शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या ‘सेफ्टी ऑडिट’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2022 17:04 IST

मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पालघर जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आलेले आहे. 

जगदीश भोवड -वसई : उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या पालघर-चारोटी येथे रविवारी झालेल्या अपघाती निधनाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातांची भीषणता पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. गेल्या वर्षभरात कासा पोलीस स्टेशनअंतर्गत जवळपास १६८ अपघात झालेले आहेत. अन्य भागांतील आकडेवारीही यापेक्षा कमी नाही. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाची रचना, रस्त्यावरील वाहतुकीचा ताण व त्यात अपेक्षित असलेल्या आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन या रस्त्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पालघर जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आलेले आहे. 

वसई, नालासोपारा व विरार फाटा या प्रवेश मार्गांवर नेहमीच वाहतूक कोंडी व अपघात होत असतात. यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. तसेच महामार्गावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवून महामार्गाजवळ होणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर तातडीने मार्ग काढायला हवा.     - पंकज देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना, पालघर.

याकडे सरकार लक्ष देणार का?- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय  महामार्गावरील मेंढवण, सोमटा, तवा, चारोटी, महालक्ष्मी, धनिवरी, आंबोली या भागांमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. - महामार्गावर बंद  पडलेली व अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणेचा अभाव आहे. - पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद झालेले आहेत. पथदिवे बंद असतात. अपघात रोखण्यासाठीच्या कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नसल्याने महामार्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.

सहाऐवजी काही ठिकाणी चारच मार्गिकानिविदेत सहा मार्गिका अंतर्भूत असताना प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणी चार मार्गिका आहेत. आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स, कॅट आईज, धोक्याची सूचना देणारे फलक, वेगमर्यादा दर्शवणारे फलक, रिफ्लेक्टर तसेच ५०, १००, २०० मीटरवर झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या तसेच किलोमीटर दर्शक फलक अशा उपाययोजना करणे गरजेचे असताना आवश्यक उपाययोजना करण्याकडे प्राधिकरणाने पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे या महामार्गाची रचना, रस्त्यावरील वाहतुकीचा ताण व आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन या रस्त्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ करणे गरजेचे असल्याचे मत अनेकजण व्यक्त करीत आहेत.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMumbaiमुंबई