शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

महापालिकेकडून तक्रारदार रहिवाशांचा मानसिक व शारिरीक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 19:30 IST

इमारतीतील बेकायदा बांधकामाची तक्रार करणारे रहिवाशी हवालदील

ठळक मुद्दे अतिरीक्त आयुक्तांनी कारवाईचे निर्देश देऊन देखील पालिकेने कारवाई न करता बेकायदा बांधकामास पाठीशी घातले आहे. रहिवाशांनी सतत चालवलेला पाठपुरावा व कुसेकर यांच्या निर्देशानंतर अखेर सप्टेंबर २०१८ मध्ये बोरसे यांनी दुबे व स्पिरीच्युअल ट्रस्टना नोटीस बजावली.

मीरारोड - इमारतीतील दोन सदनिकाधारकांनी केलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी महापालिकेचे उंबरठे गेल्या वर्षभरापासून झिजवणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनाच तडजोड करण्यापासून दमदाटी करत नोटीस बजावून त्यांचा मानसिक व शारिरीक छळ महापालिकेने चालवला आहे. अतिरीक्त आयुक्तांनी कारवाईचे निर्देश देऊन देखील पालिकेने कारवाई न करता बेकायदा बांधकामास पाठीशी घातले आहे. पालिकेच्या या भ्रष्ट व दडपशाहीविरोधात न्याय मागायचा तरी कोणाकडे असा सवाल रहिवाशांनी केला आहे.मीरारोडच्या शांती पार्क वसाहतीमध्ये शांती प्लाझा इमारत क्र. ३७ ही गृहनिर्माण संस्था आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील १०१ क्र.चे सदनिका धारक मे. वर्ल्ड रिनीवल स्पिरीच्युअल ट्रस्ट व १०२ क्र.चे सदनिका धारक अवधेशकुमार दुबे व आशा दुबे यांनी इमारतीच्या डक्टच्या मोकळ्या जागेत लोखांडी अँगल टाकून बांधकाम केले व ती जागा बळकावली. शिवाय मोकळ्या गच्चीच्या जागेत देखील पक्के बेकायदा बांधकाम करुन खोल्या तयार केल्या आहेत.इमारतीचे प्लॅस्टर व रंगरंगोटीचे काम सुरु झाल्यानंतर देखील या दोन्ही सदनिकाधारकांनी बेकायदा बांधकाम काढले नाही. जेणेकरुन या दोघांमुळे गेले वर्षभरापासून इमारतीचे काम रखडले आहे. दोन्ही सदनिका धारकांना सांगून देखील ते ऐकत नसल्याने अखेर संस्थेने महापालिकेकडे एप्रिल २०१८ मध्ये तक्रार केली. तत्कालिन अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांनी रहिवाशांची बाजु रास्त असल्याने दोन्ही सदनिकांचे बेकायदा बांधकाम तोडण्याचा निर्णय व निर्देश दिले. परंतु प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी सातत्याने कारवाईस टाळाटाळ केली. सुरवातीला बोरसेंनी कारवाई करण्यास आमदार नरेंद्र मेहता यांचा विरोध असल्याचे कारण दिले. रहिवाशांनी आ. मेहतांची भेट घेतली असता आपण कारवाई करु नका असे सांगीतले नसल्याचे रहिवाशांनी सांगीतले.रहिवाशांनी सतत चालवलेला पाठपुरावा व कुसेकर यांच्या निर्देशानंतर अखेर सप्टेंबर २०१८ मध्ये बोरसे यांनी दुबे व स्पिरीच्युअल ट्रस्टना नोटीस बजावली. आॅक्टोबरमध्ये सुनावणी घेऊन वेळकाढुपणा करत अखेर ३ डिसेंबर रोजी सुनावणी आदेश देत बांधकाम अनधिकृत घोषित केले. १५ दिवसांची मुदत उलटुन देखील बांधकामांवर कारवाई केली नाहीच शिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. कारवाईस टाळाटाळ करत उलट रहिवाशांनाच तुम्ही आपसात प्रकरण मिटवुन टाका, अन्यथा तुमच्या सदनिकांमधली बांधकामे सुध्दा तोडेन, तुमची गृहनिर्माण संस्थेच्या दुय्यम निबंधकांकडे तक्रार करीन अशा धमक्या सुरु केल्या. इतकेच नव्हे तर तक्रारदार रहिवाशांनाच नोटीस काढली. रहिवाशांंनी पालिका आयुक्त बालाजी खतगावकरपासू महापौर डिंपल मेहता आदींकडे आपले गाऱ्हाणे मांडले. पण कार्यवाही मात्र करण्यास टाळाटाळच चालवली आहे. महापालिका प्रशासनाकडून न्याय हक्कासाठी दाद मागितल्याची शिक्षा गेले वर्षभर हे रहिवाशी भोगत आहेत. काम सोडून पैसे खर्चुन पालिकेच्या वाऱ्या करत आहेत. कारवाई तर दूरच उलट दमदाटी व धमक्या खाव्या लागत आहेत. मानसिक व शारिरीक छळ पालिकेने मांडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. चंद्रकांत बोरसे ( प्रभाग अधिकारी ) - एका सदनिकेतील ओमशांतीवाल्यांनी धार्मिक मुद्दा करत कारवाईला विरोध केला आहे. त्यामुळे कारवाई झाली नाही. आयुक्तांनी आदेश दिले तर मी लगेच बांधकाम तोडेन.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडcommissionerआयुक्त