शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

आता माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी कृषी पदवीधरही पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 23:41 IST

शासन निर्णय प्रसिद्ध : शालेय शिक्षणात कृषीविषय लागू करा

वाडा : राज्यात माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये सुधारणा करुन काही नव्या पदव्यांचा समावेश करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या बाबत १२ जून रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात कृषी पदवीचा समावेश केल्याने राज्यातील हजारो कृषी पदवीधारकांना दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयाचे कृषी पदवी व कृषी विद्यार्थी संघटनानी स्वागत केले आहे.

यासंबंधीचा शासन आदेश शालेय शिक्षण विभागातर्फे नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदव्यांसोबतच सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र आणि कृषीशास्त्र या पदव्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच इयत्ता नववी व दहावी शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदव्यांसोबतच सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायन शास्त्र आणि कृषीशास्त्र या पदव्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय इतरही काही विषयातील पदव्यांचा समावेश नव्या निर्णयात करण्यात आला आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी आता कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. कृषी पदवीधारकांचा माध्यमिक शाळांच्या नोकरीतील प्रवेशाचामार्ग मोकळा होणार आहे. या शासन निर्णयाचा विविध कृषी पदवी व कृषी विद्यार्थी संघटनानी स्वागत केले आहे.मुख्यमंत्र्यांना कृषी शिक्षक नेमण्याची मागणीच्अजूनही ग्रामीण भागातील शेतकरी नवनवीन आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने शेती उत्पादनात मोठे नुकसान होत आहे. शेती क्षेत्रातील व्यवसायात तरुणांची संख्या कमी होऊ लागली आहे. तरु णांना शाळेय शिक्षणापासून शेतीचे शिक्षण दिल्यास शेती क्षेत्राला अच्छे दिन येतील व मोठा रोजगार उपलब्ध होईल.च्याबाबत तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरके यानी शालेय शिक्षणात कृषी शिक्षणाचा समावेश करावा अशी शिफारस केली होती.त्यामुळे शासनाने शालेय अभ्यासक्र मात कृषी विषय शिक्षणाचा समावेश करु न कृषी पदविका, पदवीचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकाचा नेमणुका कराव्यात, अशी मागणी कोकण विभाग कृषि पदविकाधारक संघर्ष समितीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.१२ जूनच्या नव्या शासन निर्णयामुळे माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी आता कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. कृषी पदवीधारकांचा माध्यमिक शाळांच्या नोकरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. या निर्णयाने राज्यातील हजारो कृषी पदवीधारकांना दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयचा आम्ही स्वागत करतो, परंतु आमची मूळ मागणी आहे ती पहिली ते १२ वी शालेय शिक्षणात (अभ्यासक्र मात) कृषी विषयाचा समावेश करुन कृषी शिक्षक नेमावेत याबाबत आमच्या संघटनेमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व कृषी मंत्री याना निवेदन दिले आहे. या मागणीबाबत शासनाने गांभिर्यपूर्वक विचार करावा.- अमोल सांबरे, उपाध्यक्ष,कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समिती 

टॅग्स :Teacherशिक्षकagricultureशेती