शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

मोबाइल अन् मद्याने कालवले अनेकांच्या संसारात विष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 11:02 IST

गेल्या वर्षभरात अशी शेकडो प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाकडून केले जात आहे.

- हितेन नाईक

पालघर : मोबाइलमुळे वाढता विसंवाद, मद्य पिण्याचे वाढते प्रमाण तसेच चारित्र्यावर संशय आहे, अशा विविध कारणांमुळे गृहकलहात वाढ होताना दिसत आहे. वाढते वाद मिटल्यास अखेर अनेक संसार सुखीदेखील होतात, असेही दिसून आले आहे.

गेल्या वर्षभरात अशी शेकडो प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाकडून केले जात आहे. मोबाइल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वाढता वापर, मद्य आणि नशा, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणारे छळ, आदी कारणांमुळे पती-पत्नीत वाद होऊन प्रकरण पोलीस ठाणे आणि न्यायालयात पोहोचण्याच्या प्रमाणात अलीकडे वाढ झाली आहे. त्यातील पुढे काही प्रकरणे काडीमोडापर्यंत देखील पोहोचली आहेत.

पती-पत्नीमधील वादांची ही प्रकरणे सर्वप्रथम भरोसा सेलकडे जातात. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात यश न आल्यास नाइलाजाने गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जातो. लिव्ह इन रिलेशनमध्ये पाच वर्षे राहणाऱ्या दोन तरुण-तरुणींनी घरातून पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. त्या तरुणीचा मोबाइल चेक करणे, संशय घेणे, आदी बाबींसह मला आणि वडिलांना सकाळी डबा देत नाही, अशा अनेक कारणांसह हे प्रकरण भरोसा सेलकडे आल्यावर दोघांतील गैरसमज दूर करीत पुन्हा त्यांना एकत्र आणण्यात भरोसा सेलला यश आले.

चारित्र्यावर संशय हेच कारण-    २०२०-२१ मध्ये १३ तक्रारी या चारित्र्यावर संशय घेतल्याप्रकरणी भरोसा सेलकडे आल्या होत्या. -   मोबाइलवर बोलणे, फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर नेहमी व्यग्र राहणे, हुंडा, मुलगा-सून त्रास देतात, जमीन वाद, परस्त्रीशी विवाहबाह्य संबंध, आई-वडिलांचा त्रास, कौटुंबिक कलह, व्यसनाधीनता आदी तक्रारी येत आहेत.

नेहमी आईशी बोलते म्हणून वादतक्रारींमध्ये नेहमी आईशी बोलणे, कौटुंबिक कलह, हुंडा,आई-वडिलांचा त्रास, मुलगा-सुनेचा त्रास, बहीण-भाऊ वाद, पतीचा चारित्र्यावर संशय आदी तक्रारीची कारणे आहेत.

बायकोचा जाच वाढलापत्नीचाही जाच वाढल्याची प्रकरणे समोर येऊ लागली असून सन २०२० आणि २०२१ मध्ये प्रत्येकी एक-एक तक्रारीची नोंद करण्यात आलेली आहे. महिलांना कायद्याने दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून काही महिलांकडून पतीविरोधात तक्रारी केल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पुरुषांचा मनस्ताप वाढत आहे.

संसारात फुलले हास्य२०२० मध्ये एकूण २३ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील २१ तक्रारीमध्ये यशस्वीरीत्या समझोता करण्यात भरोसा सेलला यश आले असून २ तक्रारींमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.२०२१ मध्ये ४१ तक्रारी प्राप्त झाल्या असून १९ प्रकरणात यशस्वी समझोता झाला तर ८ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले. उर्वरित १४ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्याच्या दृष्टीने भरोसा सेलचे वरिष्ठ अधिकारी कलगोंडा हेगाजे हे टीमच्या सहकार्याने प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी