शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

पालघर जिल्ह्यात शिवसेनेमध्ये बाहेरून आलेल्यांना चारही मतदारसंघांत उमेदवारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 05:54 IST

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी वसई, नालासोपारा, पालघर आणि डहाणू हे चार विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत.

- पंकज राऊतबोईसर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी वसई, नालासोपारा, पालघर आणि डहाणू हे चार विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. या चारही मतदार संघामध्ये शिवसेनेकडून ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली ते सर्व नव्याने शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेले आहेत.निवडणुकीत डावलले गेल्याने नाराज होऊन जिल्ह्यातील ज्येष्ठ सेना पदाधिकारी प्रकाश निकम यांनी आपला राजीनामा पक्ष प्रमुखांकडे आज पाठविला आहे. सेना नेत्यांनी याकडे गंभीरतेने न पाहिल्यास नाराजीमध्ये वाढ होऊन निवडणुकीतील गणिते बदलून त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.काँग्रेसमधून सेनेत दाखल झालेले विजय पाटील यांना वसईतून, पोलीस दलातून राजीनामा देऊन शिवबंधन बांधलेले प्रदीप शर्मा, दोन टर्म बोईसरची आमदारकी घेऊन बविआघाडीतून सेनेत प्रवेश घेतलेले विलास तरे तर २०१८ च्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये स्व.खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना भाजपाने पोटनिवडणुकीमध्ये तिकीट नाकारल्यानंतर राजकीय खेळी व भाजपाला खिंडीत पकडण्याच्या उद्देशाने शिवसेनेत घेतल्याने वनगा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वांना उमेदवारी देऊन शिवसेनेचे इच्छुक व निष्ठावंताच्या जखमेवरच मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे.२००९ पूर्वी उत्तर मुंबई लोकसभेचे क्षेत्र पालघरपर्यंत होते तेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर व हितेंद्र ठाकूरांच्या पाठिंब्यामुळे सिनेअभिनेते गोविंदा निवडून येऊन त्यांनी खासदारकीची (अयशस्वी ) पहिली व एकमेव टर्म सोडली तर भाजपा-सेना युतीचे राम नाईकांचे अधिराज्य होते. त्यानंतर २००९ मध्ये उत्तर मुंबई व डहाणू मतदार संघाची पुनर्रचना करून वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर, विक्र मगड व डहाणू या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदार संघ नव्याने निर्माण करण्यात आला.२००९ मधील पालघर लोकसभेची पहिली निवडणूक बविआने जिंकली. परंतु त्या नंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीपैकी दोन भाजपा- शिवसेना युतीने तर २०१८ ची अत्यंत अटीतटीची झालेली पोटनिवडणूक भाजपाने सेनेच्या उमेदवाराला हरवून स्वबळावर जिंकली तर २०१९ ची निवडणुकीमध्ये भाजपाकडून राजेंद्र गावित यांना आयात करून सेना-भाजपा युतीचे शिवसेनेचे गावित जिंकले.बोईसर विधानसभेकरिता इच्छुकांमध्ये प्रथमपासून अग्रक्र मावर असलेल्या शिवसेना पालघर उपजिल्हा प्रमुख व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी २००९ व २०१४ असे सलग दोन वेळा निवडून आलेले बविआ आघाडीचे आमदार व आता सेनेत प्रवेश केलेले विलास तरे यांच्यापेक्षाही जास्त प्रमाणात या मतदार संघात फिरून जनसंपर्क ठेवल्याचा दावा केला आहे.बालेकिल्ला सेनेचापालघर जिल्ह्यातील पालघर व डहाणू तालुक्याच्या किनारपट्टीसह पालघर जिल्ह्यातील उत्तर-मध्य भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तर पालघर जिल्ह्यातील उर्वरित भागातही शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. सध्या पालघर विधानसभा या एकमेव मतदारसंघात आमदार अमित घोडा व जिल्ह्यातील एकमेव खासदार राजेंंद्र गावित हे दोघेही शिवसेनेचे आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाpalgharपालघर