शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

चिंतामण वनगा यांना भावपूर्ण निरोप, मुख्यमंत्री, पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडून श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 04:42 IST

मंगळवारी दिल्लीत निधन झालेल्या भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव बुधवारी सकाळी १०च्या सुमारास तलासरीतील कवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्या वेळी आदिवासी बांधवांना व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

पालघर/बोर्डी - मंगळवारी दिल्लीत निधन झालेल्या भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव बुधवारी सकाळी १०च्या सुमारास तलासरीतील कवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्या वेळी आदिवासी बांधवांना व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.अंत्यविधीसाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे यांसह वरिष्ठ भाजपा नेत्यांनी वनगा परिवाराचे सांत्वन करून वनगा यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केल्यानंतरदुपारी ३च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आदिवासींचा चिंतामणी हरपलामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वादोनच्या सुमारास कवाडा वनगापाडा येथील वनगा यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून वनगा यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या त्यांच्याच शेतापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव, भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. ३ वाजता आदिवासी परंपरा आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.तत्पूर्वी बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईहून त्यांचे पार्थिव अ‍ॅम्ब्युलन्सने तलासरी येथे आणण्यात आले. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी कल्याण केंद्रात आणि भाजपा कार्यालयाच्या आवारात ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुष्परथातून ते कवाडा येथील निवासस्थानाकडे नेण्यात आले. या वेळी वनगा कुटुंबीयांसमवेत समाजबांधवांनाही दु:ख आवरणे अवघड झाले होते.हजारो समाजबांधव, भाजपा कार्यकर्ते यांनी वनगांच्या निवासस्थानासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात वनगा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा, मनीषा चौधरी, पक्ष सचिव ओमप्रकाश शर्मा आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.मंत्रिमंडळ बैठकीत निधनाची बातमी कळाल्यावर शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. त्यांचे नेतृत्व संघर्षातून तयार झालेले होते तसेच त्यांच्यावर राष्ट्रीय विचारांचा पगडा होता. त्यांच्या जाण्याने खºया अर्थाने आदिवासींचा नेता हरपला आहे. मी त्यांचे विधानसभेतील काम खूप जवळून पाहिले आहे. ते तळागाळातल्यांचे प्रश्न तर मांडत होतेच; पण ते सोडवताना मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांची अपुरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करू हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.- देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री

टॅग्स :Chintaman Wangaचिंतामण वनगाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र