शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यात आॅनलाईन सातबारा ठरतोय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:29 IST

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही.

- आशिष राणेवसई - शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. परिणामी शेतकºयांना व गरजूंना वेळेवर कामे करणे अवघड होत आहेत. त्यामुळे वर्षोनुवर्षे सुरू असलेले हे आॅनलाईन सातबाराचे काम आता शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.दरम्यान अचूक संगणकीकृत सातबारा देण्यासाठी राज्यात भूमि अभिलेख विभागाकडून केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकार्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसीत केली आहे. त्यातच फोर-टी क्वाईन हे साफ्टवेअर बंद होऊन आता क्लाऊड सॉफ्टवेअर हे नव्याने सुरु करण्यात आले आहे,नेहमीच सरकार नवनविन प्रणाली राबवते, त्यात आता सद्यस्थितीत नवीन क्लाऊड सॉफ्टवेअरला तहसीलदार सहीत मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे ठसे नोंदणी करीता ओटीपी नंबर टाकून नोंद करावी लागते. मात्र कधी सर्व्हर डाऊन तर कधी लिंकच फेल होत असल्याने सामान्य जनतेला व शेतकºयांना वेळीच सातबारा मिळण्यास मोठी अडचण होत आहे. काहीवेळा सर्व्हर सुरु होतो मात्र त्यात गती नसल्याने कामे होत नाहीत. त्यात विजेच्या लपंडावाची भर पडते तर कधी संगणकाच्या नादुरूस्तीने खोळंबा होत असतो.सगळे दाखवतात एकमेकांकडे बोट, प्रचंड चुका, तहसीलदार लक्ष देत नाहीत ? गठठे पडूनआनलाईन सातबारात प्रचंड चुका असल्याने त्या दुरु स्तीसाठी पुन्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार वसई तालुका तहसीलदारांच्याकडे अर्ज करावा लागतो. या प्रक्रि येतही बराच वेळ जात आहे. तलाठी, तहसील कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत, तर कधी मंडळ अधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.त्यामुळे सामान्य वर्ग,आदिवासी शेतकºयांना मुलांच्या विविध दाखल्यांसाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक कर्ज अथवा इतर कामे अद्यावत करण्यासाठी या सातबाराची मोठी गरज भासत आहे. मात्र, सातबारा चुकीचा असल्याने व चुकांची दुरु स्ती करण्यात वर्षोनुवर्षे वेळ लागत असल्याने आॅनलाईन सातबारा सामान्य जनता,आदिवासी ,व शेतकºयांसाठी बºयापैकी तापदायक ठरत आहे.आॅनलाईन सातबारा चे संगणकीय कामकाज पूर्ण झाले असून केवळ आता सातबारा व फेरफार चुका आहेत,त्या दुरु स्ती चे काम कलम १५५ नुसार सुरू आहे,लवकर च हे काम पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे- किरण सुरवसे, वसई तहसीलदार, वसई तालुका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार