शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनासाठी पोलीस, पालिका यंत्रणा झाली सज्ज; चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:28 IST

स्टॉलवरील कारवाईबाबत चालढकल

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाची पोलीस आणि महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. ५०० पेक्षा जास्त पोलीस, तर १४० सार्वजनिक, तर १४०० खाजगी गणेशमूर्तींचे विसर्जन होईल, अशी पोलिसांची आकडेवारी आहे. विसर्जनमार्गावर तात्पुरते लावले जाणारे बेकायदा स्टॉल, मंडपांना आम्ही परवानगी दिलेली नसून रहदारीला अडथळा होत असेल, तर कारवाईची जबाबदारी पोलिसांची असल्याचे सांगून पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी पोलिसांच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे. पोलिसांनी मात्र पालिकेने कारवाई करावी, असे पालिकेला कळवले आहे.

मीरा-भार्इंदरमध्ये महापालिकेने शहरात २२ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये शिवार उद्यान येथील एका कृत्रिम तलावाचाही समावेश आहे. खाडीकिनारे, तलाव व समुद्रकिनारी पालिकेने विद्युत रोषणाईसह मंडप, आरतीसाठी टेबलव्यवस्था तसेच विसर्जनासाठी ५८० कर्मचारी, बोट, तराफे, हायड्रॉलिक क्रेन, फॉर्क लिफ्ट आदींची व्यवस्था केली असल्याचे आयुक्त खतगावकर म्हणाले.विसर्जनमार्गावर लागणारे स्टॉल, मंडप, स्टेज, टेबल आदींसाठी आम्ही कुणालाच परवानगी दिलेली नाही. याचा रहदारीला अडथळा होत असेल वा यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अशा मंडप-स्टेजवर कारवाईची जबाबदारी पोलिसांची असल्याचे आयुक्त म्हणाले. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यासोबत मिळून पालिका कारवाई करेल, अशी पुस्तीही आयुक्तांनी जोडली.

दुसरीकडे, पोलीस उपअधीक्षक कार्यालय तसेच भार्इंदर पोलीस ठाणे आदींनी मात्र महापालिकेला पत्र देऊन विसर्जनमार्गावर अडथळा ठरणारे कोणत्याही प्रकारचे मंडप, स्टॉल आदी लावण्याची परवानगी देऊ नये, असे कळवतानाच पालिकेने कारवाई करावी, असे कळवले आहे. विसर्जनमार्ग आधीच अरुंद असताना त्यात लागणारे खाद्य-पेयाचे स्टॉल, स्वागत मंडप व स्टेज आदींमुळे गर्दी होऊन अगदी धक्काबुक्की व चेंगराचेंगरीही होते. उष्टं-खरकटं तसेच टाकून जात असल्याने दुसऱ्या दिवशी तर रस्त्यांचा उकिरडा झाला असतो. पोलीस दरवर्षी पालिकेला पत्र लिहून कळवत असतात. पण, पालिकेचे अशा स्टॉलधारकांशी तसेच राजकारण्यांशी असलेल्या अर्थपूर्ण संगनमतामुळे पालिका कारवाई करत नसल्याचा आरोप अ‍ॅड. सुशांत पाटील यांनी केला आहे.दरम्यान, विसर्जनासाठी शहरात ४७ पोलीस अधिकारी, ४४२ पोलीस कर्मचारी, १५० होमगार्ड यांच्याबरोबरच राज्य राखीव दलाची एक, तर दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, वाहतूक पोलिसांसह एनसीसी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. सीसीटीव्ही लावण्यात आले असून विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस