शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सोशल मीडियाच्या काळात पोस्टाचे ‘वैभव हरपले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:42 IST

अवस्था अतिशय बिकट, उतरती कळा

नालासोपारा : सरकारी योजना पोस्ट आॅफिसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र पण वाढवण्यात आले आहे. काही योजना लोकांपर्यन्त पोहचवण्याची जवाबदारी पोस्टावर आहे. या योजना लोकांपर्यन्त पोहचतील का ? याबाबत काहीही विचार करण्यात आलेला नाही. काही पोस्ट आॅफिसची अवस्था आणि दुर्लक्ष यामुळे बिकट झाली आहे तर दुसरीकडे सरकार काहिना काही योजना काढून त्याचा भार वाढवत आहे. काही याच प्रकारची स्थिती वसईच्या वालीव विभागात असलेल्या पोस्ट आॅफिसची झालेली आहे. अत्यंत बिकट अवस्था आणि समस्येने ग्रासलेले हे पोस्ट आॅफिस आहे.एखाद्या वीरान खंडहरा सारखी अवस्था या पोस्टाची झाली आहे. ५० वर्षे जुन्या ज्या इमारतीमध्ये हे पोस्ट चालवले जाते. तिची अवस्था अत्यंत धोकादायक असून ती कधीही कोसळू शकते. कर्मचारी जीव मुठीत धरूनच येथे कामे करतात. याविषयी त्यांनी अनेक वेळा तक्र ारी केल्या आहेत पण त्याकडे सातत्याने काणाडोळा केला जातो आहे.या पोस्टामधे सुरक्षेचाही अभाव आहे. कागदपत्राची कोणतीही सुरक्षा याठिकाणी नाही. आलेले पत्र, पार्सल सामान यांचीही सुरक्षा नाही . पोस्ट आॅफिसचा मुख्य दरवाजा अतिशय कमजोर आणि खिडक्या असून नसल्यासारख्या आहेत. सरकारी योजनाचे कागदपत्र काही लोकांचे गहाळ्ही झाले असल्याचे कळते.पोस्टमन आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. वसई पूर्वेकडील काही मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या साहयाने पोस्ट आॅफिसचा कारभार सांभाळत आहेत. पोस्टमनचा अभाव असल्या कारणाने कागदपत्रे आणि आलेली पत्रे संबंधितांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याचेही कळते. कार्यक्षेत्र या पोस्ट आॅफिसचे मोठे असले तरी एक दोन पोस्टमनच्या साहयाने बटवडा केला जातो.या पोस्टात सर्वसामान्यांच्या ठेवी, मुदतठेवी, मासिक उत्पन्नयोजना , पोस्टल विमा योजना आदींची करोडो रुपयांचे मूल्य असलेली कागदपत्रे ठेवलेली आहेत. त्यांच्याही सुरक्षेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गैरप्रकार होण्याचीही शक्यता आहे.नव्या तंत्रज्ञानाचे प्रखर आव्हान कसे पेलणार? हाच खरा प्रश्नचार दशकांपूर्वी कुरिअर आणि आता काळाच्या पडद्याआड गेलेले रेडिओ पेजर, सुरू झाले तेव्हा पोस्ट खाताने आपले डोळे उघडळे नाही. नव्या तंत्रज्ञानाची कास धरली नाही त्यामुळे पैसे पाठविणे, पत्रे पाठविणे या मुख्य व्यवसायाला लागत असलेला सुरूंग पोस्टाने कधी गांभिर्याने घेतला नाही. इंटरनेट आल्यावर तर इमेलमुळे पोस्टाची मृत्यूघंटाच वाजली. उरली सुरली कसर आरटीजीएस तंत्राने भरून काढली. पैसे पाठविण्याचे एकमेव माध्यम होत मनिआॅर्डर आणि इंन्शुअर्ड पार्सल परंतु आरटीजीएसमुळे काही क्षणात पैसे कुठून कुठेही पाठविणे शक्य झाले. एकेकाळी दुरध्वनी सेवा पोस्टाची मक्तेदारी होती. त्यालाही मोबाईल फोनमुळे सुरूंग लागला. त्यातून पोस्टाचे वैभव लयाला जात राहिले.इमेल, व्हॉट्स अ‍ॅप, मॅसेजिंग व तत्सम नव्या तंत्रामुळे , कुरिअर, पोस्टाचे महत्व दिवसेंदिवस कमी होते आहे. त्यात आहे त्या कार्यालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस