शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

गारगाई प्रकल्पामुळे एक हजार कुटुंबे विस्थापित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:59 IST

शेतकऱ्यांना नोटिसा : जमीन संपादनाची कार्यवाही सुरू; पुनर्वसनाचे आश्वासन

वाडा : मुंबई शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी वाडा तालुक्यात उभारण्यात येणाºया गारगाई प्रकल्पामुळे येथील जवळपास एक हजार कुटुंबे विस्थापित होणार आहेत. ही सर्व कुटुंबे आदिवासी समाजाची आहेत. या प्रकल्प क्षेत्रात खासगी जमीन संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून तशा प्रकारची नोटीस शेतकऱ्यांना देऊन जमीन संपादनाबाबत मुंबई महानगर पालिकेने विविध वर्तमानपत्रातून जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत.मुंबईला दररोज ४४० दशलक्ष ली. अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात हा गारगाई प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील विस्थापित होणाºयांमध्ये ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर या महसुली गावांसह चार ते पाच अन्य पाड्यातील कुटुंबांचा समावेश आहे. तर मोखाडा तालुक्यातील आमले गावातील सर्व कुटुंबे विस्थापित होणार आहेत.या प्रकल्पामुळे एकूण ११०० हेक्टर जमीन धरणाखाली येणार आहे. या जमिनीमधील ७०० हेक्टर जमीन ही तानसा अभयारण्याची असल्याने तानसा अभयारण्याला या धरणाचा मोठा फटका बसणार आहे. या धरणासाठी मोठ्या प्रमाणात वनजमीन संपादित होणार असल्याने त्याचा परिणाम धरण परिसरातील हजारो वृक्ष संपदेवरही होणार आहे. विस्थापित होणाºया सर्व कुटुंबियांचे पुनर्वसन वाडा तालुक्यातील हरोसाळे आणि देवळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्राजवळ असलेल्या वनजमिनीवर होणार आहे.ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर प्रकल्पनदीवर हा प्रकल्प होत आहे. ६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे हे धरण बांधले जाणार आहे. या गारगाई धरणाच्या जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून ते गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरविण्यात येणार आहे. यासाठी गारगाई ते मोडकसागर दरम्यानचे २.० किलोमीटर लांबीच्या बोगद्याचेही काम केले जाणार आहे.गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामध्ये सुमारे ४२४ हेक्टर खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित सर्व कुटुंबांचे पुनवर्सन, आवश्यक परवानग्या याची कार्यवाही मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.या प्रकल्पामुळे विस्थापित होणाºया आम्हा कुटुंबियांना शेतजमीनीचा योग्य मोबदला तसेच सर्व सोयी, सुविधा देवून पुनर्वसन केले पाहिजे.-गणपत बुधाजी कोरडे, पोलीस पाटील, ओगदा.पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुनर्वसानासाठी येथील बाधीत कुटुंबियांना ज्या सुविधा व मोबदला देण्याचे आश्वासन दिले आहे ते मिळणार असेल तर आमचा विस्थापित होण्याला विरोध नाही.- गणपत दोडे, माजी सरपंच, ओगदा ग्रामपंचायत