शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑपरेशन मुस्कान’चे पोलिसांपुढे आव्हान, शोध, पुनर्वसनासाठी १४ दिवसांचा कालावधी बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 00:27 IST

ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

- हितेन नाईकपालघर : अपहरण आणि हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याच्यासमोर आता अवघ्या १४ दिवसांचा कालावधी हाती उरला आहे.हरविलेल्या तसेच अपहरण केलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ मार्चदरम्यान आॅपरेशन मुस्कान ८ ही विशेष मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे. सदर आॅपरेशन मुस्कान विशेष मोहीम पालघर जिल्ह्यात देखील सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील एकूण २३ पोलीस ठाण्यांमध्ये एक अधिकारी व ३ कर्मचारी यांचा समावेश असलेले प्रत्येकी एक पथक नेमण्यात आले आहे. या मोहिमेची योग्यरीत्या अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा पोलीस उपअधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २ मार्च २०२० रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठक घेण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्यात समन्वय करून पालघर जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व रेकॉर्ड व्यतिरिक्त बेवारस बालकांचा जातीने लक्ष पुरवीत त्यांचा शोध घेऊन ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक विक्रांंत देशमुख यांनी सांगितले. परंतु सध्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत मुलांचे अपहरण होत असताना त्यांचा शोध घेण्याची व त्यांच्या पालकांपर्यंत त्यांना सुखरूप पोचवण्याचे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने देशात व सर्वच राज्यात अपहरण व हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्या अंतर्गत हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ८ ही मोहीम पालघर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहे. मुलांचे आश्रमगृह अशासकीय संस्था रेल्वे स्थानक बस स्थानक रस्त्यात भीक मागणारी अथवा वस्तू विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी कामावर असलेली मुले त्यांचे फोटो घेऊन त्यांचे अद्ययावत माहिती तयार करण्यात येणार असून सदर कालावधीत सापडलेल्या मुलांची माहिती घेऊन त्यांचे आई-वडील किंवा त्यांचे कायदेशीर पालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर मोहिमेअंतर्गत हरवलेला जास्तीत जास्त बालकांचा शोध घेण्यात येऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. अपहरण केलेल्या हरवलेल्या व बेवारस मुलाचा शोध लागल्यावर त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ज्या मुलाचे पालक मुलगा आपला असल्याचा दावा करतील त्यांना आपले पालकत्वाचे पुरावे द्यावे लागणार आहेत.देशात प्रतिवर्षी एक लाख बालके हरवल्याची, बेवारस झाल्याची नोंददेशात साधारण प्रति वर्षी १ लाख बालक हरवल्याची व बेवारसाची नोंद होत असते. यातील ११ हजार मुले पुन्हा घरी परतली नसल्याचे एक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील बहुतांश मुले ही तस्करी, बालमजुरी व वेशावृत्ती याकरिता संघटित गुन्हेगारांमार्फत गायब केली जात असल्याचे तपासाअंती निदर्शनास आले आहे. मुस्कान ८ ही मोहीम स्थानीय गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्याशी समन्वय करून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व विनारेकॉर्डवरील बालकांचा जास्तीत जास्त शोध घेऊन ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्र ांत देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार