शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

रिक्षातून अतिरिक्त प्रवासी वाहतूक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:56 IST

पालघर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची माहिती; रस्त्यावरील पार्किंगवरही कारवाई होणार

पालघर : शहरातील विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेला ताळ्यावर आणण्यासाठी या पुढे तीन आणि सहा आसनी रिक्षांमधून अतिरिक्त प्रवासी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सात अधिकृत रिक्षा स्टॅण्डवर केवळ पाच रिक्षा ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी बैठकीत दिली.जिल्हा निर्मितीनंतर पाच वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पालघर शहरातील बेशिस्त बनत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे शहराला दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. जिल्हा निर्मितीनंतर तरी या समस्या कमी होतील, अशी आशा होती. मात्र, अतिक्रमण हटाव, रस्ते रुंदीकरण, सिग्नल व्यवस्था, वाहतूक पोलिसांचे नियंत्रण आदी वाहतूक नियंत्रणासाठी अत्यावश्यक बाबींकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अतिक्रमणाने रौद्ररूप धारण केले. यावर उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक, राज्य परिवहन (एस.टी.) विभाग, विद्युत वितरण, बांधकाम विभाग, रिक्षा-टेम्पो संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.शहरातील वाहतूक कोंडीला आळा घालण्याच्या दृष्टीने उपाय योजना म्हणून अधिकारी नाईक यांनी वाहतूक आराखड्याबाबत बनविलेला नकाशा बैठकीत सादर केला. यात एकेरी वाहतूक, अवजड वाहनांना बंदी, मच्छीमार्केटचे स्थलांतर, गाड्या पार्र्किंग व्यवस्था आदीबाबत उपस्थितांशी चर्चा केली. रिक्षाधारकाची संख्या १५०० पर्यंत पोहोचल्याने या बेछूट तर काही विनापरवाना वाढलेल्या रिक्षाधारकांना आवरण्याची तसदी कुठल्याही विभागाकडून घेतली जात नसल्याने शहरात फक्त सात रिक्षा स्टॅण्डवर पाच रिक्षा उभ्या ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे घोषित केले. या निर्णयावर काही रिक्षाधारकांच्या काही संघटनांनी आक्षेप घेतला. त्यावर आता तीन व सहा आसनी रिक्षांना दिलेल्या परवानगीपेक्षा अतिरिक्त प्रवासी बसवता येणार नाही, असे सांगून त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याची घोषणा केली. मात्र शहरातील कोंडीला जास्त प्रमाणात कारणीभूत असलेल्या रिक्षाधारकांकडून पुरविल्या जाणाºया आर्थिक रसदीमुळे हा कारवाईचा बडगा किती काळ टिकून राहतो, हे दिसणार आहे. रस्त्यारस्त्यावर खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, फळ-भाजी विक्रेत्यांच्या गाड्या, दुचाकी - चार चाकी गाड्यांच्या रस्त्यावरील पार्र्किं ग यामुळेही शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याने यांच्या विरोधातील कारवाई किती काळ टिकून राहते यावर वाहतूक कोंडीच्या समस्यांचे फलित ठरणार आहे. यावेळी नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत उपस्थित होते.पालघरमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या मच्छी विक्र ेत्या व भाजीविक्रेत्यासाठी पालघर पूर्व भागात व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे मनोर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असून त्यामुळे रस्ता मोकळा होणार असून पालघरवासियांनी आम्हाला सहकार्य करावे. - सुभाष पाटील,बांधकाम सभापती