शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

खाडीच्या पाण्याने भातशेती नापिक होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:33 AM

माकूणसार खाडीतील तिवरांची लागवड करण्यासाठी वन विभागाने खोदलेल्या चरा मुळे खाडीचे पाणी भातशेतीमध्ये घुसून अनेक शेतक-यांच्या जमिनी नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पालघर : माकूणसार खाडीतील तिवरांची लागवड करण्यासाठी वन विभागाने खोदलेल्या चरा मुळे खाडीचे पाणी भातशेतीमध्ये घुसून अनेक शेतक-यांच्या जमिनी नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.केळवे-सफाळे मार्गावरील माकुणसार खाडी पुलाजवळील पूर्वेकडील भूखंडावर आणि माकूणसार गावात वन विभागामार्फत तिवरांची रोपे लागवडीचे काम सुरू आहे. त्यांच्या लागवडीसाठी खाºया पाण्याची गरज असल्याने पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी वन विभागाने अजब मार्ग शोधला आहे. खाडी क्षेत्रातील अनेक ठिकाणावर जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठे मोठे चर खोदले आहेत. या नाल्यांमुळे माकुणसार खाडी पात्र गावच्या सुपीक जमिनीच्या जवळ आणल्याचा आरोप गांवकरी आणि शेतकºयांनी केला आहे.कांदळवन असलेल्या जमिनीच्या शेजारीच गावातील शेतकºयांच्या जमिनी असून त्यावर दरवर्षी भाताचे पीक घेतले जाते. परंतु वन विभागाने या संपूर्ण भूखंडावर चर खोदल्याने खाडीचे पाणी त्यामधून पूर्ण शेतीवर पसरून ती जमीन आता नापीक होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत, तसेच या चरामधील खारे पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पेयजलाचे स्त्रोतही खारट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने केलेल्या या खोदकामाविरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभेत मोठ्या संख्येने रोष व्यक्त करून या विरोधात ठराव मंजूर केला. पालघरच्या जिल्हाधिकाºयाना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून उपाय योजण्याची मागणी केली आहे. करण्यात आली आहे.