शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

आता माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी कृषी पदवीधरही पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 23:41 IST

शासन निर्णय प्रसिद्ध : शालेय शिक्षणात कृषीविषय लागू करा

वाडा : राज्यात माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये सुधारणा करुन काही नव्या पदव्यांचा समावेश करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या बाबत १२ जून रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात कृषी पदवीचा समावेश केल्याने राज्यातील हजारो कृषी पदवीधारकांना दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयाचे कृषी पदवी व कृषी विद्यार्थी संघटनानी स्वागत केले आहे.

यासंबंधीचा शासन आदेश शालेय शिक्षण विभागातर्फे नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदव्यांसोबतच सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र आणि कृषीशास्त्र या पदव्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच इयत्ता नववी व दहावी शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदव्यांसोबतच सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायन शास्त्र आणि कृषीशास्त्र या पदव्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय इतरही काही विषयातील पदव्यांचा समावेश नव्या निर्णयात करण्यात आला आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी आता कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. कृषी पदवीधारकांचा माध्यमिक शाळांच्या नोकरीतील प्रवेशाचामार्ग मोकळा होणार आहे. या शासन निर्णयाचा विविध कृषी पदवी व कृषी विद्यार्थी संघटनानी स्वागत केले आहे.मुख्यमंत्र्यांना कृषी शिक्षक नेमण्याची मागणीच्अजूनही ग्रामीण भागातील शेतकरी नवनवीन आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने शेती उत्पादनात मोठे नुकसान होत आहे. शेती क्षेत्रातील व्यवसायात तरुणांची संख्या कमी होऊ लागली आहे. तरु णांना शाळेय शिक्षणापासून शेतीचे शिक्षण दिल्यास शेती क्षेत्राला अच्छे दिन येतील व मोठा रोजगार उपलब्ध होईल.च्याबाबत तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरके यानी शालेय शिक्षणात कृषी शिक्षणाचा समावेश करावा अशी शिफारस केली होती.त्यामुळे शासनाने शालेय अभ्यासक्र मात कृषी विषय शिक्षणाचा समावेश करु न कृषी पदविका, पदवीचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकाचा नेमणुका कराव्यात, अशी मागणी कोकण विभाग कृषि पदविकाधारक संघर्ष समितीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.१२ जूनच्या नव्या शासन निर्णयामुळे माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी आता कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. कृषी पदवीधारकांचा माध्यमिक शाळांच्या नोकरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. या निर्णयाने राज्यातील हजारो कृषी पदवीधारकांना दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयचा आम्ही स्वागत करतो, परंतु आमची मूळ मागणी आहे ती पहिली ते १२ वी शालेय शिक्षणात (अभ्यासक्र मात) कृषी विषयाचा समावेश करुन कृषी शिक्षक नेमावेत याबाबत आमच्या संघटनेमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व कृषी मंत्री याना निवेदन दिले आहे. या मागणीबाबत शासनाने गांभिर्यपूर्वक विचार करावा.- अमोल सांबरे, उपाध्यक्ष,कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समिती 

टॅग्स :Teacherशिक्षकagricultureशेती