शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

काही वर्षांपासून किनाऱ्याची धूप : प्रकल्पांमुळे निसर्गावर घातला जाणार घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 23:42 IST

पर्यावरण हाच डहाणूतील पर्यटनाचा मुख्य घटक असल्याने पर्यटन हंगामाव्यतीरिक्तही येथे वर्षभर पर्यटकांचा राबता दिसून येतो.

डहाणू/बोर्डी : पर्यावरण हाच डहाणूतील पर्यटनाचा मुख्य घटक असल्याने पर्यटन हंगामाव्यतीरिक्तही येथे वर्षभर पर्यटकांचा राबता दिसून येतो. काही वर्षांपासून किनाºयाची धूप, बेकायदा बांधकाम यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून हा प्रश्न संवेदनशीलपणे न हाताळल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.उत्तर कोकणातील डहाणू हा तालुका राज्याच्या सागरी पर्यटनाचे कोंदण म्हणून ओळखला जातो. रुपेरी वाळू, कधी दगडी तर कधी अथांग किनारा, सुरू, कांदळवनाची हिरवी भिंत, चिकू आणि माडांची झालर यामुळे याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. तर समुद्रातील मासे आणि मोसमी फळांची मेजवानी मिळत असल्याने विविध पर्यटन हंगामात दरवर्षी पर्यटक दाखल होतात.कृषी उत्पादने आणि फळ प्रक्रिया उद्योगासह बागायतीच्या जोडीला इको टूरिझमची जोड देऊन हॉटेलिंग व्यवसायाची पाळेमुळे पसरू लागली आहेत.तरूण पिढी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन या व्यवसायात उतरली आहेत. पूर्वी जवळच्या मुंबई आणि गुजरातच्या शहरातून येणारे पर्यटक आता देश-विदेशातून येऊ लागले आहेत. वाळूशिल्प, तारपा, घोरनृत्य, दशावतार, वेगवेगळ्या यात्रा आणि चिकू महोत्सवासारख्या इव्हेंटमधून पर्यटन व्यवसायाला झळाळीच आली आहे.असे असताना मोठ्या प्रमाणात समुद्रातून होणा-या रेती चोरीमुळे किनाºयाची हानी आणि धूप होऊन दरवर्षी शेकडो झाडे जमीनदोस्त होतात. समुद्रातील तेल गळतीने तवंग पसरून विद्रुपीकरण होते. कायदा पायदळी तुडवून भराव टाकल्याने पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकारण हटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पर्यावरणाचा बळी घेतला जात असल्याची भावना पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात येऊ घातलेले विविध प्रकल्प आणि उद्योगधार्जिण्या धोरणाचा हट्ट काही मोजक्या घटकांनी धरल्याने समृद्ध असलेले पर्यावरण टिकवायचे कसे? जर तसे झाले तर पर्यटन व्यवसायाला परिणाम भोगावे लागतील.डहाणू समुद्र किना-यावर जी सुरूची झाडे आहेत ती चोरट्या वाळू उपशामुळे भरतीच्या लाटेत उन्मळून पडू लागली आहेत. प्रशासकीय यंत्रणेचे असलेले अभय व अनास्थेमुळे किनारे बकाल होऊ लागले आहेत. त्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारे असणे आवश्यक आहे. डहाणू तालुका पर्यावरण दक्षता प्राधिकरणामुळे अंकुश राहिला आहे. हे प्राधिकरण हटविण्यासाठी राजकीय खेळी खेळली जात आहे. यामुळे पुढे डहाणूतील स्थानिकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.- प्रवीण ना. दवणे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार