शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

उपप्रदेशातील कृषी क्षेत्र वाचविणे गरजेचे

By admin | Updated: June 8, 2015 04:27 IST

उपप्रदेशामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दीपक मोहिते, वसईउपप्रदेशामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उपप्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे १२ ते १५ जूनदरम्यान पावसाला सुरूवात होते. हा अनुभव लक्षात घेऊन शेतकरी शेतीच्या कामाला सुरूवात करतात. परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाचे चक्र बदलले आहे. जूनमध्ये हजेरी लावणारा पाऊस मध्येच गायब होतो व तो पुन्हा जुलैच्या मध्यास येतो. त्यामुळे पेरलेले बियाणे व खताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशीच स्थिती मागील काही वर्षांत सुरु असल्याने सध्या शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सध्या शेतीची कामे धिम्या गतीने सुरु आहे.वसई-विरार उपद्रेशाच्या पूर्व भागातील ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भातशेतीची लागवड केली जाते. ही संपूर्ण शेती पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. शेती सिंचनासाठी पाण्याचे अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने पावसाळी पाण्यावर भातशेती आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या अवकृपेमुळे भातशेतीचे क्षेत्र सतत कमी होत आहे. काही गावात मात्र भातशेती टिकून आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर, दुसरीकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी धास्तावला आहे. पावसाळा तोंडावर आला की, शेतकरी बी-बियाणे व खतासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे फेऱ्या मारतात. परंतु येथील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेकवेळा तो कंटाळून बाजारात अधिक पैसे मोजून बी-बियाणे व खते खरेदी करतात. यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी आलेले कृषीसाहित्य मात्र थेट काळ््या बाजारात जातात. खताचा साठा किती येतो व किती शेतकऱ्यांना त्याचे वाटप होते. याचा शोध घेतल्यास गैरप्रकार उघडकीस येईल. परंतु या साखळीत अधिकारीच गुंतले असल्याने चौकशी होणार तशी कशी. कृषीक्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणार असे सांगणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या खताचा साठा कुठे जातो,याचा सर्वप्रथम शोध घ्यावा त्यानंतर कृषीक्षेत्र वाढीच्या घोषणा कराव्यात. अशीच स्थिती राहिल्यास उपप्रदेशात जी काही भातशेती शिल्लक आहे ती देखील लयाला जाण्याची भीती आहे.