शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जव्हारमध्ये मुख्यमंत्र्यांना आश्वासने भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:53 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले असून ते युतीला भोवण्याची शक्यता आहे.

- हुसेन मेमनजव्हार : संस्थानकाळातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हार नगरपरिषदेला १ सप्टेंबर २०१८ रोजी १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे, ६ सप्टेंबर रोजी शतकपूर्ती निमित्त पर्यटन महोत्सवाचे आयोजन जव्हार येथे करण्यात आले होते, या कार्यक्रमात मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री फडणवीस यांनी जव्हारच्या जटील समस्या जाणून यातील हद्दवाढ, ब सत्ता प्रकार जमीन प्रकरण आदि बाबत प्रस्ताव पाठवा, मी मंजूर करतो असे आश्वासन दिले होते. हे प्रस्ताव तातडीने पाठविले तरी ते आजही धूळ खात पडलेले असल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले असून ते युतीला भोवण्याची शक्यता आहे.शहरातील गावठाणाची ४० ते ४५ टक्के जागा ही ब सत्ता प्रकाराची आहे. ब सत्ता प्रकाराची जागा म्हणजे शासनाने भाडे तत्वावर दिलेली जागा, यातही बी-१, बी-२ व बी-३ असे ३ प्रकार आहेत. मात्र या जागा सन १९३३ पासून गावकयांच्या नावावर असून तशी नोंद मिळकत पत्रिकांवर आहे, या जागांची सन २०११ पूर्वी विक्री व्यवहार तसेच बांधकाम परवानगी, भाडेकरार व इतर सर्व व्यवहार होत होते, भूमी अभिलेख कार्यालयात व नगर परिषद कार्यालयात याची रितसर नोंदणी पण होत होती, मात्र सन २०११ साली अचानक उपविभागीय अधिकारी, जव्हार यांच्याकडून ब सत्ता प्रकाराच्या जमिनी या शासकिय जमिनी असून त्यांच्या विक्रीस व बांधकाम परवानगी देण्यास नोटीसा बजावून बंदी घालण्यात आली. त्यामुळे शहरातील ४० टक्के जमिनींचे विक्री व्यवहार तथा बांधकाम रेंगळलेले आहेत, तसेच या जमिनी पुन्हा शासकिय रक्कम भरून मूळ मालकांच्या नांवे करण्याकरीता प्रस्तावही सादर करण्यात आले मात्र ते प्रस्ताव सन २०११ पासून ते आजतागायत अनिर्णीत आहेत. त्यामुळे ब सत्ता प्रकारणी लवकरात लवकर शासनाकडून निर्णयाची अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली होती आणि यावेळी खासदार राजेन्द्र गावित यानी ही समस्या मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली होती, त्यावेळी हद्दवाढीचा तसेच ब सत्ता प्रकारच्या जमिनींचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले व पर्यटन दर्जा मिळण्याकरीता नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. मात्र आज आठ महीने होऊनही हे दोन्ही प्रस्ताव कागदोपत्री अपूर्ण असल्याचे कारण देते धुळखात ठेवले आहे. ही बाब या शहरात युतीला नडू शकते.शहराच्या हद्द वाढीचा प्रस्ताव ५ वर्षे पडूनजव्हारच्या परिसराचे विस्तारीकरण गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढले, त्यामुळे शहरात विकासाला पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे तसेच उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहराचे हद्दवाढीचा प्रस्ताव सन २०१५ साली तयार करण्यात आलायात शहराच्या पुर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण या चाराही दिशांतून जवळ जवळ प्रत्येकी ३ कि. मी. पर्यत हद्दवाढ करण्याचा नकाशा तयार करण्यात आला असुन रितसर मंत्रालयीन कार्यालयात दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस