शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

भक्तिमार्गातून लाभले आरोग्य धनसंपदेचे देणे, बावीस वर्षांपासूनचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 01:37 IST

तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो. या गडावरील ८५० पायऱ्यांची चढउतार केल्याने व्यायाम होऊन उत्तम आरोग्य धनसंपदेचा आशीर्वाद लाभल्याची भावना या ग्रुप सदस्यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर गडाची स्वछता आणि परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्याकडून राबवला जातो.डहाणू रोडपासून महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी वधणा येथे पोहचण्याकरिता १८ कि.मी.चे अंतर असून याकरिता तालुक्यातील विविध भागातून ग्रुप सदस्य मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता येथे दाखल होतात. तेथून एक किलोमीटर पायी चालल्यानंतर पायºया सुरू होतात. ८५० पायऱ्यांच्या चढाईनंतर साधारणत: पाऊण तासांनी माथ्यावरील मंदिरात पोहचता येते. तेथे अभिषेक आणि आरतीचा कार्यक्र म आटपून हा ग्रुप माघारी परततो.२२ वर्षांपूर्वी शहरातील सरावली येथे राहणाºया अशोक राजपूत यांनी महालक्ष्मी भक्तांना एकत्र करून हा पायंडा पाडला. दर मंगळवारी हा उपक्र म राबविला जात असल्याने ग्रुपचे नामकरण मंगलग्रुप करण्यात आले. हा ग्रुप लवकरच दोन तपांचा टप्पा गाठणार आहे. या कालावधीत अनेक नवीन सदस्य ग्रुपशी जोडले गेले, तर काही कमी झाले. मात्र या भक्ती मार्गातून सुरू झालेल्या प्रवासात ध्यान साधना तसेच संघटनेचे महत्त्व त्यांना उमगले असून त्यांना सामाजिक भानही आले आहे. त्यातूनच गड परिसरात स्वछता, वृक्षारोपण आदी उपक्रम त्यांच्याकडून राबविले जात आहेत. शिवाय चढाई करताना १७०० पायºयांच्या चढ-उताराने व्यायाम होऊन उत्तम आरोग्याचे देणं त्यांना लाभले आहे.दरम्यान, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा हे भक्त दर्शनाला जातात. शिवाय श्रावणी सोमवारी रात्री साडेआठ वाजता हे सदस्य गडावर जाऊन अभिषेक आणि भजन कीर्तनाचा कार्यक्र म मध्यरात्रीपर्यंत करून तेथेच वस्तीला राहतात. त्यानंतर मंगळवारी पहाटे काकड आरतीनंतर घराकडे मार्गस्थ होतात. तर अश्विन महिन्यात येणाºया नवरात्रीला प्रत्येक दिवशी पहाटे गडावर जाताना, अन्य नागरिकही त्यांच्यासोबत सहभागी होतात.महालक्ष्मी माता हे जागृत देवस्थान असल्याची श्रद्धा आहे. २२ वर्षांपासून गडावर दर्शनाला जाताना भक्तीच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती सदस्यांना लाभली आहे. शिवाय स्वच्छता आणि वृक्षारोपण या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक भान वाढीस लागले. त्याचा फायदा प्रत्येक सदस्याच्या व्यक्तिमत्वातून जाणवत आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी हा आरोग्यदायक भक्तीमार्ग अवलंबवयास हवा. - अशोक राजपूत, संस्थापक, मंगल ग्रुप

टॅग्स :Vasai Virarवसई विरार