शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

गारगाई प्रकल्पामुळे एक हजार कुटुंबे विस्थापित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:59 IST

शेतकऱ्यांना नोटिसा : जमीन संपादनाची कार्यवाही सुरू; पुनर्वसनाचे आश्वासन

वाडा : मुंबई शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी वाडा तालुक्यात उभारण्यात येणाºया गारगाई प्रकल्पामुळे येथील जवळपास एक हजार कुटुंबे विस्थापित होणार आहेत. ही सर्व कुटुंबे आदिवासी समाजाची आहेत. या प्रकल्प क्षेत्रात खासगी जमीन संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून तशा प्रकारची नोटीस शेतकऱ्यांना देऊन जमीन संपादनाबाबत मुंबई महानगर पालिकेने विविध वर्तमानपत्रातून जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत.मुंबईला दररोज ४४० दशलक्ष ली. अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात हा गारगाई प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील विस्थापित होणाºयांमध्ये ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर या महसुली गावांसह चार ते पाच अन्य पाड्यातील कुटुंबांचा समावेश आहे. तर मोखाडा तालुक्यातील आमले गावातील सर्व कुटुंबे विस्थापित होणार आहेत.या प्रकल्पामुळे एकूण ११०० हेक्टर जमीन धरणाखाली येणार आहे. या जमिनीमधील ७०० हेक्टर जमीन ही तानसा अभयारण्याची असल्याने तानसा अभयारण्याला या धरणाचा मोठा फटका बसणार आहे. या धरणासाठी मोठ्या प्रमाणात वनजमीन संपादित होणार असल्याने त्याचा परिणाम धरण परिसरातील हजारो वृक्ष संपदेवरही होणार आहे. विस्थापित होणाºया सर्व कुटुंबियांचे पुनर्वसन वाडा तालुक्यातील हरोसाळे आणि देवळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्राजवळ असलेल्या वनजमिनीवर होणार आहे.ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर प्रकल्पनदीवर हा प्रकल्प होत आहे. ६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे हे धरण बांधले जाणार आहे. या गारगाई धरणाच्या जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून ते गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरविण्यात येणार आहे. यासाठी गारगाई ते मोडकसागर दरम्यानचे २.० किलोमीटर लांबीच्या बोगद्याचेही काम केले जाणार आहे.गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामध्ये सुमारे ४२४ हेक्टर खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित सर्व कुटुंबांचे पुनवर्सन, आवश्यक परवानग्या याची कार्यवाही मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.या प्रकल्पामुळे विस्थापित होणाºया आम्हा कुटुंबियांना शेतजमीनीचा योग्य मोबदला तसेच सर्व सोयी, सुविधा देवून पुनर्वसन केले पाहिजे.-गणपत बुधाजी कोरडे, पोलीस पाटील, ओगदा.पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुनर्वसानासाठी येथील बाधीत कुटुंबियांना ज्या सुविधा व मोबदला देण्याचे आश्वासन दिले आहे ते मिळणार असेल तर आमचा विस्थापित होण्याला विरोध नाही.- गणपत दोडे, माजी सरपंच, ओगदा ग्रामपंचायत