शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

वसईमध्ये घडू शकते पुणे; मालाडसारखी घटना, भीतीच्या छायेखाली शिवापाड्यातील नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:00 IST

मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या शिवापाडा परिसरातील चाळीच्या बाजूलाच असलेल्या अनधिकृत इंडस्ट्रीज कंपनीच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेली भिंत चाळीवर पडण्याची भीती नागरिकांना सतावते आहे.

नालासोपारा : मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या शिवापाडा परिसरातील चाळीच्या बाजूलाच असलेल्या अनधिकृत इंडस्ट्रीज कंपनीच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेली भिंत चाळीवर पडण्याची भीती नागरिकांना सतावते आहे. ही भिंत यापूर्वी चाळीवर पडल्याची घटना घडलेली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपर्यंत अनेक तक्रारी झाल्या आहेत. पण तहसीलदारांनी १५ जुलै रोजी या भिंतीवर नाममात्र कारवाई केली होती. पण ती भिंत पुन्हा बांधण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विशेष म्हणजे वसई पूर्वेकडील वालीव परिसरात शेकडो सरकारी जमिनीवर अतिक्र मण करून मोठमोठ्या इंडस्ट्रीज कंपन्या दिमाखात उभ्या आहेत. महसूल अधिकारी या कंपनीवर कारवाई करण्यासाठी चालढकल करत असून महानगरपालिका कारवाई करणार असे सांगत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, वसई फाटा येथे शिवापाडा गाव असून शेकडो गरीब परिवार चाळीमध्ये राहतात. या गावाच्या आजूबाजूची काही जमीन सरकारी आहे. या सरकारी जमिनीवर अनधिकृत पद्धतीने मोठ्या इंडस्ट्रीज उभ्या आहेत. या कंपनीच्या संरक्षक भिंती गावातील घरांच्या बाजूनेच बनविण्यात आल्या आहेत. काही भिंती तर झुकलेल्या आहेत.मंडळ आणि तलाठ्याने सर्व्हे केला; पण कारवाई नाही : सेठीया इंडस्ट्रीजचे अनिधकृत गाळे बांधले असून त्याचा पंचनामा करत तहसीलदारांना पेल्हार तलाठीने १६ जून २०१९ ला अहवाल पाठवला आहे तर मांडवी येथील मंडळ अधिकारी यांनी सदर जमिनीवरील बांधकामाबाबत कुठल्याही शासकीय प्रकारची परवानगी नसल्याने कारवाई करावी असा अहवाल तहसीलदारांना ६ जुलै २०१९ ला पाठवला आहे. तसेच ही वन खात्याकडील जमीन अल्प भूधारक व भूमिहीन आदिवासी लोकांना वाटण्यासाठी महसूल खात्याच्या ताब्यात दिली होती. मात्र, त्यांच्या दुर्लक्षामुळे येथे अनेक इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी तहसीलदारांना अहवाल पाठवल्यावर दीड महिना उलटूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.अनिधकृत बांधकामावर कारवाई करण्याची जवाबदारी महानगरपालिकेची आहे. पण जमिनीबाबत नेमकी काय स्थिती आहे, याबाबत तहसीलदारांशी बोलतो.- डॉ.कैलास शिंदे, जिल्हाधिकारीही जमीन नवीन शर्तीची असून याची भिंत एकदा पाडली आहे. परत भिंत बांधली असल्यास त्याची माहिती घेतो. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालावर लवकर कारवाई करण्यात येईल.- किरण सुरवसे, तहसीलदार, वसईया कंपनीला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. सदर जमिनीचा आणि कंपनीचा पंचनामा केला असून कारवाईसाठी अहवाल पाठवला आहे. - सुशांत ठाकरे, मंडळ अधिकारी, मांडवी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार