शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

‘व्हाइट गवस’ विषाणूमुळे कोळंबी प्रकल्प आले धोक्यात, सहा महिन्यांपासून उत्पादन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 01:01 IST

डहाणू परिसरात गेल्या दहा वर्षापासून कोळंबी शेती करणारा सुशिक्षित मच्छिमार तरुण सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

- शौकत शेखडहाणू  -  डहाणू परिसरात गेल्या दहा वर्षापासून कोळंबी शेती करणारा सुशिक्षित मच्छिमार तरुण सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून या भागात ‘व्हाईट गरस’ नावाचा संसर्जजन्य विषाणूचा फैलाव झाल्याने गेल्या तीन महिन्यापासून तयार झालेल्या कोळंबीवर त्याचा घातक परिणाम होऊन कोळंबीची वाढ थांबल्याने येथील शेकडो तलाव रिकामी करण्यात आली आहेत.ही योजना राबविण्यासाठी प्रसंगी कर्ज व उसनवार केलेले मत्स्य प्रकल्प चालक कर्जबाजारी झाले आहेत. गत सहा महिन्यांपासून कोळंबी उत्पादन मिळत नसल्याने त्यांना रित्या हाती बसावे लागत आहेत. त्यांना शासनाकडून कोणतीही सहानुभूती किंवा उपाय योजना मिळत नसल्याने त्यांचे पाठबळ हरवले आहे.चिंचणीपासून थेट झाईपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर राहून मासेमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाºया तसेच त्यांच्या बोटीवर खलाशी म्हणून काम करणारे हजारो आदिवासी मजूर देखील बेरोजगार झाले आहे. त्यातच पडिक शासकीय जागा भाडे तत्त्वावर घेऊन कोळंबी संवर्धन करणे हा व्यवसाय स्थानिक भूमिपुत्र मच्छिमारांसाठी पर्यायी व्यवसाय म्हणून उपयुक्त ठरत होता.त्यातही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध, मत्स्य विभागाचे दुर्लक्ष, शासकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा अभावामुळे सुशिक्षित मच्छिमार तरुणाची मुस्कटदाबी होत असून त्यांची आर्थिक स्थिती दयनीय बनली आहे. दरम्यान, डहाणू, चिंचणी, वानगाव, आसनगाव, चंडिगाव, वडकून, बाडापोखरण, वरोर, सावरा, आगवन, धूमकेत, घाकटी डहाणू, चिखला व बोर्डी इत्यादी भागातील हजारो कोळंबी उत्पादित करणारे तलाव गेल्या सहा महिन्यांपासून ओस पडले आहे. कोळंबीचे उत्पादन ठप्प झाल्याने कोळंबी संवर्धक मच्छिमार तसेच त्याच्यावर अवलंबून असलेले आदिवासी मजुरात बेकारी वाढून नैराश्य पसरले आहे.पारंपरिक मत्स्योद्योगावर वरवंटागेल्या अनेक वर्षापासून ओएनजीसीच्या वाढत्या तेलविहीरी महिनोंमहिने चालणारे सर्वेक्षण, पर्ससीन नेटची विनाशकारी मासेमारी, तारापूर एम.आय.डी.सी., तारापूण अणू ऊर्जा प्रकल्प, डहाणू औद्योगिक प्रकल्प इत्यादींचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मत्स्य व्यवसायावर परिणाम होत असल्याने मत्स्यसंपदा नष्ट होत आहे. मच्छिमारांनी समुद्रात सोडलेल्या जाळ्यात मासळीच येत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाºया हजारो मच्छिमार कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या सहा महिन्यांपासून कोळंबी उत्पादन बंद आहे. ‘व्हाईट गरस’चा फैलाव या परिसरात झाल्याने आमचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने मच्छिमारांकडे सहानभूतीपूर्वक लक्ष देऊन कोळंबी संवर्धक मच्छिमार तरुणांना आर्थिक मदतीबरोबरच विविध सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे.- नंदकुमार विंदे, चेअरमन,धाकटी डहाणू मच्छिमार सहकारी सोसायटी, डहाणू 

टॅग्स :fishermanमच्छीमारVasai Virarवसई विरार