शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

उपप्रदेशातील कृषी क्षेत्र वाचविणे गरजेचे

By admin | Updated: June 8, 2015 04:27 IST

उपप्रदेशामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दीपक मोहिते, वसईउपप्रदेशामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उपप्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे १२ ते १५ जूनदरम्यान पावसाला सुरूवात होते. हा अनुभव लक्षात घेऊन शेतकरी शेतीच्या कामाला सुरूवात करतात. परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाचे चक्र बदलले आहे. जूनमध्ये हजेरी लावणारा पाऊस मध्येच गायब होतो व तो पुन्हा जुलैच्या मध्यास येतो. त्यामुळे पेरलेले बियाणे व खताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशीच स्थिती मागील काही वर्षांत सुरु असल्याने सध्या शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सध्या शेतीची कामे धिम्या गतीने सुरु आहे.वसई-विरार उपद्रेशाच्या पूर्व भागातील ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भातशेतीची लागवड केली जाते. ही संपूर्ण शेती पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. शेती सिंचनासाठी पाण्याचे अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने पावसाळी पाण्यावर भातशेती आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या अवकृपेमुळे भातशेतीचे क्षेत्र सतत कमी होत आहे. काही गावात मात्र भातशेती टिकून आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर, दुसरीकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी धास्तावला आहे. पावसाळा तोंडावर आला की, शेतकरी बी-बियाणे व खतासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे फेऱ्या मारतात. परंतु येथील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेकवेळा तो कंटाळून बाजारात अधिक पैसे मोजून बी-बियाणे व खते खरेदी करतात. यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी आलेले कृषीसाहित्य मात्र थेट काळ््या बाजारात जातात. खताचा साठा किती येतो व किती शेतकऱ्यांना त्याचे वाटप होते. याचा शोध घेतल्यास गैरप्रकार उघडकीस येईल. परंतु या साखळीत अधिकारीच गुंतले असल्याने चौकशी होणार तशी कशी. कृषीक्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणार असे सांगणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या खताचा साठा कुठे जातो,याचा सर्वप्रथम शोध घ्यावा त्यानंतर कृषीक्षेत्र वाढीच्या घोषणा कराव्यात. अशीच स्थिती राहिल्यास उपप्रदेशात जी काही भातशेती शिल्लक आहे ती देखील लयाला जाण्याची भीती आहे.