शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बकरी ईदला घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा; विहिरीत बुडाल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:37 IST

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज स्मशानभूमीजवळ असलेल्या अप्पा नगरमध्ये गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली.

- मंगेश कराळे

नालासोपारा :- नातेवाईक तरुणाचा तोल जाऊन विहिरीच्या पाण्यात पडल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणासह दोघांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. बकरी ईदला घडलेल्या या दुःखद दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज स्मशानभूमीजवळ असलेल्या अप्पा नगरमध्ये गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली. अमन अली शेख (१९) आणि अदनान दिलशाद शेख (२९) हे दोघे परिसरातील विहिरीच्या काठावर बसले होते. त्यावेळी पाऊस आल्याने आडोशाला जाण्यासाठी अमन हा उठत असताना त्याचा तोल जाऊन विहिरीच्या पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी नातेवाईक अदनान यानेही विहिरीच्या पाण्यात उडी मारली. पण दोघेही विहीरीच्या पाण्याच्या बाहेर आले नाही व दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अदनानचा भाऊ सुफीयान याने तुळींज पोलिसांना माहिती दिली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूEid e miladईद ए मिलाद