शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

आदिवासी बांधवांची आगोटाची तयारी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:04 IST

संडे अँकर । बाजारपेठेत प्लास्टिक व दोर, पावसाळ्याच्या शिधाखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, घरांची दुरुस्ती

जव्हार : जव्हार हा ९९ टक्के आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका असून, दिड लाख लोकसंख्या आहे. खेडोपाड्यातील बहुतांश घरे कुडा विटामातीची असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही घरावर टाकण्यासाठी, गाय-गोठ्यासाठी, पावसाळ्यात चुलीसाठी लागणाऱ्या लाकूड साठा, प्लास्टीक किंवा ताडपत्री खरेदीसाठी जव्हारमध्ये सध्या जोरदार गर्दी होते आहे. तसेच येथील आदिवासी बांधव घरावरील कौलांची दुरुस्ती करतांना दिसत आहेत.

उन्हाचे चटके इतके जोरात बसू लागले आहेत की, आता पाऊस लवकरच होणार अशी चाहूल लागली असल्याने, जव्हार येथे बाजारपेठेत घरावरील कौलांवर अंथरण्यासाठी, लाकडाच्या झोपडीवर कुडाच्या घरावर तसेच गायगोठ्यांच्या अवती-भवती बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कापड लागते ते जव्हारच्या बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. परिसरांतील आदिवासी बांधव पावसाळ्यांत पाण्याची गळती घरात होऊ नये म्हणून खुप मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कापडाची खरेदी करतांना दिसत आहेत. प्लासटीकमध्ये काळे प्लास्टीक हे सर्वात स्वस्त ६५/- ते ८५/- रुपये प्रति किलो आहे. त्याचा पन्हा (रूंदी) १५ ते २० फुटाचा असतो, निळे, पिवळे किंवा पांढºया कलरचे देखील प्लास्टीक बाजारपेठेत मिळते. तसेच प्लास्टीकच्या घोंगड्याचेही चलन येथे मोठ्या प्रमाणात आहे. घोंगड्यांच्या उपयोग भर पावसांत शेतात लावणी करतेवेळी होत असतो. शिवाय निळ्या रंगाच्या प्लास्टीक ताडपत्र्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. निळी ताडपत्री ही जाड असल्यामुळे टिकाऊ असते, यात ४ फुटी. ६ फुटी, ८ फुटी, १२ फुटी पन्हा असतो. या ताडपत्र्या मिटरमध्ये विकल्या जात आहेत. जव्हार प्लास्टीक कापडाच्या आणि छत्र्यांच्या बाबतीत मोठी बाजारपेठ असून येथे पावसाळ्याच्या सुरवातीला म्हणेज फेब्रुवारी मार्चपासून मोठे व्यापारी लाखो टन प्लास्टीक कापडाची खरेदी करून साठा करून ठेवतात व त्यांची सिझनला विक्री होत असते. घाऊक स्वरूपाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया जव्हार मधुन आसपासच्या तालुक्यांतील, खेडोपाड्यातील व्यापारी प्लास्टीक कापड व छत्र्यांची खरेदी करीत असतात.कडाक्याचा उन्हाळा व शाळेच्या सुट्ट्या आता अंतिम टप्प्यांत असून असह्य उन्हाबरोबरच हव्याशा वाटणाºया शालेय सुट्ट्या देखील आता लवकरच संपणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक या सर्वांना शाळेचे वेध लागले आहे. सध्या विद्यार्थी जगतात दप्तर, पुस्तके, नवीन शाळेचे गणवेश, शालेय साहित्य, बुट, रेनकोट, छत्र्यां या सारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर