शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालघरला हुतात्म्यांना वंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 02:32 IST

इंग्रजा विरोधातील चलेजाव चळवळी दरम्यान पालघरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना हुतात्मा स्तंभाजवळ मंगळवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पालघर : इंग्रजा विरोधातील चलेजाव चळवळी दरम्यान पालघरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना हुतात्मा स्तंभाजवळ मंगळवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या रक्ताच्या सिंचनाने पवित्र झालेल्या ध्वजाचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळेसह अनेक मान्यवरांनी श्रद्धापूर्वक पूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.१४ आॅगस्ट १९४४ पासून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याची प्रथा अविरत सुरू असून आज पालघर तहसीलदार कार्यालया जवळील हुतात्मा स्मारकाजवळून हुतात्मा स्तंभापर्यंत मूक मिरवणूक काढण्यात आली. १२ वाजून ३९ मिनिटांनी ‘दिन खून के हमारे, यारो न भूल जाना’ हे स्फूर्ती गीते विद्यार्थ्यांनी गायले. त्यानंतर पालकमंत्री विष्णू सवरा, माजी आमदार नवनीतभाई शहा, आमदार अमित घोडा, उपनगराध्यक्ष रईस खान, जि.प, उपाध्यक्ष निलेश गंधे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, तहसीलदार महेश सागर,नायब तहसीलदार नवनीत पाटील, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण, भाजपचे प्रशांत पाटील, बाबा कदम, सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शहा, काँग्रेसचे केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, नगरसेवक प्रीतम पाटील, सचिन पाटील, आदींसह स्वातंत्रसैनिकांचे कुटुंबीय, अनेक पक्षाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवण्यात आली होती.१४ आॅगस्ट १९४२ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले हजारो देशबांधव ब्रिटीशांविरोधी घोषणा देत कचेरीचा ताबा घेण्यासाठी निघाले होते. इंग्रज अधिकाऱ्यांनी आंदोलकांना शिवीगाळ केल्या नंतर चवताळलेले आंदोलक पोलिसांचे कडे तोडून कचेरीच्या दिशेने त्वेषाने निघाले.यावेळी इंग्रज अधिकारी अल्मेडा ह्यांनी केलेल्या गोळीबारात प्रथम गोविंद गणेश ठाकूर हे जखमी होऊन त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले.आपल्या सहकाºयाच्या झालेल्या मृत्यूने स्वातंत्र्यवीर बेभान झालेत.भारत माता की जय च्या घोषणा देत ते त्वेषाने चालून गेले. यावेळी झालेल्या अमानुष गोळीबारात रामप्रसाद तिवारी, काशीनाथभाई हरी पागधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामचंद्र महादेव चुरी आणि सुकुर गोविंद मोरे यांना हौतात्म्य प्राप्त झाले.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र जय्यत तयारीबोईसर : स्वातंत्र्य दिना निमित्त बोईसरसह - तारापूर परिसरातील शाळा , महाविद्यालये, ग्रामपंचायती व शासकीय कार्यालयात ध्वजरोहणा बरोबरच विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी दिवसभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू होती.बोईसर एज्युकेशन च्या डॉ स.दा. वर्तक विद्यालयात ध्वजरोहण पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील यांचे हस्ते होणार आहे त्या नंतर इयत्ता १० वी च्या परीक्षेत ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळ विलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विषयांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लेझीम, परेड, कवायतीची बॅण्ड पथकासह एका ताला सुरात रिहर्सल सुरू होती तर शाळा, कार्यालयातील ध्वजरोहणाच्या परिसराची स्वच्छता करण्यात येत होती तर बाजारात राष्ट्रध्वजाबरोबरच टी शर्टही झळकत होते.स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्र माची सज्जताबोर्डी : ७१ व्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण समारंभाचा मुख्य शासकीय कार्यक्र म उपजिल्हाधिकारी पांडुरंग मगदुम यांच्या हस्ते पारनाका येथील के. एल. पोंदा हायस्कूलच्या पटांगणावर ९ वाजून ५ मिनिटांनी होणार आहे. या करिता नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार राहुल सारंग यांनी केले आहे.बुधवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्र माची धावपळ सर्वत्र दिसून आली. पूर्वसंध्येला विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणचे पटांगण आणि परिसराची स्वच्छता करण्यासह ध्वजस्तंभाची रंगरंगोटी करण्यावर भर देण्यात आला. तर शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परेड आणि ध्वजसलामीसाठी सराव केला.तालुक्यातील ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पारनाका येथे होणार आहे तर भारतीय तटरक्षक दलाकडून ध्वजारोहण कार्यक्र मानंतर कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी संस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन केले जाणार आहे. तर दुपारी ३ वाजता तरूणांकरिता या दलात भरती होण्याकारिता लागणारी पात्रता या विषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित केल्याची माहिती कमांडंट एम. विजयकुमार यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या