शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

विनाशकारी नीतीचा निषेध,सर्वसामान्यांच्या छाताडावर विनाशकारी प्रकल्प नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 3:09 AM

जिल्हा निर्मिती नंतर प्रगतीची स्वप्ने पाहू लागलेल्या सर्वसामान्यांच्या छाताडावर अनेक विनाशकारी प्रकल्प लादून त्याचे हक्काचे पाणी पळविले जात आहे.

पालघर : जिल्हा निर्मिती नंतर प्रगतीची स्वप्ने पाहू लागलेल्या सर्वसामान्यांच्या छाताडावर अनेक विनाशकारी प्रकल्प लादून त्याचे हक्काचे पाणी पळविले जात आहे. शासनाच्या या विनाशकारी नीतीचा विरोध करण्यासाठी गुरुवार ३० संघटनांच्या माध्यमातून पालघर येथे हजारो कार्यकर्त्यांनी भूमी अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा दिला.जिल्ह्यासह राज्यभरातील सुमारे ३० संघटनांनी एकत्र येत येथील शोषित, वंचित, भूमिपुत्र, आदिवासी व शेतकरी यांच्या जमिनीविषयक मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने भूमी अधिकार आंदोलनाची उभारणी केली असून या आंदोलनाद्वारे या मागण्यांचा मसुदा तयार करून तो शासनाकडे सादर करून मागण्या मान्य करुन घेण्याचे ठरले आहे.राज्यात मुंबई-वडोदरा महामार्ग, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आदी येऊ घातलेले अनेक विनाशकारी प्रकल्प आपल्याला उध्वस्त करून टाकणारे असून यापासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्या मागण्यासाठी हे आंदोलन रास्त आहे असे विलास भोंगळे यांनी सांगितले तर माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी या विविध प्रकल्पांविषयी सांगताना ते उभारताना आपल्याला जागा शिल्लक राहील की नाही अशी भीती व्यक्त केली.गोरगरिबांना लुटणे हा या सरकारचा धंदा असून तोच या सरकारचा उदिष्ट असल्याचे रामभाऊ वाढू यांनी सांगितले. जागेवर पीक असूनही सातबाऱ्यावर पीक पाण्याची नोंद न करणे, पीक असला तरी नाव न नोंदवणे, पूर्वापार कसत असलेल्या जमिनी असोत किंवा स्वत:च्या जमिनी बाबत नोंदी होत नसल्याने त्या नोंदी नोंदविण्यासाठी आपल्याला शासनाकडे मागणी करावी लागेल व ते या आंदोलनामुळेच शक्य आहे असे मधू धोडी यांनी यावेळी सांगितले.देश जरी मालकीचा असला तरी त्यातील स्वातंत्र्य आमचे नसून आज याच देशात आमच्यावर अन्याय होत असल्याचे दत्ता भाकड यांनी सांगून सरकारवर आसूड ओढला.आपण सर्वानी लाल झेंड्याच्याखाली एकत्र येत या आपल्या मागण्यांसाठी लढा द्यायची आवश्यकता असल्याचे रतन भूधार यांनी सांगितले. वनहक्क कायदा अमलात येत नसून याअंतर्गत दावे देताना शासन फक्त ५ ते १० गुंठे जागा नावावर करते मात्र प्लॉट नावावर करत नाही हा अन्याय असल्याचे उल्का महाजन यांनी सांगितले असून येथून तेथून या सरकारचे जे पाणी पळविण्याचे जे कारस्थान सुरु आहेत ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही आंदोलनामार्फत महाजन यांनी दिला.१९ मार्च रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण तर ८ मे ला राजभवनाला धडक देण्यात येण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी केला.>भरउन्हात आंदोलनआंदोलनाच्या जाहीर सभेसाठी दांडेकर मैदान येथून निघालेले आंदोलक पालघर स्टेशन, हुतात्मा स्तंभातून देविशा रस्तामार्गे नजरली मैदानात आली. या सभेस सुमारे ६ हजार कार्यकर्ते भर उन्हातान्हात उपस्थित होते. गावीत यांनी आपली जमीन मायभूमी आपल्याला हवी असेल तर या लढ्या शिवाय पर्याय नसल्याचे यावेळी आपल्या भाषणातून सांगितले.