शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

‘ऑपरेशन मुस्कान’चे पोलिसांपुढे आव्हान, शोध, पुनर्वसनासाठी १४ दिवसांचा कालावधी बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 00:27 IST

ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

- हितेन नाईकपालघर : अपहरण आणि हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याच्यासमोर आता अवघ्या १४ दिवसांचा कालावधी हाती उरला आहे.हरविलेल्या तसेच अपहरण केलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ मार्चदरम्यान आॅपरेशन मुस्कान ८ ही विशेष मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे. सदर आॅपरेशन मुस्कान विशेष मोहीम पालघर जिल्ह्यात देखील सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील एकूण २३ पोलीस ठाण्यांमध्ये एक अधिकारी व ३ कर्मचारी यांचा समावेश असलेले प्रत्येकी एक पथक नेमण्यात आले आहे. या मोहिमेची योग्यरीत्या अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा पोलीस उपअधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २ मार्च २०२० रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठक घेण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्यात समन्वय करून पालघर जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व रेकॉर्ड व्यतिरिक्त बेवारस बालकांचा जातीने लक्ष पुरवीत त्यांचा शोध घेऊन ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक विक्रांंत देशमुख यांनी सांगितले. परंतु सध्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत मुलांचे अपहरण होत असताना त्यांचा शोध घेण्याची व त्यांच्या पालकांपर्यंत त्यांना सुखरूप पोचवण्याचे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने देशात व सर्वच राज्यात अपहरण व हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्या अंतर्गत हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ८ ही मोहीम पालघर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहे. मुलांचे आश्रमगृह अशासकीय संस्था रेल्वे स्थानक बस स्थानक रस्त्यात भीक मागणारी अथवा वस्तू विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी कामावर असलेली मुले त्यांचे फोटो घेऊन त्यांचे अद्ययावत माहिती तयार करण्यात येणार असून सदर कालावधीत सापडलेल्या मुलांची माहिती घेऊन त्यांचे आई-वडील किंवा त्यांचे कायदेशीर पालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर मोहिमेअंतर्गत हरवलेला जास्तीत जास्त बालकांचा शोध घेण्यात येऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. अपहरण केलेल्या हरवलेल्या व बेवारस मुलाचा शोध लागल्यावर त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ज्या मुलाचे पालक मुलगा आपला असल्याचा दावा करतील त्यांना आपले पालकत्वाचे पुरावे द्यावे लागणार आहेत.देशात प्रतिवर्षी एक लाख बालके हरवल्याची, बेवारस झाल्याची नोंददेशात साधारण प्रति वर्षी १ लाख बालक हरवल्याची व बेवारसाची नोंद होत असते. यातील ११ हजार मुले पुन्हा घरी परतली नसल्याचे एक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील बहुतांश मुले ही तस्करी, बालमजुरी व वेशावृत्ती याकरिता संघटित गुन्हेगारांमार्फत गायब केली जात असल्याचे तपासाअंती निदर्शनास आले आहे. मुस्कान ८ ही मोहीम स्थानीय गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्याशी समन्वय करून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व विनारेकॉर्डवरील बालकांचा जास्तीत जास्त शोध घेऊन ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्र ांत देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार