शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

वसई तालुक्यात आॅनलाईन सातबारा ठरतोय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:29 IST

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही.

- आशिष राणेवसई - शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. परिणामी शेतकºयांना व गरजूंना वेळेवर कामे करणे अवघड होत आहेत. त्यामुळे वर्षोनुवर्षे सुरू असलेले हे आॅनलाईन सातबाराचे काम आता शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.दरम्यान अचूक संगणकीकृत सातबारा देण्यासाठी राज्यात भूमि अभिलेख विभागाकडून केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकार्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसीत केली आहे. त्यातच फोर-टी क्वाईन हे साफ्टवेअर बंद होऊन आता क्लाऊड सॉफ्टवेअर हे नव्याने सुरु करण्यात आले आहे,नेहमीच सरकार नवनविन प्रणाली राबवते, त्यात आता सद्यस्थितीत नवीन क्लाऊड सॉफ्टवेअरला तहसीलदार सहीत मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे ठसे नोंदणी करीता ओटीपी नंबर टाकून नोंद करावी लागते. मात्र कधी सर्व्हर डाऊन तर कधी लिंकच फेल होत असल्याने सामान्य जनतेला व शेतकºयांना वेळीच सातबारा मिळण्यास मोठी अडचण होत आहे. काहीवेळा सर्व्हर सुरु होतो मात्र त्यात गती नसल्याने कामे होत नाहीत. त्यात विजेच्या लपंडावाची भर पडते तर कधी संगणकाच्या नादुरूस्तीने खोळंबा होत असतो.सगळे दाखवतात एकमेकांकडे बोट, प्रचंड चुका, तहसीलदार लक्ष देत नाहीत ? गठठे पडूनआनलाईन सातबारात प्रचंड चुका असल्याने त्या दुरु स्तीसाठी पुन्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार वसई तालुका तहसीलदारांच्याकडे अर्ज करावा लागतो. या प्रक्रि येतही बराच वेळ जात आहे. तलाठी, तहसील कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत, तर कधी मंडळ अधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.त्यामुळे सामान्य वर्ग,आदिवासी शेतकºयांना मुलांच्या विविध दाखल्यांसाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक कर्ज अथवा इतर कामे अद्यावत करण्यासाठी या सातबाराची मोठी गरज भासत आहे. मात्र, सातबारा चुकीचा असल्याने व चुकांची दुरु स्ती करण्यात वर्षोनुवर्षे वेळ लागत असल्याने आॅनलाईन सातबारा सामान्य जनता,आदिवासी ,व शेतकºयांसाठी बºयापैकी तापदायक ठरत आहे.आॅनलाईन सातबारा चे संगणकीय कामकाज पूर्ण झाले असून केवळ आता सातबारा व फेरफार चुका आहेत,त्या दुरु स्ती चे काम कलम १५५ नुसार सुरू आहे,लवकर च हे काम पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे- किरण सुरवसे, वसई तहसीलदार, वसई तालुका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार