शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्हा विकासासाठी कठोर अंमलबजावणीची गरज

By admin | Updated: October 19, 2015 00:57 IST

विरार-बोरिवलीदरम्यान रेल्वेचे चौपदरीकरण, वसई-विरार उपप्रदेशामध्ये महानगरपालिकेचे आगमन, डहाणू-चर्चगेटदरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा व त्यानंतर पालघर जिल्ह्याची निर्मिती

दीपक मोहिते, वसईविरार-बोरिवलीदरम्यान रेल्वेचे चौपदरीकरण, वसई-विरार उपप्रदेशामध्ये महानगरपालिकेचे आगमन, डहाणू-चर्चगेटदरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा व त्यानंतर पालघर जिल्ह्याची निर्मिती, असे एकामागोमाग प्रकल्प मार्गी लागले अन् नागरीकरणही वाढले. जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाखांवर पोहोचली आहे. भविष्यात अनेक प्रश्न उभे ठाकणार आहेत. रेल्वे, महानगरपालिका, महसूल, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण व अन्य शासकीय विभागांनी एकत्र येऊन विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. पाणी, वाहतूक, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या विकासकामांवर संयुक्तरीत्या कार्यवाही न झाल्यास भविष्यात या भागात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. रेल्वेतर्फे विरार-डहाणूदरम्यान चौपदरीकरण करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत. हे काम मार्गी लागल्यास पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू परिसरात लोकसंख्येला वेग येण्याची शक्यता आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांमुळे बोईसर शहराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे शहर सफाई, पाणी व अन्य विकासकामांचा बोजवारा उडाला. डेंग्यू, स्वाइन फ्लू इ. आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. मुंबईच्या धर्तीवर जिल्ह्यात एकही सरकारी रुग्णालय नाही. उपचाराकरिता नागरिकांना भगवती, जे.जे., केईएम रुग्णालयांत धाव घ्यावी लागते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी भविष्यात हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. जिल्हानिर्मिती होऊनही परिस्थितीमध्ये बदल होऊ शकला नाही. जिल्हा विकासाबाबत पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांची मानसिकता नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरात भरीव विकासकामे झालेली नाहीत. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठका या केवळ दिखाऊ असतात. जिल्हा विकासाबाबत अधिकारीवर्ग वरिष्ठांची केवळ दिशाभूल करण्याचे काम करत असतो. वाढत्या लोकसंख्येच्या या जिल्ह्याचे कामकाज रुळांवर आणण्याकरिता वास्तविक जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. रेल्वेचे जाळे पसरत चालले आहे. ज्या भागात रेल्वे जाते, त्या परिसरात लोकसंख्यावाढीला वेग येत असतो, असा अनुभव आहे. विरार-डहाणूदरम्यान रेल्वेचे चौपदरीकरण झाले तर भविष्यात लोकसंख्येचा स्फोट होऊ शकतो. परंतु, अशा गंभीर प्रश्नी प्रशासन व मंत्रीमहोदय सजग नाहीत. पाण्याअभावी एकेकाळी वसईतील उपप्रदेश होरपळून निघाला. त्याचीच पुनरावृत्ती पालघर-बोईसर भागात होता कामा नये. कालांतराने लोकसंख्या अधिक वाढली की, येथील नागरिकांचे काय हाल होणार आहेत, हे केवळ त्या ईश्वरालाच माहीत. पाण्याचे अतिरिक्त स्रोत निर्माण करणे, हे फार मोठे आव्हान मनपा, जिल्हा प्रशासन, पंचायत समित्यांसमोर आहे. ग्रामीण भागात विहिरी, कूपनलिकांचा तरी आधार आहे. परंतु, शहरी भागात अतिरिक्त स्रोत निर्माण होणे, ही काळाची गरज आहे. वास्तविक, जिल्हा नियोजन बैठकीमध्ये या संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पालकमंत्र्यांना जाब विचारणे गरजेचे आहे. केवळ विकास आराखडा तयार करणे, आर्थिक तरतूद केली की, आपले काम संपले, अशी मानसिकता नसली पाहिजे. जे ठरवले, जे निर्णय घेतले, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे की नाही, याचा साप्ताहिक आढावा पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायला हवा.