शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

वसईमध्ये घडू शकते पुणे; मालाडसारखी घटना, भीतीच्या छायेखाली शिवापाड्यातील नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:00 IST

मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या शिवापाडा परिसरातील चाळीच्या बाजूलाच असलेल्या अनधिकृत इंडस्ट्रीज कंपनीच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेली भिंत चाळीवर पडण्याची भीती नागरिकांना सतावते आहे.

नालासोपारा : मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या शिवापाडा परिसरातील चाळीच्या बाजूलाच असलेल्या अनधिकृत इंडस्ट्रीज कंपनीच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेली भिंत चाळीवर पडण्याची भीती नागरिकांना सतावते आहे. ही भिंत यापूर्वी चाळीवर पडल्याची घटना घडलेली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपर्यंत अनेक तक्रारी झाल्या आहेत. पण तहसीलदारांनी १५ जुलै रोजी या भिंतीवर नाममात्र कारवाई केली होती. पण ती भिंत पुन्हा बांधण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विशेष म्हणजे वसई पूर्वेकडील वालीव परिसरात शेकडो सरकारी जमिनीवर अतिक्र मण करून मोठमोठ्या इंडस्ट्रीज कंपन्या दिमाखात उभ्या आहेत. महसूल अधिकारी या कंपनीवर कारवाई करण्यासाठी चालढकल करत असून महानगरपालिका कारवाई करणार असे सांगत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, वसई फाटा येथे शिवापाडा गाव असून शेकडो गरीब परिवार चाळीमध्ये राहतात. या गावाच्या आजूबाजूची काही जमीन सरकारी आहे. या सरकारी जमिनीवर अनधिकृत पद्धतीने मोठ्या इंडस्ट्रीज उभ्या आहेत. या कंपनीच्या संरक्षक भिंती गावातील घरांच्या बाजूनेच बनविण्यात आल्या आहेत. काही भिंती तर झुकलेल्या आहेत.मंडळ आणि तलाठ्याने सर्व्हे केला; पण कारवाई नाही : सेठीया इंडस्ट्रीजचे अनिधकृत गाळे बांधले असून त्याचा पंचनामा करत तहसीलदारांना पेल्हार तलाठीने १६ जून २०१९ ला अहवाल पाठवला आहे तर मांडवी येथील मंडळ अधिकारी यांनी सदर जमिनीवरील बांधकामाबाबत कुठल्याही शासकीय प्रकारची परवानगी नसल्याने कारवाई करावी असा अहवाल तहसीलदारांना ६ जुलै २०१९ ला पाठवला आहे. तसेच ही वन खात्याकडील जमीन अल्प भूधारक व भूमिहीन आदिवासी लोकांना वाटण्यासाठी महसूल खात्याच्या ताब्यात दिली होती. मात्र, त्यांच्या दुर्लक्षामुळे येथे अनेक इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी तहसीलदारांना अहवाल पाठवल्यावर दीड महिना उलटूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.अनिधकृत बांधकामावर कारवाई करण्याची जवाबदारी महानगरपालिकेची आहे. पण जमिनीबाबत नेमकी काय स्थिती आहे, याबाबत तहसीलदारांशी बोलतो.- डॉ.कैलास शिंदे, जिल्हाधिकारीही जमीन नवीन शर्तीची असून याची भिंत एकदा पाडली आहे. परत भिंत बांधली असल्यास त्याची माहिती घेतो. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालावर लवकर कारवाई करण्यात येईल.- किरण सुरवसे, तहसीलदार, वसईया कंपनीला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. सदर जमिनीचा आणि कंपनीचा पंचनामा केला असून कारवाईसाठी अहवाल पाठवला आहे. - सुशांत ठाकरे, मंडळ अधिकारी, मांडवी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार