शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पालघर जिल्ह्यात शिवसेनेमध्ये बाहेरून आलेल्यांना चारही मतदारसंघांत उमेदवारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 05:54 IST

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी वसई, नालासोपारा, पालघर आणि डहाणू हे चार विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत.

- पंकज राऊतबोईसर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी वसई, नालासोपारा, पालघर आणि डहाणू हे चार विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. या चारही मतदार संघामध्ये शिवसेनेकडून ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली ते सर्व नव्याने शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेले आहेत.निवडणुकीत डावलले गेल्याने नाराज होऊन जिल्ह्यातील ज्येष्ठ सेना पदाधिकारी प्रकाश निकम यांनी आपला राजीनामा पक्ष प्रमुखांकडे आज पाठविला आहे. सेना नेत्यांनी याकडे गंभीरतेने न पाहिल्यास नाराजीमध्ये वाढ होऊन निवडणुकीतील गणिते बदलून त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.काँग्रेसमधून सेनेत दाखल झालेले विजय पाटील यांना वसईतून, पोलीस दलातून राजीनामा देऊन शिवबंधन बांधलेले प्रदीप शर्मा, दोन टर्म बोईसरची आमदारकी घेऊन बविआघाडीतून सेनेत प्रवेश घेतलेले विलास तरे तर २०१८ च्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये स्व.खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना भाजपाने पोटनिवडणुकीमध्ये तिकीट नाकारल्यानंतर राजकीय खेळी व भाजपाला खिंडीत पकडण्याच्या उद्देशाने शिवसेनेत घेतल्याने वनगा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वांना उमेदवारी देऊन शिवसेनेचे इच्छुक व निष्ठावंताच्या जखमेवरच मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे.२००९ पूर्वी उत्तर मुंबई लोकसभेचे क्षेत्र पालघरपर्यंत होते तेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर व हितेंद्र ठाकूरांच्या पाठिंब्यामुळे सिनेअभिनेते गोविंदा निवडून येऊन त्यांनी खासदारकीची (अयशस्वी ) पहिली व एकमेव टर्म सोडली तर भाजपा-सेना युतीचे राम नाईकांचे अधिराज्य होते. त्यानंतर २००९ मध्ये उत्तर मुंबई व डहाणू मतदार संघाची पुनर्रचना करून वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर, विक्र मगड व डहाणू या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदार संघ नव्याने निर्माण करण्यात आला.२००९ मधील पालघर लोकसभेची पहिली निवडणूक बविआने जिंकली. परंतु त्या नंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीपैकी दोन भाजपा- शिवसेना युतीने तर २०१८ ची अत्यंत अटीतटीची झालेली पोटनिवडणूक भाजपाने सेनेच्या उमेदवाराला हरवून स्वबळावर जिंकली तर २०१९ ची निवडणुकीमध्ये भाजपाकडून राजेंद्र गावित यांना आयात करून सेना-भाजपा युतीचे शिवसेनेचे गावित जिंकले.बोईसर विधानसभेकरिता इच्छुकांमध्ये प्रथमपासून अग्रक्र मावर असलेल्या शिवसेना पालघर उपजिल्हा प्रमुख व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी २००९ व २०१४ असे सलग दोन वेळा निवडून आलेले बविआ आघाडीचे आमदार व आता सेनेत प्रवेश केलेले विलास तरे यांच्यापेक्षाही जास्त प्रमाणात या मतदार संघात फिरून जनसंपर्क ठेवल्याचा दावा केला आहे.बालेकिल्ला सेनेचापालघर जिल्ह्यातील पालघर व डहाणू तालुक्याच्या किनारपट्टीसह पालघर जिल्ह्यातील उत्तर-मध्य भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तर पालघर जिल्ह्यातील उर्वरित भागातही शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. सध्या पालघर विधानसभा या एकमेव मतदारसंघात आमदार अमित घोडा व जिल्ह्यातील एकमेव खासदार राजेंंद्र गावित हे दोघेही शिवसेनेचे आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाpalgharपालघर