शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील पेन्शनधारकांचे पोस्टकार्ड अभियान, थेट पंतप्रधानांना पाठवणार पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 01:38 IST

विविध आंदोलनांद्वारे आपल्या पेन्शनवाढीसाठी प्रयत्न करूनही योग्य तो प्रतिसाद मिळत नाही.

- हितेन नाईकपालघर : विविध आंदोलनांद्वारे आपल्या पेन्शनवाढीसाठी प्रयत्न करूनही योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. तर दुसरीकडे भाजपनेच मागणी केलेल्या कोशियारी समितीच्या अंमलबजावणीकडे सत्तेवर आल्यावरही दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पालघर जिल्ह्यातून सुमारे अडीच हजार पेन्शनधारकांनी थेट पंतप्रधानांना पोस्ट कार्ड द्वारे पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत.केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी वगळता देशभरातील सर्व कामगारांसाठी केंद्र सरकारने १६ नोव्हेंबर १९९५ रोजी नवीन पेन्शन योजना (ईपीएस - ९५) सुरू केली. आज या योजनेचे ६५ लाख पेन्शनधारक आणि १८ कोटी कार्यरत सदस्य आहेत. ही योजना अत्यंत घाईघाईने सुरू करण्यात आल्याने दर दोन वर्षांनी तिचा आढावा घेण्याचे शासन पातळीवरून ठरले. मात्र पंधरा वर्षात याचा आढावा न घेतल्याने तत्कालीन भाजप नेते आणि राज्यसभा खा. प्रकाश जावडेकरांनी हा मुद्दा राज्यसभेत लावून धरला. त्यामुळे तत्कालीन सरकारने भगतसिंग कोशियारी समितीची स्थापना केली. स्वत: जावडेकरही या समितीचे सदस्य होते. या समितीने किमान ३ हजार रुपये मासिक पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता देण्याची शिफारस केली. मात्र तत्कालीन सरकारने अहवाल न स्वीकारल्याने आम्ही सत्तेवर येताच या अहवालाची अंमलबजावणी करु असे आश्वासन जावडेकर, नितीन गडकरी आणि पंतप्रधान मोदी यांनी २०१४ च्या निवडणूक प्रचारात दिल्याचे समितीचे पदाधिकारी अनिल ताहाराबादकर यांनी सांगितले. मात्र, पाच वर्षात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करु नही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.आज या योजनेद्वारे मिळणारे पेन्शन मासिक १ हजार ते अडीच हजार रु पये इतके अत्यल्प आहे. राष्ट्र घडविण्यासाठी आयुष्यातील उमेदीचा काळ घालविलेले वृद्ध आज वैफल्यग्रस्त आणि अगतिक अवस्थेत जगत आहेत. त्याचप्रमाणे ४ आॅक्टोबर १६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जास्त वेतन जास्त पेन्शनबाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणीही केंद्र सरकारकडून टाळली जाते आहे. त्यामुळे देशभरातील मोठा घटक आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.ईपीएस - ९५ समन्वय समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नागपूर येथे पार पडली. मोदी सरकारच्या मागील कालावधीत विविध आंदोलनाद्वारे पेन्शनवाढीसाठी प्रयत्न करु नही योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. आपणच मागणी केलेल्या कोशियारी समितीच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पेन्शनधारकांच्या प्रश्नाकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातून पंतप्रधानांच्या नावे पोस्टकार्ड पाठविण्याच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातून तब्बल अडीच हजार पोस्टकार्ड पाठवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी सांगितले.जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी जाणार संपावरकासा : जुन्या पेन्शन योजनेसाठी २० आॅगस्ट रोजी राज्य कर्मचारी संपावर जाणार असून यामध्ये डहाणू तालुक्यातील कर्मचारी सहभागी होणार असल्याचे निवेदन नुकताच जुनी पेन्शन हक्क संघटनेने डहाणू तहसीलदारांना दिले. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने सरकारी-निमसरकारी, ज्येष्ठ-कनिष्ठ असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकच म्हणजे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना अनेक वर्षांपासून सनदशीर मार्गाने प्रयत्न करत आहे. तरीही सरकार या मागणीचा विचार गांभीर्याने करत नसून योग्य तो निर्णय घेत नाही. परिणामी सरकारी कर्मचाºयामध्ये कमालीचा असंतोष आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क शाखा डहाणू संघटनेकडून जुनी पेन्शन मागणीचे निवेदन डहाणू तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी सेवेत दाखल प्रत्येक कर्मचाऱ्यांचे डीसीपीएस नावाखाली दहा टक्के मासिक वेतन कापून घेतले जाते. याचा साधा हिशोबही मिळत नाही. ही बाब अतिशय गंभीर असून सरकारने हा अन्याय लवकर दूर करावा, असे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सचिव शाहू भारती यांनी सांगितले. 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनpalgharपालघरNarendra Modiनरेंद्र मोदी