शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

आदिवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 01:46 IST

जव्हार तालुक्यातील परिस्थिती : रस्त्यांच्या दुरवस्थेवर मतदार नाराज

- हुसेन मेमन ।

जव्हार : ग्रामीण आदिवासी भागातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी करोडो रुपये निधी उपलब्ध होतो. मात्र, आजही आदिवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. त्यामुळे येथील आदिवासी मतदार वैतागले असून, नेत्यांच्या प्रचाराला येणाऱ्या कार्यकर्त्यांना, आदिवासी भागातील निधी जातो कुठे? अशी विचारणा केली जात आहे.

जव्हार तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, १०९ महसूल गावे आणि २४५ पाडे आहेत. मात्र या तालुक्याला जोडणाºया रस्त्यांची कामे न झाल्याने मतदारांना दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यामुळे आदिवासी मतदार यावर्षी कोणाला कौल देणार हे अनुत्तरीतच आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती बांधकाम विभाग या विभागांकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दरवर्षी करोडो रुपये येत आहेत. मात्र, तरीही तालुक्यातील गावांना जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.

जव्हार ते दाभोसा, सिल्वासा - गुजरात रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे. त्यातच पावसाळ्यात ठिकठिकाणी रस्ता वाहून गेल्याने दुरवस्था झाली आहे. जव्हार - वाडा - विक्र मगड रस्ता हे तालुक्यातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. आदिवासी भागातील देहेरे - मेढा रस्ता, केळीचापाडा - साकूर, झाप रस्ता, जामसर - सारसून, ढाढरी रस्ता, या ग्रामीण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची देखील दुर्दशा झालेली दिसते. दरवर्षी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी लाखोंचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था बिकट कशी, असा प्रश्न नागरिकांना भेडसावतो आहे.

तालुक्यातील काही रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण किंवा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामे झाली आहेत.परंतु हे डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते आणि बुजविण्यात आलेले खड्डे वर्षभरातच उखडून निघाल्याचे चित्र दिसते आहे. खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे वाहन चालक आणि नागरिक वैतागले आहेत.

साधे खड्डे बुजविण्यात पालिका असमर्थ

जव्हार शहरातील मुख्य रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली असून, रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली आहे. यामुळे अपघात होत आहेत. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होते आहे. कित्येक वर्षापासून भाग शाळा ते सोनार आळी या रस्यावर मोठा खड्डा पडला आहे. याबाबत बांधकाम विभागाला सांगूनही आजतागायत तो खड्डा बुजवण्यात आलेला नाही. तसेच शहरातील तारपा चौक ते भाग शाळा आणि तारपा चौक ते सोनार आळी या रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून रस्त्यावर खडी पसरली. त्यामुळे येथे दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री बे-रात्री ही खडी वाहन चालकांना दिसत नाही. परिणामी अपघात होतात. तसेच सूर्यतलाव ते मांगेलवाडा या रस्त्याची तर भयानक अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठ मोठ खड्डे पडले असून वाहन चालकांना पाठीचे रोग जडल्याच्या घटना घडत आहेत.

संपूर्ण शहरात रस्त्यांची अवस्था बिकट असूनही बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार नागरीक करीत आहेत. गणेशोत्सवाच्या काळातही पाऊस खूप असल्याचे कारण देत पालिकेने खड्डे बुजविले नव्हते. तर नवरात्रातही तेच कारण देत खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. आता यात नगरध्यक्षांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

आम्ही खड्डे बुजविण्याचे काम लवकरच सुरू होईल. रस्त्यावर उखडलेल्या खडी उचलण्याच्या सूचना देतो. सध्या इलेक्शन ड्यूटीच्या कामात सर्वच कर्मचारी व्यस्त असल्याचे जव्हार नगर पालिकेचे मुख्याधिकारी मिलींद बोरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक