शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

वसई तालुक्यात आॅनलाईन सातबारा ठरतोय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:29 IST

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही.

- आशिष राणेवसई - शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. परिणामी शेतकºयांना व गरजूंना वेळेवर कामे करणे अवघड होत आहेत. त्यामुळे वर्षोनुवर्षे सुरू असलेले हे आॅनलाईन सातबाराचे काम आता शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.दरम्यान अचूक संगणकीकृत सातबारा देण्यासाठी राज्यात भूमि अभिलेख विभागाकडून केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकार्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसीत केली आहे. त्यातच फोर-टी क्वाईन हे साफ्टवेअर बंद होऊन आता क्लाऊड सॉफ्टवेअर हे नव्याने सुरु करण्यात आले आहे,नेहमीच सरकार नवनविन प्रणाली राबवते, त्यात आता सद्यस्थितीत नवीन क्लाऊड सॉफ्टवेअरला तहसीलदार सहीत मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे ठसे नोंदणी करीता ओटीपी नंबर टाकून नोंद करावी लागते. मात्र कधी सर्व्हर डाऊन तर कधी लिंकच फेल होत असल्याने सामान्य जनतेला व शेतकºयांना वेळीच सातबारा मिळण्यास मोठी अडचण होत आहे. काहीवेळा सर्व्हर सुरु होतो मात्र त्यात गती नसल्याने कामे होत नाहीत. त्यात विजेच्या लपंडावाची भर पडते तर कधी संगणकाच्या नादुरूस्तीने खोळंबा होत असतो.सगळे दाखवतात एकमेकांकडे बोट, प्रचंड चुका, तहसीलदार लक्ष देत नाहीत ? गठठे पडूनआनलाईन सातबारात प्रचंड चुका असल्याने त्या दुरु स्तीसाठी पुन्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार वसई तालुका तहसीलदारांच्याकडे अर्ज करावा लागतो. या प्रक्रि येतही बराच वेळ जात आहे. तलाठी, तहसील कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत, तर कधी मंडळ अधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.त्यामुळे सामान्य वर्ग,आदिवासी शेतकºयांना मुलांच्या विविध दाखल्यांसाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक कर्ज अथवा इतर कामे अद्यावत करण्यासाठी या सातबाराची मोठी गरज भासत आहे. मात्र, सातबारा चुकीचा असल्याने व चुकांची दुरु स्ती करण्यात वर्षोनुवर्षे वेळ लागत असल्याने आॅनलाईन सातबारा सामान्य जनता,आदिवासी ,व शेतकºयांसाठी बºयापैकी तापदायक ठरत आहे.आॅनलाईन सातबारा चे संगणकीय कामकाज पूर्ण झाले असून केवळ आता सातबारा व फेरफार चुका आहेत,त्या दुरु स्ती चे काम कलम १५५ नुसार सुरू आहे,लवकर च हे काम पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे- किरण सुरवसे, वसई तहसीलदार, वसई तालुका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार