शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दफनभूमीच्या मार्गातील अडथळा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 1:39 AM

वसई-विरार महापालिका । पाणथळ विभागाचीही परवानगी

वसई : सात ते आठ वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात सापडून रखडपट्टी झालेल्या वसईच्या दिवाणमान येथील सनसिटी येथील सर्वधर्मीय दफनभूमी विकसित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी व्यवस्थापन प्राधिकरणानंतर पाणथळ जागेच्या नियमांनुसारही परवानगी मिळाली आहे.

वसई-विरार शहर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर साधारण पहिल्याच टर्ममध्ये प्रथम महापालिका प्रशासनाने सरकारी जागा पालिकेच्या ताब्यात देण्याबाबत आग्रह धरला. त्यानुसार, तिथे सर्वधर्मीयांसाठी दफनभूमी तयार करण्याची योजना तयार केली आणि त्याचा पाठपुरावाही सुरू केला.सर्वप्रथम त्यासाठी वसईच्या सनसिटी येथे ११ एकर जागा आरक्षित केली. राज्य शासनाकडून २०११ मध्ये ही जागा महापालिकेच्या ताब्यात आली होती. पालिकेने ठराव करत २०१२-१३ मध्ये या जागेवर मातीभराव करून संरक्षक भिंत बांधली. मात्र, नागरी वसाहत असल्याने या प्रस्तावित दफनभूमीला स्थानिक नागरिक आणि काही राजकीय पक्ष व संघटनांनी विरोध केला होता.

खाजण जागेवर पालिकेने केलेले दफनभूमीचे बांधकाम हे सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राचे उल्लंघन करणारे असल्याचा गंभीर आरोप करून तेव्हा शिवसेनेच्या सुनील मुळये यांनी पुणे येथील हरित लवादाकडे तक्रार केली. यानंतर हरित लवादाने या जागेवरील संरक्षक भिंतीचे बांधकाम थांबवून भिंत पाडण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत या दफनभूमीचे काम रखडले होते. मात्र आता संबंधित विभागांची परवानगी मिळाल्यामुळे दफनभूमीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. दफनभूमीच्या कामासाठी ज्या परवानग्या आवश्यक होत्या, त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, अशी माहिती पालिकेचे नगररचना विभागाचे संचालक वाय.एस. रेड्डी यांनी ‘लोकमत’ला दिली.वसईतील दिवाणमान सनसिटी येथील दफनभूमीच्या कामासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. यापुढे दफनभूमी बांधण्याचे व ती विकसित करण्याचे काम हा प्रशासकीय निर्णय आहे. विशेष प्रशासकीय स्तरावर हे काम पुढे नेले जाईल.- वाय.एस. रेड्डी, संचालक,नगररचना विभाग, वसई-विरार महापालिका