शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
4
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
5
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
6
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
7
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
8
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
9
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
10
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
11
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
12
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
13
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
14
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
15
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
16
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
17
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
18
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
19
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
20
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
Daily Top 2Weekly Top 5

कासटवाडी ते कशिवली घाट बनलाय अपघातांचा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 00:33 IST

- हुसेन मेमन जव्हार : शहरापासून अगदी ९ कि.मी. अंतरावर असलेला कासटवाडी ते कशिवली हा घाट सध्या अपघातांनाच रस्ता ...

- हुसेन मेमनजव्हार : शहरापासून अगदी ९ कि.मी. अंतरावर असलेला कासटवाडी ते कशिवली हा घाट सध्या अपघातांनाच रस्ता झाल्याचे दिसते आहे. गेल्या आणि यंदाच्या पावसाळ्यात येथे २६ हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू तर ७० हून अधिक वाहन चालक आणि दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. येथे सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे झाल्याचे समोर आले आहे. मात्र, याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.कासटवाडी रस्ता ते कशिवली घाट येथे पावसाळ्यात जास्त अपघात घडतात. कासटवाडी गावाजवळील ३ किमी.चा रस्ता हा निसरडा झाल्याने पावसाळ्यात चालकांनी ब्रेक मारले तरीही वाहनाचा टायर सरकून अपघात घडल्याचे येथील नागरिक आणि काही चालकांनी सांगितले.जव्हार - कासटवाडी - कशिवली हा मुंबई ठाणे, कल्याण, डहाणू, पालघरकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. दोन वर्षापूर्वी हा रस्ता जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. बांधकाम विभाग सांगते हा रस्ता महामार्गाकडे गेला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग सांगते, अजूनही हा रस्ता आमच्याकडे आलेला नाही. तो बांधकाम विभागाकडेच आहे. त्यामुळे येथील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.कासटवाडी गावाजवळील रस्त्यावर गेल्यावर्षी देखील पावसाळ्यात अपघातांचे छत्र सुरू होते. मात्र त्यानंतर नागरिकांच्या तक्रारी आणि प्रसिद्धी माध्यामांनी हा रस्त्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाने यात लक्ष घालते. ३ किमी.च्या या रस्त्यावर पाच ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले.मात्र तरीही हे अपघातांचे सत्र सुरूच आहे. येथील नागरिकांना याबाबत माहिती असल्याने ते सावकाशपणे गाडी चालवतात. मात्र, नव्याने येणाऱ्यांना येथून खूप सांभाळून जावे लागते. या वाहनचालकांना याची माहिती नसल्याने हे अपघात घडत आहेत.कासटवाडी ते कशिवली घाट हा नागमोडी वळणाचा असून, घाटात रस्त्यावरील संरक्षक भिंती तुटल्याने हा रस्ता खचत चालला आहे. असे असतानाही या घाटातील संरक्षक भिंती बांधण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.२५ ते ३० वर्षांपूर्वी या रस्त्यावर काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या तर काही ठिकाणी दगड रचून दगडी बांध म्हणजेच संरक्षण कठडा बांधण्यात आला होता. मात्र, आजमितीस या संरक्षक भिंती आणि दगडी बांध तुटले असून हा घाट अत्यंत धोकादायक बनला आहे.जव्हारहून मुंबई - ठाणे - कल्याण - पालघरकडे म्हणजेच जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून रोजच शेकडो वाहने ये - जा करतात. रोजच जाणाºया वाहनचालकांना यामुळे काही फरक पडत नाही. हा अरुंद रस्ता, त्यातच नागमोडी वळणे, तुटलेले संरक्षण कठडे त्यामुळे रात्रीच्या वेळी येथून जाताना मोठी कसरत करावी लागते.त्यातच जव्हार हे पर्यटनस्थळ असल्याने या घाटातील रस्त्यावरून पावसाळ्यात रोजच शेकडो पर्यटक येतात. मात्र घाटात रस्ता तुटल्यामुळे पर्यटकांना, नवीन वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.हा रस्ता आमच्या विभागाकडे हँडओव्हर झालेला नाही. याची दुरूस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. - निलेश महाजन,उपअभियंता, राष्ट्रीय महामार्गहा रस्ता आमच्या विभागाकडे येत नाही. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हँडओव्हर झाला आहे.- डी.जी. होले,उपअभियंता सा.बां. विभाग, जव्हार.जव्हार ते कासटवाडी, कशिवली घाट हा मुंबई, ठाणे अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याच्या मुद्द्यावरून बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे नाहक इतरांचे बळी जात आहेत. यामुळे कोणीतरी जबाबदारी स्वीकारून रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करावी.- सुनील भुसारा , राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार