शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 00:29 IST

वसई विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने नियुक्त असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील १२२ इंजिनियर्सना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही.

नालासोपारा - वसई विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने नियुक्त असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील १२२ इंजिनियर्सना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना पगार मात्र इंजिनियरांना पगार नसल्याने अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी अशी स्थिती आहे.वसई विरार महानगरपालिकेत कल्याण येथील विशाल एक्स्पर्टाईज याला बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत विभागात इंजिनियर पुरवण्याचा ठेका दिलेला असून विविध विभागात एकूण त्याने १२२ इंजिनियर पुरवले असून सध्या ते कार्यरत आहेत. याच ठेकेदाराला घरपट्टी विभागातील वसुली करण्याचाही ठेका दिल्याचेही कळते. जे इंजिनियर महानगरपालिकेला पुरवले आहेत ते स्थानिक रहिवासी असून त्यात काही जणांनी बीई केलेले आहे तर काहींनी डिप्लोमा केलेला आहे. दोघांनाही दुजाभाव न देता समान पगार दिला जात आहे. या इंजिनियरांचा २५ ते २५ तारखेप्रमाणे महिना पकडला जातो आणि ५ ते १० तारखेपर्यंत त्यांचा पगार होणे आवश्यक असते. पण मे आणि जून महिन्यांचा अद्याप पगार झालेला नाही तर एप्रिल महिन्याचा पगार १० दिवसांपूर्वी झाल्याचेही कळते. पगारासाठी इंजिनियरांना दर महिन्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होते. कामे तर जास्त प्रमाणात करून घेतली जातात, दम दिला जातो, चुकी झाली तर पगार कापला जाईल, अशी धमकी सुद्धा दिली जाते. मग पगार महानगरपालिका वेळेवर का करत नाही, असा सवाल काही इंजिनियरांनी उपस्थित केला आहे. महानगरपालिकेच्या अधिकारी, इंजिनियर व कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत सातवा वेतन आयोगसुद्धा लागू झालेला नसल्याचेही सूत्रांकडून कळते.कंत्राटदार विशाल एक्स्पर्टाइज यांची बिलेच महानगरपालिका वेळेवर पास करत नसल्याने आमचे पगार मिळत नसल्याची खंत काही इंजिनियरांनी व्यक्त केली आहे. तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी आस्थापना विभागाला आदेश दिला होता की, प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत पगार झालाच पाहिजे आणि तसा दर महिन्याला पगार होत होता. पण आता नवीन आलेले आयुक्त बळीराम पवार यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच पगार वेळेवर होत नसल्याचे इंजिनियर्संनी लोकमतला सांगितले आहे. महानगरपालिकेत शहर अभियंता माधव जवादे, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड आणि सहाय्यक अभियंता एकनाथ ठाकरे, आर.के.पाटील, सुरेंद्र ठाकरे, प्रदीप पाचंगे व प्रकाश साटम या सर्व अधिकाºयांचे पगार वेळेवर होत असून इंजिनियर्सचे पगार रखडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका उदयाला आली तेव्हापासून किंवा त्याआधी नगरपालिका होती त्यावेळेचे अनेक इंजिनियर सध्या महानगरपालिकेत कामावर आहेत पण त्यांना अद्यापपर्यंत सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घेतलेले नाही.किती इंजिनियर असणे आवश्यक?राज्य शासनाच्या आदेशानव्ये आकृती बंधानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अंदाजे १६७ इंजिनियर असणे गरजेचे आहे. पण सध्या १२२ इंजिनियरांकडून महानगरपालिका विविध विभागातील कामे करवून घेते. महानगरपालिकेत इंजिनियरांची कमतरता असतानांही हे इंजिनियरांकडून भरमसाठी कामे करवून घेतली जातात पण पगार मात्र वेळेवर होतच नाही.पगाराची प्रक्रि या....आस्थापना विभाग इंजिनियरांचे काम केलेले दिवस मोजून ठेकेदाराला सांगतात व त्याप्रमाणे ठेकेदार बिले मनपाच्या आस्थापना विभागात जमा करतात. नंतर उपायुक्तांकडे बिले गेल्यावर ते तपासून अकाऊंट विभागाकडे पाठवल्यानंतर आॅडिट विभागात बिले तपासून त्याच्या चेकवर सही करण्यासाठी ती अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवली जातात. नंतर पगाराची रक्कम प्रत्येक इंजिनियरच्या खात्यावर आरटीजीएसने जमा होते.करोडो रु पयांचा कर जमा होतो मग...वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामधून घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम व नगररचना विभागातून महिन्याकाठी करोडो रुपयांचा कर जमा केला जातो, अनधिकृत मोबाईल टॉवरकडूनही करोडो रु पयांचा कर जमा केला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात कराच्या रु पात पैसा महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतो. मग इंजिनियरांचा पगार वेळेवर का केला जात नाही?कसे काय पगार झाले नाही? मी बघतो आणि कळवतो. पगार होणे गरजेचे होते त्याबद्दल मला कोणीही काहीही बोलले नाही. - बळीराम पवार, आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार