शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

चौपदरीकरण प्रकल्प रखडला, सरकारी तिजोरीत खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:52 PM

सरकारी तिजोरीत खडखडाट : विरार-डहाणू प्रकल्प पूर्ण होण्यास २०२४ साल उजाडणार?

हितेन नाईक

पालघर : पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पासाठी आवश्यक ३२ हेक्टर जमिनीपैकी अवघी ०.२५ हेक्टर जमीन संपादन करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण ३ हजार ५७८ कोटींपैकी अवघे ६६.६१ कोटी इतकाच खर्च झाल्याने पालघर-वसई दरम्यानच्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणे शक्य नाही. हा प्रकल्प पूर्ण होण्यास २०२४ साल उलटून जाईल, असे दिसते आहे.

पश्चिम रेल्वेवर वसई ते पालघर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या नागरीकरणामुळे प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे डहाणू रोड ते विरार या मार्गावर रेल्वे रुळांचे चौपदरीकरण करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या निर्णयानुसार विरार ते डहाणू स्थानकादरम्यान दोन रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्प आराखड्यास मान्यता मिळाल्याने मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी ३) अंतर्गत हे काम हाती घेण्यात आले आहे.या प्रकल्पासाठी लागणाºया जमीन संपादनाचे काम पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हाती घेण्यात आले असून संपादन करण्यात येणाºया जमिनीचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी लागणाºया जमिनीचे भूसंपादन डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, हे काम मुदतीत पूर्ण झाले नसल्याने आता ती मुदत जून २०२० पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. संपादन केलेल्या जमिनीचे सपाटीकरण करून त्यावर भराव घालून त्यावर लहान-मोठे ८२ पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर रेल्वे रूळाची उभारणी आणि नव्याने निर्माण करण्यात येणाºया नवीन आठ रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.सध्या विरार ते डहाणू रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या नऊ स्थानकांच्या जोडीला नवीन आठ स्थानके सुचिवण्यात आली आहेत. यामध्ये विरार- वैतरणादरम्यान वाढीव, वैतरणा-सफाळेदरम्यान सरतोडी, सफाळे-केळवे रोड दरम्यान माकुणसार, केळवे रोड-पालघर दरम्यान चिंतूपाडा, पालघर-उमरोळी दरम्यान खारलपाडा, उमरोळी ते बोईसर दरम्यान पंचाळी, बोईसर-वाणगाव दरम्यान वंजारवाडा तर वाणगाव-डहाणू दरम्यान बीएसईएस वसाहत अशा नवीन स्थानकांचा समावेश आहे.

३ हजार ५७८ कोटी खर्चाच्या प्रकल्पासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून १ हजार ९५० कोटी इतके कर्ज घेण्यात येणार असून उर्वरित १ हजार ६२० कोटी रुपयांची पयांची गुंतवणूक केंद्र तसेच राज्य सरकारला करावी लागणार आहे. या प्रकल्पासाठी बँक तसेच सरकारकडून निधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात येत असला तरी ३ हजार ५७८ कोटींच्या या प्रकल्पासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षात केवळ २३८.७८ कोटी म्हणजे निव्वळ ६.६७ टक्के तरतूद केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकल्पावर आजमितीस केवळ ६६.६१ कोटी इतका म्हणजे केवळ दोन टक्क्यांहून कमी म्हणजे (१.८६ टक्के) इतकाच खर्च झाला आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळेच या प्रकल्पाला उशीर होत असल्याची चर्चा आहे.अद्यापही ४७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन शिल्लकच्या चौपदरीकरण प्रकल्पासाठी एकूण १७७ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी रेल्वेची १३० हेक्टर जमीन प्रकल्पासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी रेल्वेला अजून केवळ ४७ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.च्या ४७ हेक्टर जमिनीपैकी १३.४३ हेक्टर सरकारी तर १.४ हेक्टर वन जमीन आहे. याचा अर्थ आवश्यक ४७ हेक्टरपैकी १४.९१ हेक्टर सरकारी जमीन असून केवळ ३२ हेक्टर जमीनच खाजगी शेतकरी, खाजगी मालकाकडून संपादित करावी लागणार आहे.च् खाजगी मालकांकडून संपादित करावयाच्या ३२ एकर जमिनीपैकी अद्यापपर्यंत केवळ ०.१२५ हेक्टर जमिनीचे संपादन आतापर्यंत करण्यात आले आहे. अर्थातच जमीन संपादनाचीप्रक्रि या सुरू असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.च्जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध होताना दिसून येत नाही. यातून प्रकल्पांतर्गत कामे संथगतीने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प २०२४ मध्येही पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर