शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
4
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
5
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
6
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
7
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
8
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
9
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
10
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
11
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
12
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
13
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
14
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
15
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
17
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
18
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
19
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
20
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका

पाच धरणे असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीतच जाणवतेय भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 12:02 AM

मोखाडा तालुक्यात मोठमोठी पाच धरणे असताना दरवर्षीच आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई अद्यापही दूर झालेली नाही.

रवींद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ मोखाडा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाईला सुरुवात झाली असून दापटी १/२ येथून १५ दिवसांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. तालुक्यात मुबलक पाणीसाठा असूनही नियोजनाअभावी ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. 

मोखाडा तालुक्यात मोठमोठी पाच धरणे असताना दरवर्षीच आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई अद्यापही दूर झालेली नाही. तालुक्याची लोकसंख्या लाखांवर पोहोचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी पाच मोठी धरणे आहेत. परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणा कायम आहे. 

या धरणांवर कोट्यवधींचा खर्च होऊनदेखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवांना झालेला नाही. येथील परिस्थिती बघता दरवर्षीच फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईची समस्या तोंड वर काढून एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. येथील टंचाईग्रस्त आदिवासींना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. 

टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपासून टंचाईग्रस्त गावपाडे २० ते २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकरचालकांनाही चांगलीच कसरत करावी लागते. डोळ्यात तेल घालून चातक पक्ष्याप्रमाणे आदिवासींना टँकरची दिवसभर वाट बघावी लागते. 

दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊनदेखील शून्य नियोजनामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहोचवले आहे, परंतु धरणालगतच्या ४ ते ५ कि.मी. अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार