शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

यंत्रमाग उद्योगास लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 02:22 IST

जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदार संघात असलेल्या भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम व भिवंडी ग्रामिण या भागात यंत्रमाग व कापड व्यवसायातील मंदी हा प्रमुख मुद्दा आहे. भाजप सरकारने यासाठी केवळ घोषणा केल्या असून कोणतीही योजना अंमलात आणली नाही. त्यामुळे या भागातील व्यापारी वर्ग भाजपावर नाराज असून त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे.

शहर व परिसरात ८ लाखापेक्षा जास्त यंत्रमाग असून त्यावर सुमारे ५ लाखापेक्षा जास्त यंत्रमाग कामगार काम करीत आहेत. कापडमार्केटमध्ये कापडास उठाव नसल्याने त्याचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. अनेक व्यापाऱ्यांकडे विणलेले कच्चे कापड व मार्केटमध्ये विक्रीचे कापड साठलेले आहे. उत्पादन जास्त झाल्याने या भागातील काही यंत्रमाग कारखाने कधी कधी बंद केले जातात. त्याचा फटका कामगारांना बसतो. आर्थिक उलाढाल कमी झाल्याने परिसरांतील उद्योग व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला. त्यावर कोणतीही उपाययोजना सरकारने केलेली नाही. या भागात असलेल्या कारखान्यात छोटे यंत्रमागधारक एका छताखाली येऊन आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडे शासनाने लक्ष दिले नाही. ही वस्तूस्थिती व्यापाऱ्यांनी व यंत्रमागधारकांनी सरकारकडे मांडली. त्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी विविध योजना जाहिर केल्या. आॅनलाईन यंत्रमागाच्या योजनांचा कार्यक्रम झाल्यानंतर यंत्रमागधारकांच्या आशा उंचावल्या. परंतू या योजनांचा यंत्रमागधारकांना लाभ मिळाला नाही. विजेची समस्याही गंभीर असून, रहिवासी व कारखानदारांच्या तक्रारीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने त्याचा परिणाम निवडणुकीत होणार आहे.

सरकारने ‘पॉवर-टेक्स’च्या नावाने विविध योजना जाहिर केल्या. मात्र त्याचा लाभ मिळालेला नाही. यापुर्वीच्या काँग्रेस सरकारने यंत्रमाग उद्योगासाठी विविध सवलती दिल्या. राज्यातील यंत्रमागासाठी ४६४ कोटी रूपयांची सबसिडी देण्यासाठी बजेटमध्ये तरतुद केली होती. संजीवनी योजनेनुसार थकबाकी भरणाºया व्यापाºयांना ५५ टक्के सवलत दिली.- रशीद ताहिर, माजी आमदारकापड उद्योगावर येथील मार्केट व कामगारांचे कुटूं्ब अवलंबून आहेत. वारंवार येणाºया मंदीने कामगारांना काम कमी मिळते. काही कारखाने मालकांनी बंद ठेवल्याने कामगारांना गावी जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे येथील कामगारवर्ग कमी होऊ लागला आहे. भाजपने कामगारांविषयी कोणतेही धोरण निश्चित केले नाही.- विजय खाने, कामगार नेताआतापर्यंत काय झाले उपाय?1या भागातील यंत्रमागधारकांवर ज्याज्यावेळी संकट आले, त्यात्यावेळी काँग्रेसने त्यांना सवलती जाहिर करून हा व्यवसाय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.2या व्यवसायातील लाखो कामगारांचा काँग्रेसने विचार करून त्यांच्यासाठी कारखानदारांना सवलती दिल्या. त्यामुळे बेरोजगारांना येथे मोठ्या संख्येने रोजगार मिळाला.3भिवंडीतील कापड व्यवसायावर या भागातील छोटे-मोठे व्यवसाय अवलंबून आहेत. कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाºया डार्इंग व सायझिंग येथे असून काँग्रेसने वीजबिलात दिलेल्या सवलतीचा फायदा सर्वांना मिळाला.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1यार्नचे भाव स्थिर झाले, तर कापड विक्रीस उठाव येईल. त्यामुळे सर्व यंत्रमाग पूर्वीप्रमाणे सुरू राहतील आणि सर्वांना रोजगार मिळेल.2वीज बिलात सवलत दिल्यास उत्पादन दर कमी होऊन त्याचा परिणाम मार्केटवर होईल आणि व्यापाºयांना फायदा होईल. परिणामी यंत्रमाग व्यवसाय वाढेल.3जगातील कापड उद्योगाशी स्पर्धा करताना यंत्रमागाचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित आहे. परंतू त्यामध्ये शासनाचाही सहभाग हवा. टेक्स्टाईल पार्क उभारल्यास तरूण पिढीचा रोजगाराचा प्रश्न निकाली निघेल.

रोजगारासाठी शहराबाहेर धावदेशभरातून यंत्रमाग कामगार भिवंडीतील कारखान्यात काम करण्यास येतात; पण शासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक बेरोजगार शहराबाहेर नोकरीसाठी जातात.