शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वसई तालुक्यात भातकापणीची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:44 PM

नैसर्गिक आणि कोरोना अशा दोन्ही आपत्तींचा आर्थिक स्तरावर वसईतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

विरार : पालघर जिल्ह्यात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने माेठ्या प्रमाणावर भातपीक वाया गेले. वसई तालुक्यातील शेतकऱ्यांनाही त्याचा जबरदस्त फटका बसला हाेता. शेतीवर केलेला खर्च असा डाेळ्यांदेखत पाण्यात गेल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत आसू उभे राहिले. मात्र, खाचरात पाणी साचून राहिल्याने जे तयार पीक उरले हाेते, त्याची कापणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे.

नैसर्गिक आणि कोरोना अशा दोन्ही आपत्तींचा आर्थिक स्तरावर वसईतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीच्या तडाख्यानंतर जे भातपीक वाचले आहे, ते त्याची कापणी आणि झोडणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असलेला ससुनवघर, बापाणे, जूचंद्र, मालजीपाडा तसेच वसई पूर्वेतील कामण-चिंचोटी परिसर तसेच विरार पूर्वेतील सकवार, भारोळ, चंदनसारपर्यंतचा परिसर भातशेती लागवड करणारा मोठा ग्रामीण परिसर आहे.

दरवर्षी मान्सून पर्जन्यावर कसली जाणारी येथील भातशेती स्थानिक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. काही वर्षांपासून पावसाची अनियमितता, अतिवृष्टी, ऐन भातकापणीच्या हंगामात अवकाळीचा तडाखा अशा लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांना या परिस्थितीला ताेंड द्यावे लागले. हजाराे हेक्टरवरील उभी पिके आडवी झाली. त्यातूनही वाचलेले भातपीक कापून त्यांचे भारे शेतकऱ्यांनी खळ्यात आणून झोडणीला वेग दिला आहे. अवकाळीने शेतकऱ्यांच्या हाती  खर्चही लागणार नसल्यामुळे उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्‍न उपस्थित हाेत आहे. नुकसानीचे शासनाने पंचनामे करूनही अद्याप त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार