शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
3
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
4
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
5
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
6
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
7
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
8
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
9
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
10
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
11
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
12
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
13
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
15
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
16
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
17
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
18
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
19
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
20
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं

‘ऑपरेशन मुस्कान’चे पोलिसांपुढे आव्हान, शोध, पुनर्वसनासाठी १४ दिवसांचा कालावधी बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 00:27 IST

ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

- हितेन नाईकपालघर : अपहरण आणि हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याच्यासमोर आता अवघ्या १४ दिवसांचा कालावधी हाती उरला आहे.हरविलेल्या तसेच अपहरण केलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ मार्चदरम्यान आॅपरेशन मुस्कान ८ ही विशेष मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे. सदर आॅपरेशन मुस्कान विशेष मोहीम पालघर जिल्ह्यात देखील सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील एकूण २३ पोलीस ठाण्यांमध्ये एक अधिकारी व ३ कर्मचारी यांचा समावेश असलेले प्रत्येकी एक पथक नेमण्यात आले आहे. या मोहिमेची योग्यरीत्या अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा पोलीस उपअधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २ मार्च २०२० रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठक घेण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्यात समन्वय करून पालघर जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व रेकॉर्ड व्यतिरिक्त बेवारस बालकांचा जातीने लक्ष पुरवीत त्यांचा शोध घेऊन ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक विक्रांंत देशमुख यांनी सांगितले. परंतु सध्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत मुलांचे अपहरण होत असताना त्यांचा शोध घेण्याची व त्यांच्या पालकांपर्यंत त्यांना सुखरूप पोचवण्याचे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने देशात व सर्वच राज्यात अपहरण व हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्या अंतर्गत हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ८ ही मोहीम पालघर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहे. मुलांचे आश्रमगृह अशासकीय संस्था रेल्वे स्थानक बस स्थानक रस्त्यात भीक मागणारी अथवा वस्तू विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी कामावर असलेली मुले त्यांचे फोटो घेऊन त्यांचे अद्ययावत माहिती तयार करण्यात येणार असून सदर कालावधीत सापडलेल्या मुलांची माहिती घेऊन त्यांचे आई-वडील किंवा त्यांचे कायदेशीर पालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर मोहिमेअंतर्गत हरवलेला जास्तीत जास्त बालकांचा शोध घेण्यात येऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. अपहरण केलेल्या हरवलेल्या व बेवारस मुलाचा शोध लागल्यावर त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ज्या मुलाचे पालक मुलगा आपला असल्याचा दावा करतील त्यांना आपले पालकत्वाचे पुरावे द्यावे लागणार आहेत.देशात प्रतिवर्षी एक लाख बालके हरवल्याची, बेवारस झाल्याची नोंददेशात साधारण प्रति वर्षी १ लाख बालक हरवल्याची व बेवारसाची नोंद होत असते. यातील ११ हजार मुले पुन्हा घरी परतली नसल्याचे एक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील बहुतांश मुले ही तस्करी, बालमजुरी व वेशावृत्ती याकरिता संघटित गुन्हेगारांमार्फत गायब केली जात असल्याचे तपासाअंती निदर्शनास आले आहे. मुस्कान ८ ही मोहीम स्थानीय गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्याशी समन्वय करून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व विनारेकॉर्डवरील बालकांचा जास्तीत जास्त शोध घेऊन ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्र ांत देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार