शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

भक्तिमार्गातून लाभले आरोग्य धनसंपदेचे देणे, बावीस वर्षांपासूनचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 01:37 IST

तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो. या गडावरील ८५० पायऱ्यांची चढउतार केल्याने व्यायाम होऊन उत्तम आरोग्य धनसंपदेचा आशीर्वाद लाभल्याची भावना या ग्रुप सदस्यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर गडाची स्वछता आणि परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्याकडून राबवला जातो.डहाणू रोडपासून महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी वधणा येथे पोहचण्याकरिता १८ कि.मी.चे अंतर असून याकरिता तालुक्यातील विविध भागातून ग्रुप सदस्य मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता येथे दाखल होतात. तेथून एक किलोमीटर पायी चालल्यानंतर पायºया सुरू होतात. ८५० पायऱ्यांच्या चढाईनंतर साधारणत: पाऊण तासांनी माथ्यावरील मंदिरात पोहचता येते. तेथे अभिषेक आणि आरतीचा कार्यक्र म आटपून हा ग्रुप माघारी परततो.२२ वर्षांपूर्वी शहरातील सरावली येथे राहणाºया अशोक राजपूत यांनी महालक्ष्मी भक्तांना एकत्र करून हा पायंडा पाडला. दर मंगळवारी हा उपक्र म राबविला जात असल्याने ग्रुपचे नामकरण मंगलग्रुप करण्यात आले. हा ग्रुप लवकरच दोन तपांचा टप्पा गाठणार आहे. या कालावधीत अनेक नवीन सदस्य ग्रुपशी जोडले गेले, तर काही कमी झाले. मात्र या भक्ती मार्गातून सुरू झालेल्या प्रवासात ध्यान साधना तसेच संघटनेचे महत्त्व त्यांना उमगले असून त्यांना सामाजिक भानही आले आहे. त्यातूनच गड परिसरात स्वछता, वृक्षारोपण आदी उपक्रम त्यांच्याकडून राबविले जात आहेत. शिवाय चढाई करताना १७०० पायºयांच्या चढ-उताराने व्यायाम होऊन उत्तम आरोग्याचे देणं त्यांना लाभले आहे.दरम्यान, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा हे भक्त दर्शनाला जातात. शिवाय श्रावणी सोमवारी रात्री साडेआठ वाजता हे सदस्य गडावर जाऊन अभिषेक आणि भजन कीर्तनाचा कार्यक्र म मध्यरात्रीपर्यंत करून तेथेच वस्तीला राहतात. त्यानंतर मंगळवारी पहाटे काकड आरतीनंतर घराकडे मार्गस्थ होतात. तर अश्विन महिन्यात येणाºया नवरात्रीला प्रत्येक दिवशी पहाटे गडावर जाताना, अन्य नागरिकही त्यांच्यासोबत सहभागी होतात.महालक्ष्मी माता हे जागृत देवस्थान असल्याची श्रद्धा आहे. २२ वर्षांपासून गडावर दर्शनाला जाताना भक्तीच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती सदस्यांना लाभली आहे. शिवाय स्वच्छता आणि वृक्षारोपण या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक भान वाढीस लागले. त्याचा फायदा प्रत्येक सदस्याच्या व्यक्तिमत्वातून जाणवत आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी हा आरोग्यदायक भक्तीमार्ग अवलंबवयास हवा. - अशोक राजपूत, संस्थापक, मंगल ग्रुप

टॅग्स :Vasai Virarवसई विरार