शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

पालघरला हुतात्म्यांना वंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 02:32 IST

इंग्रजा विरोधातील चलेजाव चळवळी दरम्यान पालघरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना हुतात्मा स्तंभाजवळ मंगळवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पालघर : इंग्रजा विरोधातील चलेजाव चळवळी दरम्यान पालघरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना हुतात्मा स्तंभाजवळ मंगळवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या रक्ताच्या सिंचनाने पवित्र झालेल्या ध्वजाचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळेसह अनेक मान्यवरांनी श्रद्धापूर्वक पूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.१४ आॅगस्ट १९४४ पासून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याची प्रथा अविरत सुरू असून आज पालघर तहसीलदार कार्यालया जवळील हुतात्मा स्मारकाजवळून हुतात्मा स्तंभापर्यंत मूक मिरवणूक काढण्यात आली. १२ वाजून ३९ मिनिटांनी ‘दिन खून के हमारे, यारो न भूल जाना’ हे स्फूर्ती गीते विद्यार्थ्यांनी गायले. त्यानंतर पालकमंत्री विष्णू सवरा, माजी आमदार नवनीतभाई शहा, आमदार अमित घोडा, उपनगराध्यक्ष रईस खान, जि.प, उपाध्यक्ष निलेश गंधे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, तहसीलदार महेश सागर,नायब तहसीलदार नवनीत पाटील, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण, भाजपचे प्रशांत पाटील, बाबा कदम, सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शहा, काँग्रेसचे केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, नगरसेवक प्रीतम पाटील, सचिन पाटील, आदींसह स्वातंत्रसैनिकांचे कुटुंबीय, अनेक पक्षाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवण्यात आली होती.१४ आॅगस्ट १९४२ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले हजारो देशबांधव ब्रिटीशांविरोधी घोषणा देत कचेरीचा ताबा घेण्यासाठी निघाले होते. इंग्रज अधिकाऱ्यांनी आंदोलकांना शिवीगाळ केल्या नंतर चवताळलेले आंदोलक पोलिसांचे कडे तोडून कचेरीच्या दिशेने त्वेषाने निघाले.यावेळी इंग्रज अधिकारी अल्मेडा ह्यांनी केलेल्या गोळीबारात प्रथम गोविंद गणेश ठाकूर हे जखमी होऊन त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले.आपल्या सहकाºयाच्या झालेल्या मृत्यूने स्वातंत्र्यवीर बेभान झालेत.भारत माता की जय च्या घोषणा देत ते त्वेषाने चालून गेले. यावेळी झालेल्या अमानुष गोळीबारात रामप्रसाद तिवारी, काशीनाथभाई हरी पागधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामचंद्र महादेव चुरी आणि सुकुर गोविंद मोरे यांना हौतात्म्य प्राप्त झाले.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र जय्यत तयारीबोईसर : स्वातंत्र्य दिना निमित्त बोईसरसह - तारापूर परिसरातील शाळा , महाविद्यालये, ग्रामपंचायती व शासकीय कार्यालयात ध्वजरोहणा बरोबरच विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी दिवसभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू होती.बोईसर एज्युकेशन च्या डॉ स.दा. वर्तक विद्यालयात ध्वजरोहण पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील यांचे हस्ते होणार आहे त्या नंतर इयत्ता १० वी च्या परीक्षेत ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळ विलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विषयांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लेझीम, परेड, कवायतीची बॅण्ड पथकासह एका ताला सुरात रिहर्सल सुरू होती तर शाळा, कार्यालयातील ध्वजरोहणाच्या परिसराची स्वच्छता करण्यात येत होती तर बाजारात राष्ट्रध्वजाबरोबरच टी शर्टही झळकत होते.स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्र माची सज्जताबोर्डी : ७१ व्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण समारंभाचा मुख्य शासकीय कार्यक्र म उपजिल्हाधिकारी पांडुरंग मगदुम यांच्या हस्ते पारनाका येथील के. एल. पोंदा हायस्कूलच्या पटांगणावर ९ वाजून ५ मिनिटांनी होणार आहे. या करिता नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार राहुल सारंग यांनी केले आहे.बुधवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्र माची धावपळ सर्वत्र दिसून आली. पूर्वसंध्येला विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणचे पटांगण आणि परिसराची स्वच्छता करण्यासह ध्वजस्तंभाची रंगरंगोटी करण्यावर भर देण्यात आला. तर शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परेड आणि ध्वजसलामीसाठी सराव केला.तालुक्यातील ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पारनाका येथे होणार आहे तर भारतीय तटरक्षक दलाकडून ध्वजारोहण कार्यक्र मानंतर कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी संस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन केले जाणार आहे. तर दुपारी ३ वाजता तरूणांकरिता या दलात भरती होण्याकारिता लागणारी पात्रता या विषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित केल्याची माहिती कमांडंट एम. विजयकुमार यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या