शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

पालघर जि.प. निवडणुकीत महाविकास आघाडी शक्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 22:41 IST

आघाडीतील घटक पक्षांचे सूतोवाच : जिल्ह्यातही भाजपला रोखण्याची तयारी

हुसेन मेमन।लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : राज्यात भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांची महाविकास आघाडी तयार होऊन सरकार स्थापनही झाले. आता पालघर जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वच पक्ष सामोरे जाणार असून अशा वेळी पालघर जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकांतही महाविकास आघाडी होऊ शकते का, याबाबत चर्चा सुरू आहे. तसे सूतोवाचही या पक्षांकडून करण्यात येत आहे, मात्र तसा कोणताही अधिकृत आदेश जरी वरिष्ठांकडून मिळाला नसला तरीही तो लवकरच मिळू शकतो, या शक्यतेने आघाडी झाल्यास काय आणि कसे लढता येईल, याचीही चाचपणी आघाडीतील या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू झाली आहे. जिल्ह्यात महाआघाडीतील बविआ आणि सीपीएम या दोन पक्षांचाही विचार अशा वेळी करावा लागणार असल्याने यापूर्वीची महाआघाडी कायम राहील की महाविकास आघाडी तयार होईल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

पालघर जिल्ह्यात विधानसभेतील मोठा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडीकडे पाहिले जाते. अशा वेळी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बविआ, सीपीएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी एकत्र लढली होती. विधानसभा निवडणुकीत पालघर सोडले तर बाकी पाचही विधानसभा मतदारसंघांत महाआघाडीने विजय मिळवत भाजपचा धुव्वा उडवला होता. मात्र यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हीच आघाडी जि.प.मध्येही होणार का, असाही सवाल आता उपस्थित होत आहे. शिवसेनेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा झाली. या वेळी राज्यात चांगला संदेश देण्यासाठी अशी आघाडी जि.प. निवडणुकीत शक्य असून तसा आदेशही येऊ शकतो. यामुळे तशीही आणि स्वबळाचीही अशा दोन्ही तयारी ठेवा, अशा सूचना करण्यात आल्याने या आघाडीची शक्यता अजिबात नाकारता येत नाही, मात्र पालघरात अशी महाविकास आघाडी करताना अनेक अडचणी येऊ शकतात. कारण सत्ता स्थापनेनंतर बविआ या आघाडीत सामील झाली असली तरी सीपीएमने मात्र पाठिंबा दिलेला नाही. यामुळे सीपीएम वगळता आघाडी करायची ठरल्यास विधानसभेसाठी झालेल्या महाआघाडीला तिलांजली देणे बविआ आणि राष्ट्रवादीसाठी शक्य नाही.

कारण लोकसभेत बविआ आणि विधानसभेत राष्ट्रवादीच्या पाठीमागे सीपीएम खंबीरपणे उभी राहिली होती, मात्र आता महाविकास आघाडीतील सेनेच्या समावेशामुळे सीपीएम या आघाडीत राहील का? याबात शंका उपस्थित होत आहे. तसे न झाल्यास याचा थेट परिणाम काही जागांवर होऊ शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडी झाल्यास जिल्ह्यात आठही तालुक्यांतील पंचायत समिती आणि जि.प.वर महाविकास आघाडीची सत्ता असेल, अशी स्थिती आहे. दुसरीकडे जर सगळेच स्वबळावर लढले तर आज जशी परिस्थिती आहे, त्यात थोड्याफार प्रमाणात बदल होऊन राष्ट्रवादीच्या जागा वाढू शकतील, मात्र यानंतरही आज ज्या पद्धतीने भाजप, सेना, बविआ यांनी मिळून सत्ता स्थापन केली आहे, तशी स्थिती आता होणार नाही. मात्र निवडणुकीनंतर सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ मिळून सत्ता स्थापन करू शकतील.भाजप जिल्ह्यात एकाकी पडल्याचे चित्रजिल्ह्यात भाजपाला या निवडणुकीत धक्का बसू शकतो. कारण खासदार-आमदार नसलेली भाजप जिल्ह्यात एकाकी पडलेली दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडीनंतर हे सरकार राज्याला स्थिर सरकार देऊ शकते.आमची आघाडी विचारातून समसमान विकास कार्यक्रमातून झालेली असल्याचा संदेश देण्यासाठी या जि.प. निवडणुकीत ही महाविकास आघाडी शक्य असल्याचे सूतोवाच आज तरी सर्वच पक्षांकडून केले जात आहे. यामुळे कोण कोणत्या आणि किती जागा लढणार आणि स्थानिक पातळीवर एवढ्या कमी वेळात मनोमीलन होईल का, याही बाबी ही आघाडी होताना महत्त्वाच्या ठरणार आहेत.