शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

काही वर्षांपासून किनाऱ्याची धूप : प्रकल्पांमुळे निसर्गावर घातला जाणार घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 23:42 IST

पर्यावरण हाच डहाणूतील पर्यटनाचा मुख्य घटक असल्याने पर्यटन हंगामाव्यतीरिक्तही येथे वर्षभर पर्यटकांचा राबता दिसून येतो.

डहाणू/बोर्डी : पर्यावरण हाच डहाणूतील पर्यटनाचा मुख्य घटक असल्याने पर्यटन हंगामाव्यतीरिक्तही येथे वर्षभर पर्यटकांचा राबता दिसून येतो. काही वर्षांपासून किनाºयाची धूप, बेकायदा बांधकाम यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून हा प्रश्न संवेदनशीलपणे न हाताळल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.उत्तर कोकणातील डहाणू हा तालुका राज्याच्या सागरी पर्यटनाचे कोंदण म्हणून ओळखला जातो. रुपेरी वाळू, कधी दगडी तर कधी अथांग किनारा, सुरू, कांदळवनाची हिरवी भिंत, चिकू आणि माडांची झालर यामुळे याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. तर समुद्रातील मासे आणि मोसमी फळांची मेजवानी मिळत असल्याने विविध पर्यटन हंगामात दरवर्षी पर्यटक दाखल होतात.कृषी उत्पादने आणि फळ प्रक्रिया उद्योगासह बागायतीच्या जोडीला इको टूरिझमची जोड देऊन हॉटेलिंग व्यवसायाची पाळेमुळे पसरू लागली आहेत.तरूण पिढी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन या व्यवसायात उतरली आहेत. पूर्वी जवळच्या मुंबई आणि गुजरातच्या शहरातून येणारे पर्यटक आता देश-विदेशातून येऊ लागले आहेत. वाळूशिल्प, तारपा, घोरनृत्य, दशावतार, वेगवेगळ्या यात्रा आणि चिकू महोत्सवासारख्या इव्हेंटमधून पर्यटन व्यवसायाला झळाळीच आली आहे.असे असताना मोठ्या प्रमाणात समुद्रातून होणा-या रेती चोरीमुळे किनाºयाची हानी आणि धूप होऊन दरवर्षी शेकडो झाडे जमीनदोस्त होतात. समुद्रातील तेल गळतीने तवंग पसरून विद्रुपीकरण होते. कायदा पायदळी तुडवून भराव टाकल्याने पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकारण हटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पर्यावरणाचा बळी घेतला जात असल्याची भावना पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात येऊ घातलेले विविध प्रकल्प आणि उद्योगधार्जिण्या धोरणाचा हट्ट काही मोजक्या घटकांनी धरल्याने समृद्ध असलेले पर्यावरण टिकवायचे कसे? जर तसे झाले तर पर्यटन व्यवसायाला परिणाम भोगावे लागतील.डहाणू समुद्र किना-यावर जी सुरूची झाडे आहेत ती चोरट्या वाळू उपशामुळे भरतीच्या लाटेत उन्मळून पडू लागली आहेत. प्रशासकीय यंत्रणेचे असलेले अभय व अनास्थेमुळे किनारे बकाल होऊ लागले आहेत. त्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारे असणे आवश्यक आहे. डहाणू तालुका पर्यावरण दक्षता प्राधिकरणामुळे अंकुश राहिला आहे. हे प्राधिकरण हटविण्यासाठी राजकीय खेळी खेळली जात आहे. यामुळे पुढे डहाणूतील स्थानिकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.- प्रवीण ना. दवणे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार