शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पालघर व कोकण पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:44 IST

जागतिक स्तरावर पहिली चिकू वायनरी पालघरच्या बोर्र्डीनजीक उभारून वर्ल्ड वाईन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंका सावे यांना काय वाटतं ?

अनिरुद्ध पाटील 

फळ वाईन व मीड उद्योगाला चालना देण्याकरिता उत्पादन शुल्क विभागाने द्राक्षा व्यतिरिक्त फळ वाईन्स व मीडवर प्रति बल्क लीटर एक रूपया उत्पादन शुल्क आकरण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात फळांचे उत्पादन घेतले जाते मात्र फक्त दोन वायनरी आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे त्या वाढतील जागतिक स्तरावर पहिली चिकू वायनरी पालघरच्या बोर्र्डीनजीक उभारून वर्ल्ड वाईन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंका सावे यांना काय वाटतं ?प्रश्न: वायनरी उद्योगाबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे?पूर्वी द्राक्षाव्यतिरिक्त सर्व वाईन्स व मीड (मधापासून बनवलेली वाईन)ला शंभरटक्के उत्पादन शुल्क आकारले जायचे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होऊन या वाईन्सची किंमत खूपच जास्त असल्याने खप कमी होता. हा व्यवसाय टिकविण्याकरिता दिव्यच करावं लागत होतं. मात्र उत्पादन शुल्क विभागाने मीड आणि जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद आणि काजू बोंडापासून तयार होणाºया वाईनला प्रति बल्क लीटरवर फक्त एक रुपया उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने या पुढे त्याचा परिणाम होऊन विशेषत: कोकणातील वायनरी उद्योगाला चालना मिळेल.

हा महत्वाचा निर्णय घ्यायला शासनाकडून उशीर झाला? का?नक्कीच! उशीर झाला आहे. मात्र देर आए, दुरु स्त आए असं मी म्हणेन. मागील दहा वर्षांपासून हा संघर्ष सुरू होता. कोकण पर्यटन उद्योग संघाचे संस्थापक माधव भंडारी, वाईन उद्योग यांच्या मार्फत सातत्याने प्रयत्नशील होतो. शिवाय आमदार मनिषा चौधरी, पालघरचे माजी पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या पाठ पुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आण िउत्पादन शुल्क मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे या बाबत आभार मानेन.सध्या वायनरी उद्योगाची परिस्थिती काय आहे?राज्यात द्राक्षा व्यतिरिक्त वायनरी या वाई, पुणे, रत्नागिरी आणि बोर्डीनजीक आहेत. त्यापैकी कोकणात रत्नागिरीतील सावर्डे येथे निलेश लेले यांची आंबा, जांभूळ यांच्या पासून तर 2016 पासून पालघरच्या बोर्डीनजिक आम्ही वायनरी उभी केली असून चिकू, आंबा, अननस, स्टारफ्रुटपासून वाईन आणि मीड तयार करीत आहोत. कोकणचा विचार केल्यास, येथे स्टारफ्रूट, फणस, कोकम, काजू, अननस, करवंद आदी फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या फळांना प्रतिकिलोचा दर आणि बाजारातील मागणी पाहता उत्पादन चांगले येऊनही शतकऱ्यांच्या हाती काही लागत नाही. शिवाय मोठ्या प्रमाणात फळं वाया जातात. द्राक्षा व्यतिरिक्त अन्य फळांच्या वाईनला उत्पादन शुल्क माफ नसल्याने संधी असूनही या उदयोगाकडे वळायची कोणाची हिम्मत होत नव्हती. मात्र या निर्णयाचा चांगला परिणाम होऊन नवीन उद्योजक निर्माण होतील हे नक्की.

पर्यटन आणि शेती व्यवसायावर कोणता परिणाम होईल?सध्या चिकूचा विचार केल्यास प्रति किलोचा दर खूपच कमी असून हमी भाव नसल्याने उत्पादन खर्चही परवडत नाही. कोकणातील हापूस वगळता सर्व फळपिकांची स्थिती सारखीच आहे. त्यामुळे शेतकºयांच्या पिकाला वाईन उद्योगामुळे चांगला भाव मिळेल. मधुमक्षिका पालन वाढेल. शिवाय परदेशात वाईन टुरिझम चांगल्या प्रकारे नावारूपाला आले आहे. आमच्या वायनरीला भेट देणाºया पर्यटकांची संख्या सुखावणारी असल्याने या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना मिळेल.