालली असून या संकटाला दूर करण्यासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनी आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार,आमदारांचे उंबरठे झिजवले आहेत. आजही त्यांच्या समस्या ‘जैसे थे’ परिस्थितीत पडून असून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तरी हा प्रश्न सुटावा म्हणून या व्यावसायिकांनी त्यांना साकडे घातले आहे.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी, शिरगाव, वडराई, नांदगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात भंडारी, आदिवासी समाज ताडी काढण्याचा व्यवसाय मागील ५० वर्षांपासून करीत आहेत. जिल्ह्यात सुमारे ३५० ताडी परवानाधारकांची संख्या आहे. परंतु शासनाचे चुकीचे धोरण या व्यवसायाला मारक ठरत आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक तर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्ह्यातील खासदार,आमदार आदी सर्वांकडे पालघर जिल्हा ताडी अनुज्ञाप्तीधारक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ताडी व्यवसायातील शासनाचे बदलते धोरण मारक ठरत असल्याने त्यात बदल करण्याची मागणी केली आहे.

राज्यात बिअर बार, बिअर शॉप, परमिट रूम यांना शासन रिन्यूअल पद्धतीने कायमस्वरूपी परवाने देते. त्याच पद्धतीने ताडी व्यावसायिकांनाही परवाने देण्यात यावे किंवा पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात कायमस्वरूपी ताडी दुकानाचे परवाने दिले आहेत तो निकष जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांना लावण्यात यावा. ड्रायडे कालावधीत झाडे छेडण्यात असणारी बंदी रद्द करण्यात यावी, या व्यवसायात एखादा हप्ता भरण्याचा राहिल्यास त्यांना २४ टक्के दराने व्याज आकारणी केली जाते ती रद्द करण्यात यावी, शासनाच्या ताडी परवान्याच्या जाहीर लिलाव प्रक्रियेमुळे ३० दिवस कमी मिळाले त्याची फी माफ करावी, आदी मागण्या जिल्ह्यातील ताडी व्यावसायिकांनी केल्या आहेत.