शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 00:29 IST

वसई विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने नियुक्त असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील १२२ इंजिनियर्सना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही.

नालासोपारा - वसई विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने नियुक्त असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील १२२ इंजिनियर्सना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना पगार मात्र इंजिनियरांना पगार नसल्याने अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी अशी स्थिती आहे.वसई विरार महानगरपालिकेत कल्याण येथील विशाल एक्स्पर्टाईज याला बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत विभागात इंजिनियर पुरवण्याचा ठेका दिलेला असून विविध विभागात एकूण त्याने १२२ इंजिनियर पुरवले असून सध्या ते कार्यरत आहेत. याच ठेकेदाराला घरपट्टी विभागातील वसुली करण्याचाही ठेका दिल्याचेही कळते. जे इंजिनियर महानगरपालिकेला पुरवले आहेत ते स्थानिक रहिवासी असून त्यात काही जणांनी बीई केलेले आहे तर काहींनी डिप्लोमा केलेला आहे. दोघांनाही दुजाभाव न देता समान पगार दिला जात आहे. या इंजिनियरांचा २५ ते २५ तारखेप्रमाणे महिना पकडला जातो आणि ५ ते १० तारखेपर्यंत त्यांचा पगार होणे आवश्यक असते. पण मे आणि जून महिन्यांचा अद्याप पगार झालेला नाही तर एप्रिल महिन्याचा पगार १० दिवसांपूर्वी झाल्याचेही कळते. पगारासाठी इंजिनियरांना दर महिन्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होते. कामे तर जास्त प्रमाणात करून घेतली जातात, दम दिला जातो, चुकी झाली तर पगार कापला जाईल, अशी धमकी सुद्धा दिली जाते. मग पगार महानगरपालिका वेळेवर का करत नाही, असा सवाल काही इंजिनियरांनी उपस्थित केला आहे. महानगरपालिकेच्या अधिकारी, इंजिनियर व कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत सातवा वेतन आयोगसुद्धा लागू झालेला नसल्याचेही सूत्रांकडून कळते.कंत्राटदार विशाल एक्स्पर्टाइज यांची बिलेच महानगरपालिका वेळेवर पास करत नसल्याने आमचे पगार मिळत नसल्याची खंत काही इंजिनियरांनी व्यक्त केली आहे. तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी आस्थापना विभागाला आदेश दिला होता की, प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत पगार झालाच पाहिजे आणि तसा दर महिन्याला पगार होत होता. पण आता नवीन आलेले आयुक्त बळीराम पवार यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच पगार वेळेवर होत नसल्याचे इंजिनियर्संनी लोकमतला सांगितले आहे. महानगरपालिकेत शहर अभियंता माधव जवादे, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड आणि सहाय्यक अभियंता एकनाथ ठाकरे, आर.के.पाटील, सुरेंद्र ठाकरे, प्रदीप पाचंगे व प्रकाश साटम या सर्व अधिकाºयांचे पगार वेळेवर होत असून इंजिनियर्सचे पगार रखडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका उदयाला आली तेव्हापासून किंवा त्याआधी नगरपालिका होती त्यावेळेचे अनेक इंजिनियर सध्या महानगरपालिकेत कामावर आहेत पण त्यांना अद्यापपर्यंत सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घेतलेले नाही.किती इंजिनियर असणे आवश्यक?राज्य शासनाच्या आदेशानव्ये आकृती बंधानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अंदाजे १६७ इंजिनियर असणे गरजेचे आहे. पण सध्या १२२ इंजिनियरांकडून महानगरपालिका विविध विभागातील कामे करवून घेते. महानगरपालिकेत इंजिनियरांची कमतरता असतानांही हे इंजिनियरांकडून भरमसाठी कामे करवून घेतली जातात पण पगार मात्र वेळेवर होतच नाही.पगाराची प्रक्रि या....आस्थापना विभाग इंजिनियरांचे काम केलेले दिवस मोजून ठेकेदाराला सांगतात व त्याप्रमाणे ठेकेदार बिले मनपाच्या आस्थापना विभागात जमा करतात. नंतर उपायुक्तांकडे बिले गेल्यावर ते तपासून अकाऊंट विभागाकडे पाठवल्यानंतर आॅडिट विभागात बिले तपासून त्याच्या चेकवर सही करण्यासाठी ती अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवली जातात. नंतर पगाराची रक्कम प्रत्येक इंजिनियरच्या खात्यावर आरटीजीएसने जमा होते.करोडो रु पयांचा कर जमा होतो मग...वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामधून घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम व नगररचना विभागातून महिन्याकाठी करोडो रुपयांचा कर जमा केला जातो, अनधिकृत मोबाईल टॉवरकडूनही करोडो रु पयांचा कर जमा केला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात कराच्या रु पात पैसा महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतो. मग इंजिनियरांचा पगार वेळेवर का केला जात नाही?कसे काय पगार झाले नाही? मी बघतो आणि कळवतो. पगार होणे गरजेचे होते त्याबद्दल मला कोणीही काहीही बोलले नाही. - बळीराम पवार, आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार