शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सोशल मीडियाच्या काळात पोस्टाचे ‘वैभव हरपले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:42 IST

अवस्था अतिशय बिकट, उतरती कळा

नालासोपारा : सरकारी योजना पोस्ट आॅफिसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र पण वाढवण्यात आले आहे. काही योजना लोकांपर्यन्त पोहचवण्याची जवाबदारी पोस्टावर आहे. या योजना लोकांपर्यन्त पोहचतील का ? याबाबत काहीही विचार करण्यात आलेला नाही. काही पोस्ट आॅफिसची अवस्था आणि दुर्लक्ष यामुळे बिकट झाली आहे तर दुसरीकडे सरकार काहिना काही योजना काढून त्याचा भार वाढवत आहे. काही याच प्रकारची स्थिती वसईच्या वालीव विभागात असलेल्या पोस्ट आॅफिसची झालेली आहे. अत्यंत बिकट अवस्था आणि समस्येने ग्रासलेले हे पोस्ट आॅफिस आहे.एखाद्या वीरान खंडहरा सारखी अवस्था या पोस्टाची झाली आहे. ५० वर्षे जुन्या ज्या इमारतीमध्ये हे पोस्ट चालवले जाते. तिची अवस्था अत्यंत धोकादायक असून ती कधीही कोसळू शकते. कर्मचारी जीव मुठीत धरूनच येथे कामे करतात. याविषयी त्यांनी अनेक वेळा तक्र ारी केल्या आहेत पण त्याकडे सातत्याने काणाडोळा केला जातो आहे.या पोस्टामधे सुरक्षेचाही अभाव आहे. कागदपत्राची कोणतीही सुरक्षा याठिकाणी नाही. आलेले पत्र, पार्सल सामान यांचीही सुरक्षा नाही . पोस्ट आॅफिसचा मुख्य दरवाजा अतिशय कमजोर आणि खिडक्या असून नसल्यासारख्या आहेत. सरकारी योजनाचे कागदपत्र काही लोकांचे गहाळ्ही झाले असल्याचे कळते.पोस्टमन आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. वसई पूर्वेकडील काही मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या साहयाने पोस्ट आॅफिसचा कारभार सांभाळत आहेत. पोस्टमनचा अभाव असल्या कारणाने कागदपत्रे आणि आलेली पत्रे संबंधितांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याचेही कळते. कार्यक्षेत्र या पोस्ट आॅफिसचे मोठे असले तरी एक दोन पोस्टमनच्या साहयाने बटवडा केला जातो.या पोस्टात सर्वसामान्यांच्या ठेवी, मुदतठेवी, मासिक उत्पन्नयोजना , पोस्टल विमा योजना आदींची करोडो रुपयांचे मूल्य असलेली कागदपत्रे ठेवलेली आहेत. त्यांच्याही सुरक्षेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गैरप्रकार होण्याचीही शक्यता आहे.नव्या तंत्रज्ञानाचे प्रखर आव्हान कसे पेलणार? हाच खरा प्रश्नचार दशकांपूर्वी कुरिअर आणि आता काळाच्या पडद्याआड गेलेले रेडिओ पेजर, सुरू झाले तेव्हा पोस्ट खाताने आपले डोळे उघडळे नाही. नव्या तंत्रज्ञानाची कास धरली नाही त्यामुळे पैसे पाठविणे, पत्रे पाठविणे या मुख्य व्यवसायाला लागत असलेला सुरूंग पोस्टाने कधी गांभिर्याने घेतला नाही. इंटरनेट आल्यावर तर इमेलमुळे पोस्टाची मृत्यूघंटाच वाजली. उरली सुरली कसर आरटीजीएस तंत्राने भरून काढली. पैसे पाठविण्याचे एकमेव माध्यम होत मनिआॅर्डर आणि इंन्शुअर्ड पार्सल परंतु आरटीजीएसमुळे काही क्षणात पैसे कुठून कुठेही पाठविणे शक्य झाले. एकेकाळी दुरध्वनी सेवा पोस्टाची मक्तेदारी होती. त्यालाही मोबाईल फोनमुळे सुरूंग लागला. त्यातून पोस्टाचे वैभव लयाला जात राहिले.इमेल, व्हॉट्स अ‍ॅप, मॅसेजिंग व तत्सम नव्या तंत्रामुळे , कुरिअर, पोस्टाचे महत्व दिवसेंदिवस कमी होते आहे. त्यात आहे त्या कार्यालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस